आपत्तीग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत
राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधितांना शासनाने मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. या सर्वांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी असा शासनाचा मानस आहे. यासाठी जिल्हा पातळीवरील यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी. या प्रक्रियेमध्ये एकही बाधित व्यक्ती मागे राहणार नाही, याची जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देशही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.
अपात्र नागरिकांना जन्म प्रमाणपत्र दिले गेले असल्यास ते तातडीने रद्द करुन त्याची माहिती आधार प्राधिकरणाला कळवावी. त्याचप्रमाणे हैद्राबाद गॅझेट संदर्भातील शासन निर्णयाच्या आधारे जात प्रमाणपत्र देताना ती नियमाप्रमाणेच दिली जातील, याची दक्षता घ्यावी, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment