मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या इलेक्ट्रिक ट्रकसाठी तयार करण्यात आलेले तंत्रज्ञान भारतीय वातावरणाला अनुरूप आहे आणि बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान ईव्ही क्षेत्रातील मोठी क्रांती ठरणार आहे. बॅटरीच्या किंमती कमी होत असून बॅटरीच्या कार्यक्षमतेत, आयुर्मानात वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात बॅटरीच्या साह्याने ट्रक २०० ऐवजी ४०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकेल. हा केवळ ट्रक किंवा इलेक्ट्रीक वाहन नसून ‘सॉफ्टवेअर ऑन व्हील्स’ आहे, जे तंत्रज्ञानाला स्मार्ट बनवण्याचे उदाहरण आहे. कार्गो वाहतुकीत ही टेस्ला चळवळीची सुरूवात आहे असे म्हणता येईल.
हे तंत्रज्ञान किफायतशीर असण्यासोबत त्याची कार्यक्षमताही उत्तम आहे. ट्रकमध्ये बसवलेले सेन्सर आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे अधिक भाराचे निदान होईल, ज्यामुळे वाहतूक नियमांचे पालन आणि अपघात नियंत्रण साधले जाईल.
राज्यात सौर ऊर्जा निर्मितीला गती देण्यात येत असून २०३५ पर्यंत ७० टक्के ऊर्जेचा वापर सौर स्रोताद्वारे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment