Tuesday, 28 October 2025

सागरी क्षेत्रात गुंतवणुकीचा नवा अध्याय

 सागरी क्षेत्रात गुंतवणुकीचा नवा अध्याय

या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात बंदर विकासजहाज बांधणीसागरी संशोधनआणि तांत्रिक प्रशिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. दिघी बंदर आणि वाढवण बंदर या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे राज्याच्या सागरी व्यापार क्षमतेत वाढ होणार आहे. आयआयटी मुंबईच्या सहकार्याने संशोधन आणि कौशल्यविकासाला चालना मिळणार आहे.

राज्यात या माध्यमातून हजारो रोजगाराच्या संधीनव्या उद्योगांचे आकर्षणआणि विकसित भारत २०४७ या उद्दिष्टाकडे वाटचाल गतीमान होणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून सागरी विकासाला नवे बळ मिळत असूनआज झालेले सामंजस्य करार हे त्या दिशेने ठोस पाऊल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री निलेश राणे यांनी नमूद केले.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi