Wednesday, 17 September 2025

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार

 ऑगस्टसप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार

 -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबईदि.१६:  ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात  आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.  राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.

राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर (४२ लाख ८४ हजार ८४६ एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीनमकाकापूसउडीदतूरमूगभाजीपालाफळ पिकेबाजरीऊसकांदाज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे. 

सर्वाधिक बाधित जिल्हे:

नांदेड – ७२८,०४९ हेक्टर

वाशीम – २०३,०९८ हेक्टर

यवतमाळ – ३१८,८६० हेक्टर

धाराशिव – ,५७,६१० हेक्टर

अकोला – १७७,४६६ हेक्टर

सोलापूर – ४७,२६६ हेक्टर

बुलढाणा – ८९७८२ हेक्टर

बाधित पिके:

सोयाबीनमकाकापूसउडीदतूरमूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपालाफळपिकेबाजरीऊसकांदाज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

बाधित जिल्हे:

नांदेडवाशीमयवतमाळबुलढाणाअकोलासोलापूरहिंगोलीधाराशिवपरभणीअमरावतीजळगाववर्धासांगलीअहिल्यानगरछ. संभाजीनगरजालनाबीडलातूरधुळेजळगावरत्नागिरीचंद्रपूरसातारानाशिककोल्हापूरसिंधुदुर्गगडचिरोलीरायगडनागपूर आणि पुणे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi