भारत-मॉरिशस भागीदारीला नवा आयाम - केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर
केंद्रीय ऊर्जा, मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी यावेळी बोलताना भारत-मॉरिशसचे संबंध हे केवळ आर्थिकच नाहीत तर सांस्कृतिक व सामाजिक पातळीवरही अनोखे आणि घट्ट आहेत. भारत-मॉरिशस व्यापक आर्थिक सहकार्य व भागीदारी करारामुळे व्यापार, सेवा, गुंतवणूक व नवोन्मेष यामध्ये नवे मार्ग खुले झाले असून, आज भारत मॉरिशसच्या व्यापार भागीदारांपैकी एक आहे. तसेच मॉरिशस हे भारतातील विदेशी थेट गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे स्रोत ठरले असल्याचे सांगितले. दोन्ही देशांतील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांना बळकटी देण्याचे आवाहन केले.
मंत्री श्री.खट्टर म्हणाले, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या दशकात भारताने ७ टक्क्यांच्या आसपास वार्षिक वाढ दर कायम ठेवला आहे. ११५ हून अधिक युनिकॉर्न्ससह भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप इकोसिस्टम आहे, असे सांगून भारत लवकरच पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील आधार, युपीआय, डिजीलॉकर यांसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत संरचना जागतिक आदर्श ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment