देशातील मेट्रो रेल प्रकल्पाच्या प्रगतीवर भर देता मंत्री श्री.खट्टर यांनी 2002 मध्ये दिल्ली मेट्रो सुरू झाल्यापासून आजपर्यंत भारतातील 24 शहरांमध्ये 1,069 किमी मेट्रो नेटवर्क कार्यान्वित झाल्याचे तसेच 949 किमी मेट्रो मार्ग बांधकामाधीन असल्याचे सांगितले. 10 हजार ई-बसेसच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रात भारताने मॉरिशसबरोबर भागीदारी केली असून मॉरिशस हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी व ग्लोबल बायोफ्यूएल अलायन्सचा सक्रिय सदस्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतातील रस्ते, रेल्वे आणि विमानसेवेच्या जाळ्यामुळे गुंतवणुकदारांना अधिक चांगल्या सुविधा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात दोन्ही देशांनी एकत्रितपणे व्यापार-गुंतवणूक, हरित ऊर्जा, डिजिटल सहकार्य, लघुउद्योग आणि स्टार्टअप्स यावर अधिक भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. भारत आणि मॉरिशस यांनी हातात हात घालून दोन शतकांचा प्रवास केला आहे. आगामी काळात हे नाते आणखी दृढ करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे मंत्री श्री.खट्टर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment