Thursday, 18 September 2025

शासनाच्या सेवा सुलभ असणे गरजेचे आहे. सेवा पंधरवडा आणि

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेसामान्य माणसाचे जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी शासनाच्या सेवा सुलभ असणे गरजेचे आहे. सेवा पंधरवडा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हा त्याचाच भाग असून त्यामुळे अनेकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे कार्य होणार आहे. शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्‍त्यांचे महत्त्व ओळखून आणि त्यासंदर्भातील वाद टाळण्यासाठी या रस्त्यांचे जीआयएस मॅपींग करण्यात येणार आहे आणि येत्या काळात हे रस्ते तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आपसातील वाद संपुष्टात येतील. या पाणंद रस्त्यांमुळे या गावांचे अर्थकारण बदलेलनाम फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम एक लोकचळवळ होईलअसा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi