Tuesday, 9 September 2025

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा केंद्राकडे निधी मागणीचे पत्र पाठवावे

 वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल १५ ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा

केंद्राकडे निधी मागणीचे पत्र पाठवावे

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ८ : राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगानळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शासनाकडे सादर करावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi