Wednesday, 10 September 2025

राज्यातील 75 गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करावे

 राज्यातील 75 गावे स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करावे

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

·         सेवा पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबईदि. 9 : राज्यात सेवा पंधरवड्यानिमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगवान इंटरनेट सेवा, वायफाय व विविध कार्यप्रणालीत कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर याद्वारे राज्यातील 75 गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत असून माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाने @75 ही संकल्पना घेऊन विविध लोकाभिमुख उपक्रम राबवावेअसे निर्देशही माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi