Saturday, 13 September 2025

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन

 यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पणभूमिपूजन

            आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यवतमाळदि. 13 : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असूनत्यासाठी देशात 1 लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे.  महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरेरस्तेवीजपाणीवसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असूनपुढील 3 वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेलअसा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

         मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पणभूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झालात्यावेळी ते  बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोडमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेआदिवासी विकास मंत्री अशोक उईकेखासदार संजय देशमुखआमदार राजू तोडसामआमदार किसनराव वानखेडेसईताई डहाकेसंजय डेरकरश्याम कोडे,  

             मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीआदिवासी समाजासाठी ५४ हजार कुटुंबांना घरेनळांद्वारे पाणी,  उपचारासाठी दवाखानेवसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना व उपक्रम आणलेतशी भरीव कामगिरी त्यापूर्वी झालेली नाही. आदी कर्मयोगी योजनेतून जिल्ह्यातील 366 गावांची निवड झाली आहे. योजनेतून राज्यातील 30 लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi