Thursday, 10 July 2025

दरवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव.. ऋतू बदलच्या परिणामाला सामोरे जावे लागते.*

 🌹⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🌹


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


                  *हरिभजनाची*


            ⚜️⚜️🚩⚜️⚜️

                *चातुर्मास विशेष*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🚩⚜️🚩🔆🛕🔆🚩⚜️🚩


        *वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।*

        *व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ॥*

        *दरवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव.. ऋतू बदलच्या परिणामाला सामोरे जावे लागते.*  

        *भारतीय संस्कृतीने मानवी जीवनाचा सखोल अभ्यास करून आरोग्याला 'धनसंपदा' मानले. निरामय आरोग्यासाठी धर्म संस्कार  दिलेत.*

        *चातुर्मास प्रारंभ झालाय. आषाढ शु. एकादशी ते कार्तिक शु. एकादशी असा हा चार महिन्याचा काळ. या काळात पावसाळ्यामुळे धरणीचे रूप पालटते. फारसे स्थलांतर घडत नाही. याकाळात चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला. यामुळेच जैन मुनीं तसेच वासुदेवानंद सरस्वतींसह अनेक संतांनी चातुर्मास अनेकदा एकाच ठिकाणी केलाय.*

        *या काळात मानवाचे मानसिक रूपही पालटते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चालते. मग निरामय आरोग्यासाठी अनेक खाद्य पदार्थ वर्ज्य सांगितलेत. याला आधुनिक विज्ञानाचाही दुजोरा आहे. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.*

        *चातुर्मासात आरोग्यदायी आणि मानसिक आनंद देणारी व्रत वैकल्ये सांगितलीत. मनुष्याला देवाची आठवण संकटकाळात होते. संकट येणे हा जीवनाचा अविभाज्य भागच. मग देवाचे नाव घेतले की संकट दुःख कमी होते.. त्यातून सुटका होते.. किमान उत्तम मनस्वास्थ्य लाभून संकटाचा सामना करता येतो. पण नेहमीच त्याची आठवण यावी म्हणून कुंती मातेने दुःखातच ठेव असे मागणे मागितले होते.*

        *चातुर्मासात कोणते व्रत करु असे भक्तानी विचारताच संत गोंदवलेकर महाराज म्हणाले.. चार महिने कुणालाही दुखावू नकोस. जिभेवर ताबा ठेव.*

        *या सोबच हवं ते नाम.. संत साहित्य वाचन.. श्रवण.  संतांनी चातुर्मासासाठी विपुल ग्रंथ संपदा प्रदान केलीय. या पैकीच एक संत सोहिरोबानाथ.*

        *संत सोहिरोबानाथ आंबिये हे गहिनीनाथ यांचे शिष्य. ज्ञानेश्वरांचा मोठा प्रभाव असलेले सोहिरोबा यांची कोकणातील ज्ञानेश्वर म्हणून ओळख आहे. हे कोकणातील (बांदे) सावंतवाडीचे. बालवयापासूनच धार्मिक प्रवृत्तीचे. गुरुंची भेट झाली. मग त्यांच्या जीवनाचा उद्देश गुरुंनी त्याना समजावीला. गुरु आदेशाने ते सोहsम् मंत्र जप.. साधना करु लागले. मग जीवनच बदलले. गुरुकृपेने सारस्वत प्रतिभा लाभली.*

        *सावंतवाडी संस्थानातील नोकरी सोडून गृहत्याग करुन तिर्थाटन केले. लोकांना भक्तीचा उपदेश करु लागले. महाराष्ट्राबाहेरही म.प्र, गुजराथ येथे त्यांचा शिष्यवर्ग मठ होते. महादजी शिंदे यांनीही त्यांना दरबारी बोलवून सत्कार केला.. क्षीप्रा नदीकाठी मठ बांधून दिला.*

        *मराठीसह हिंदी आणि संस्कृत मध्येही असलेल्या त्यांच्या अभंग.. श्लोक.. आरत्या, कटिबद्ध.. सवाया इ. रचना म्हणजे संगीतकार आणि गायकांना खुणावणारा शास्त्रशुद्ध चिजांचा अनमोल खजिनाच. या योगी नाथांची दैवी प्रतिभा थक्क करणारी आहे. सिद्धान्तसंहिता मध्ये संस्कृत श्लोक ७२९, मराठी ओवी ४९१७, अक्षयबोध ओवी ४०८, अव्दयानंद ५५४, पूर्णाक्षरी ४८९, महदनुवेश्वरी ९०९३ ओवी हे सारे वेदान्तसार सांगणारे त्यांचे ग्रंथ. जन्मभर भक्तीमार्ग प्रसाराने लाखो जीवांचा उद्धार करणारे हे योगी.*

        *जीवन काळ क्षणाक्षणानी कमी होतोय, पण परमेश्वर प्रेम जागृत होतच नाही. सांसारीक अडचणीत.. सुख.. दुःखात मन अडकते, शिवाय मनात परमेश्वर अस्तित्वाविषयी संदेहाचा.. शंकांचा चिखलही मनात कालवला जातो. नाम स्मरण महत्वाचे. तेव्हा नाथ आम्हांला सावध करत आहेत की..*


🌷🌿🌸🔆🛕🔆🌸🌿🌷


  *हरिभजनाविण काळ*

  *घालवू नको रे ॥१॥*


  *दोरीच्या सापा भिवुनी भवा ।*

  *भेटी नाही जिवा-शिवा ।*

  *अंतरीचा ज्ञानदिवा*

  *मालवू नको रे ॥२॥*


  *विवेकाची ठरेल ओल ।*

  *ऐसे की बोलावे बोल ।*

  *आपुल्या मते उगीच चिखल*

  *कालवू नको रे ॥३॥*


  *संत संगतीने उमज ।*

  *आणुनि मनी पुरते समज ।*

  *अनुभवावीण मान*

  *हालवू नको रे ॥४॥*


  *सोहिरा म्हणे ज्ञानज्योती ।*

  *तेथ कैचि दिवस-राती ।*

  *तयावीण नेत्रपाती*

  *हालवू नको रे ॥५॥*


🌺🌿🌸🔆🙏🔆🌸🌿🌺


  *रचना : संत सोहिरोबानाथ*  ✍

  *संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी*

  *स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी*


  🎼🎶🎼🎶🎼  🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *०९.०७.२०२५*


🌻🌿🥀🌺🌻🌺🥀🌿🌻

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi