संताचा संदेश प्रत्य
क्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- 'निर्मलदिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा समारोप
पंढरपूर, दि.५: सर्व संतांनी निसर्गप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्यांवर, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येतांना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्यावतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 'निर्मलदिंडी' तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या 'चरणसेवा' उपक्रम आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'आरोग्यवारी' उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कलशेट्टी, डॉ.बाबासाहेब देशमुख, देवेंद्र कोठे, विक्रम पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाची आस लावून पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचा विचार करुन २०१८ वर्षीपासून निर्मलवारी सुरुवात केली. याअंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. सर्व दिंडीमधील वारकऱ्यांनी या संकल्पनेचा स्वीकार केला, त्यामुळे पालखीतळावर स्वच्छता राखली जाते. आपली वारी निर्मल, स्वच्छ झाली आहे.
ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्मलवारी संकल्पना यशस्वीरित्या राबविली, त्याचबरोबर निर्मल दिंडीच्या माध्यमातून लोककलावंत स्वच्छतेचा लोकजागर करुन स्वच्छतेबाबतचा संदेश घरोघरी पोहचविण्याचे काम करीत असतात. जी पावले विठुरायाच्या दर्शनाच्या आशेने चालतात, त्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचा प्रत्यंतर यावा, या सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने चरणसेवा उपक्रम राबवून वारकऱ्यांचे सेवा केली. त्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम केले.
वारीच्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या 'आरोग्यवारी' उपक्रमाच्यामाध्यातून महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याकरिता आवश्यता त्या सुविधा उपलब्ध करुन अतिशय सुंदर नियोजन केले. पुणे, सातारा आणि सोलापूर प्रशासनाने वारकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध केल्याबद्दल तसेच निर्मल दिंडी, चरणसेवा, आरोग्यवारी यशस्वी केल्याबद्दल प्रशासन, सेवाभावी संस्था आदींचे त्यांनी अभिनंदन केले.
वारकऱ्यांची सेवा ही मोठी संधी असून वारीचे चांगल्या प्रकारचे नियोजन करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सोबत घेवून वारीचे अतिशय उत्तम नियोजन केले. वारकऱ्यांना जर्मन हँगरच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्था, महिलांकरिता स्वच्छतागृहासह, स्नानगृह, अशा आवश्यक सर्व सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, यावर्षी नवीन उंची गाठत एक ‘बेंचमार्क’ निर्माण केला आहे.त्यामुळे यावर्षीच्या वारीचे वेगळेपण पाहयाला मिळत आहे. सेवा कधीच संपत नसते, सेवेचे नवीन उच्चांक गाठायचे असतात. याकरिता प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.






.jpg)
No comments:
Post a Comment