Friday, 20 June 2025

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट ,pl share

 कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

 

मुंबईदि. 20 : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेअशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमीपालघर ४१.६ मिमीरायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी  आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ३१.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २० जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ४१.६रायगड ४०.१रत्नागिरी ४१.७,  सिंधुदुर्ग २४.२पालघर ४१.६नाशिक २७.४धुळे १.५नंदुरबार ४जळगाव ३.४अहिल्यानगर ८.४पुणे २८सोलापूर २,  सातारा २६.५,  सांगली ५.४,  कोल्हापूर १७.४छत्रपती संभाजीनगर ७.२जालना ५.५बीड ४.८,  लातूर ०.६धाराशिव ३.३नांदेड ३.७,  परभणी ३हिंगोली ७.८बुलढाणा ६.५अकोला ११.६वाशिम ७.६ अमरावती १२यवतमाळ ९.७वर्धा १०.७नागपूर ५.९भंडारा ३.२गोंदिया ३.९चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे.      पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी १५,०९२ क्यूसेकबंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेकभिमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेकघोड नदी घोड धरण  ४,००० क्युसेककण्हेर धरण सातारा ५०० क्युसेकवेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्या लागत गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून  २२,३४५ क्युसेकसीना नदी - सीना धरणातून  २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

            रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेडदापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली या रस्त्यावरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्याच्या मधील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. चिंचगर कोरेगाव भैरवी रोड मधील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळयाने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे  चिपळूणदापोली येथे झाड कोसळून आणि भिंत पडून खासगी मालमत्तांचे नुकसान झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi