Friday, 20 June 2025

दिलखुलास' कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांची मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात

मंत्री जयकुमार गोरे यांची मुलाखत

 

मुंबईदि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात 'आषाढी वारी’ निमित्त  शासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधाया विषयासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

पंढरपूरची आषाढी वारी  ही वारकऱ्यांची श्रद्धाभक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे. या वारीतील प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी राज्य शासनाने यंदा अधिक व्यापक नियोजन केले आहे. वारीमध्ये यंदा शासनाने आरोग्य सेवापाणीपुरवठावाहतूक नियोजनआपत्कालीन व्यवस्थास्वच्छता मोहीम आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला आहे. तसेच मुख्यमंत्री निवारा सुविधा’ ही यंदाच्या वारीतील नवी भर असूनयामाध्यमातून हजारो वारकऱ्यांना विश्रांतीसाठी निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातूनस्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही वारी अधिक सुसंगठित आणि सुरक्षित करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. वारकरी परंपरेतील या महत्त्वाच्या सोहळ्यात शासनाची भूमिका आणि जनहितकारी उपाययोजनांची माहिती याविषयावर मंत्री श्री. गोरे यांनी दिलखुलास’ व जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि.23 आणि मंगळवार दि. 24 जून 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi