राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस
मुंबई, दि. १३ : राज्यात मागील २४ तासांमध्ये (१३ जून रोजी सकाळपर्यंत ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिमी पाऊस झाला आहे. तर कोल्हापूर ३९.८ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ३७ मिमी, सांगली जिल्ह्यात ३६ मिमी आणि नाशिक जिल्ह्यात २५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज १३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १०.५, रायगड १५, रत्नागिरी ३७, सिंधुदुर्ग ७१, पालघर २२.२, नाशिक २५.२, धुळे २१.४, नंदुरबार ३.१, जळगाव ९.३, अहिल्यानगर १८.६, पुणे २०.१, सोलापूर १५.७, सातारा २४.२, सांगली ३६.६, कोल्हापूर ३९.८, छत्रपती संभाजीनगर २०.६, जालना २३.६, बीड १०.६, लातूर ६.३, धाराशिव ९.६, नांदेड ४.९, परभणी ८.९, हिंगोली १९.३, बुलढाणा १३.९,
अकोला ८.७, वाशिम १६.७, अमरावती ३.५, यवतमाळ ४.१, वर्धा ३.९., नागपूर ०.३, भंडारा ०.१, गोंदिया ०.१, चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली १.४.
No comments:
Post a Comment