Thursday, 29 May 2025

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

 आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी

एनडीआरएफएसडीआरएफ पथके सतर्क

 

मुंबई, दि. २९ :  राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क आहेत. मुंबई शहर व  उपनगर मध्ये एनडीआरएफची तीन पथकेपालघर मध्ये एकनागपूर येथे दोन पथके तैनात आहेत. तर पुणे मुख्यालय येथे एनडीआरएफची दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.  नागपूर व धुळे येथे एसडीआरएफची प्रत्येकी दोन पथके तैनात असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मी रोजी सकाळपर्यंत ) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस झाला आहे. मुंबई २९.८ मिमीठाणे २९.५ मिमीनाशिक २६.३ मिमी आणि रायगड जिल्ह्यात २१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २९ मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे जिल्ह्यात २९.५रायगड २१.९रत्नागिरी १०.१,  सिंधुदुर्ग १३,  पालघर ३.१नाशिक २६.३धुळे १५.९,  नंदुरबार ५.२जळगाव ३.२अहिल्यानगर ४.३,  पुणे  ४.८सोलापूर ५.७,  सातारा ३.९,  सांगली १.६,  कोल्हापूर ०.७छत्रपती संभाजीनगर २.८,  बीड १लातूर २.१,  धाराशिव ९.७,  परभणी ०.१,  हिंगोली ०.१,  यवतमाळ ०.१,  वर्धा ४.७नागपूर २०.८भंडारा १.७गोंदिया ५,  आणि गडचिरोली ०.९.

दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई शहरमध्ये झाड पडून दोन व्यक्तीपालघर जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती आणि सातारा जिल्ह्यात बंधाऱ्यात पडून एक व्यक्ती मृत झाली आहे. मुंबई उपनगर येते झाड पडून दोनपुणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.  तर जालना जिल्ह्यात २६  प्राणी वर्धा जिल्ह्यात एक आणि चंद्रपूर जिल्ह्यात एक प्राणी मृत झाला आहे. तसेच मुंबई काळाचौकी येथे भारत आइस कंपनीमधून होणारी अमोनिया वायुची गळती मुंबई महानगरपालिका आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करुन वायू गळती थांबवली असल्याचे सांगण्यात आले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi