Friday, 30 May 2025

पुरात अडकलेल्यासाठीमदत व बचाव कार्यासाठी पथके

 मदत व बचाव कार्यासाठी पथके

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशा एकूण चार पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. अतिवृष्टी मध्ये बाधितांना नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या देखील प्रवण ठिकाणांवर तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील मुंबई शहरपुणेसातारासोलापूररायगड व मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा जास्त फटका बसला. मुंबई शहर आणि उपनगर हार्बर लोकल वाहतूक रेल्वे रुळावर पाणी साचल्याने काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे फायबर ऑप्टिक्स केबल कट झाल्याने काही ठिकाणी मोबाईल टॉवर यंत्रणा विस्कळीत झाली होतीती तत्काळ समन्वयाने पूर्वस्थितीत येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे  जिल्ह्यात दिनांक २४ ते २५ मे २०२५ या कालवधीत दौंडमध्ये सर्वात जास्त ११७ मिमी पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये १०४.७५ मिमी आणि इंदापूरमध्ये ६३.२५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये २५ घरांची अंशत पडझड झाली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi