Monday, 14 April 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे

स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत

-         राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यपालमुख्यमंत्री यांचे चैत्यभूमी येथे अभिवादन

 

मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेतअसे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले.

चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटसांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमुख्य सचिव सुजाता सैनिकमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीयांची प्रमुख उपस्थिती होती.

 राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणालेडॉ. बाबासाहेबांना भारताच्या संविधानाचे शिल्पकारमहान समाजसुधारक आणि देशभक्त म्हणून गौरविले जाते. बाबासाहेबांनी लोकशाहीसामाजिक समता व लिंग समानतेसाठी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.

राज्यपाल महोदयांनी सांगितले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताना संविधानालाच आपले मार्गदर्शक मानले. इंदू मिल येथे उभारण्यात येणारे              डॉ. आंबेडकर स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi