मोदीसाहेब आणि त्यांचा खडतर प्रवास 🌹💕.
बडोद्यात, आमच्याकडे धनंजय बेहरे नावाचे पौरोहित्य करणारे कोकणस्थ ब्राह्मण होते ते सत्यनारायणाची पूजा, गणेशोत्सव पूजा किंवा उदक शांती वगैरे करायला अनेक वर्षां पासून येतात. त्यांचे वडील, या क्षेत्रात एक नावाजलेली व्यक्ती आहेत आणि त्या शिवाय ते संघांचे खूप जुने आणि सन्माननीय कार्यकर्ता आहेत. मोदीजी त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घ्यायला नेहमीच त्यांच्याकडे येत असत. बेहेरे गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट आज मी इथे share करीत आहे.....
साधारण 35 वर्षांपूर्वी, नरेंद्र मोदी गुजरातमध्ये संघाचे एक साधे कार्यकर्ता होते. संघांचे ऑफिस झाडणे, पुसणे, स्वच्छ ठेवणे, पाणी भरून ठेवणे असली कामे करत आणि संघांचे लोकल काम करत. त्यांच्याकडे एक कपड्याची झोळी आणि जुनी सायकल होती. तेवढाच त्यांचा संसार होता.
एकदा रात्री 10.30 वाजता, बडोद्याला आमच्या गुरुजींच्या घरी ते आले. तेव्हा गुरुजी आणि त्यांचे वृद्ध वडीलच तेवढे घरात होते. त्यांची आई बाहेरगावी गेली होती. आल्याबरोबर मोदीजींनी आधी गुरुजींच्या वडिलांना वाकून नमस्कार केला. ते थकलेले दिसत होते, म्हणून त्यांना जेवले आहात का? असं विचारले, तर ते नाही म्हणाले. मग बेहेरे गुरुजी स्वयंपाकघरात गेले. तर फक्त्त 5/6 इडल्या होत्या. सांभार किंवा चटणी देखील नव्हती. म्हणून त्यांनी त्या इडल्या दह्यात कुस्करून त्यात पिठीसाखर घालून एका वाडग्यात घालून मोदीजींना खायला दिल्या. मोदीजींनी त्या संपवून टाकल्या. त्यांना प्रचंड भूक लागली असावी. बोलता बोलता मोदीजी म्हणाले, *गोधऱ्याला एक कार्यक्रम होता, तो आटोपून, ९० किमी सायकलवर ते बडोद्याला आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना डभोईला जायचे होते, की जे 50 किमी दूर होते*. त्यांनी बेहेरे गुरुजीं सोबत बराच वेळ गप्पा केल्या. रात्री 12.30 ला झोपले. आणि पहाटे लवकर उठून आंघोळ आटोपून ते सायकल मारत डभोईला निघून गेले.
त्यांच्याकडे फक्त्त एक टॉवेल, आणि एक जोडी कपडे असे. बाकी काही नाही. जेवण असेच कोणी दिलं तर, नाहीतर उपाशी देखील झोपत. हे असं आयुष्य त्यांनी अनेक वर्षे घालवले, असं गुरुजी म्हणाले.
गरिबी काय असते, हाल अपेष्टा काय असतात, मेहनत काय असते आणि ती कशी करायची, ती या कर्मयोग्याने अनुभवलेली आहे.
देशभक्त आणि संघाचे संस्कार असलेला, घाम गाळत आणि मेहनत करीत, धगधगत्या मुशीतून निघालेला, एक देशभक्त नेता आपल्याला पंतप्रधान म्हणून मिळाले आहेत, हे आपल्या देशा च भाग्य🙏🏻
. मोदीजी, योगीजी आपल्या कुटुंबाचा त्याग करून, फक्त्त आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सतत रक्त आटवत आहेत, याची आपण कायम आठवण ठेवली पाहिजे आणि त्यांची कदर केली पाहिजे एवढीच विनंती.
🙏🏻🌹💕🤗🙏🏻🌹💕🤗
No comments:
Post a Comment