Wednesday, 12 February 2025

राज्याच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी लोकहिताच्या योजनांचे सुसूत्रीकरण आवश्यक -

 राज्याच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी

लोकहिताच्या योजनांचे सुसूत्रीकरण आवश्यक

- वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल

 

   मुंबईदि. 11 : राज्यातील विविध विभागामार्फत  राबविण्यात येणाऱ्या लोकहिताच्या योजनांमध्ये आर्थिक शिस्तीचे पालन आणि योजनांचे सुसूत्रीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल. तसेच भांडवली गुंतवणुकीवर भर दिल्याने राज्याच्या विकासाचा वेग वाढेलअसे वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

            साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याकरिता उपाययोजना सूचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची मंत्रालयात राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागआदिवासी विकास विभागइतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि अल्पसंख्यांक विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi