Friday, 9 August 2024

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधवांच्या हिताचाच विचार

 वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधवांच्या हिताचाच विचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मच्छिमारस्थानिकांच्या मागण्यांबाबत संवादसमन्वयातूनच मार्ग काढणार

 

            मुंबईदि. ८: - वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचे हितच पाहिले जाईल. मच्छिमार व्यवसायाचे नुकसानतसेच स्थानिकांच्या मागण्यांबाबत बंदर विकास यंत्रणांनी बैठक घेऊनसंवाद आणि समन्वयातून काम करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            वाढवण बंदर समन्वय समितीच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस माजी आमदार कपिल पाटीलमाजी आमदार रविंद्र फाटकमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहलमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेबंदरे व परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजीव सेठीपर्यावरण व वातावरण बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे,  वन विभागाचे सचिव वेणू गोपाल रेड्डीजेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ उपस्थित होते. कोकण विभागीय आयुक्त पी. वेलारासू दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते..

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेवाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या उभारणी पासून ते पूर्ण होईपर्यंत स्थानिकांचे आणि मच्छिमार बांधवांचे हितच पाहिले जाईल. यातून कुणाचंही नुकसान होणार नाहीयाची खबरदारी घेतली जाईल. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि व्यवहार्य असे पर्याय शोधले जातील. बंदर विकासासाठी भूसंपादनअधिग्रहण झाल्यासत्याला विहीतपद्धतीने नुकसान भरपाई मिळेलयाची दक्षता घेतली जाईल. या प्रकल्प उभारणीपूर्वीच जेएनपीए आणि बंदर विभागाने या मच्छिमार बांधवांशी संवाद साधूनत्यांचे म्हणणे जाणून घ्यावे. त्यांच्या शंकांचे समाधान करावे. त्यांच्या व्यवसायाबाबत काही अडचणी असल्यासत्यांना द्यावे लागणारे नुकसान याबाबत सर्वंकष अशी चर्चा करूनत्याबाबतची भरपाई आणि उपाययोजनां पर्याय निश्चित करावेतअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष श्री. वाघ यांनी या बंदरामुळे निर्माण होणाऱ्या रोजगार संधी या स्थानिकांनाच मिळाव्यात यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जात आहेत. बंदराच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रोजगारांसाठी त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षणाचे तीस कार्यक्रम निश्चित केले गेले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील बंदर परिसरातील तालुक्यांत तरुणांसाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

            बैठकीत वाढवण बंदर समन्वय समितीच्यावतीने झाईसातपाटीसह विविध गावांतील मच्छिमार बांधवाच्या मागण्यांची माहिती देण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत समन्वय बैठकांतून सकारात्मक मार्ग काढण्यात येईलअशी चर्चाही यावेळी झाली.

हा प्रकल्प राष्ट्रहिताचा आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या रोजगार संधी निर्माण करण्यासाठी महत्वाचा असल्याने आता जिल्ह्यातील पंधराहून अधिक मच्छिमार संघटनांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi