Friday, 9 August 2024

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे

 राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घरोघरी तिरंगा अभियानाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

 

            मुंबई दि.८- राज्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करुन घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय. एस. चहलविकास खारगेमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरापरिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीजलसंपदा विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि विभागीय आयुक्तजिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेकी घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारे अभियान असून या काळात प्रत्येक दिवशी रॅलीसहमॅरेथॉनसांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमुळे सगळीकडे देशभक्तीमय वातावरण तयार होणार आहे. या अभियानात व्यापक जनसहभाग वाढण्यासाठी समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून जनजागृती करावी. सोबतच घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करुन द्यावा याकरिता जिल्हास्तरावर नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा. राज्यातील प्रमुख धरणांसह मुंबई ट्रान्सहार्बर लिंकवरळी सी लिंकगेटवे ऑफ इंडिया यासारख्या महत्वाच्या ठिकाणी तिरंग्याची रोषणाई करण्यात यावीअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.खारगे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत सादरीकरण केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi