Thursday, 25 July 2024

मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून पुण्यासह राज्याच्या विविध भागातील पाऊस-पाणी, पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खडकवासल्याचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्याचा निर्णय

 मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून पुण्यासह राज्याच्या विविध भागातील

पाऊस-पाणीपूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खडकवासल्याचे पाणी

रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्याचा निर्णय

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

            मुंबईदि. २५ :- खडकवासला धरणाची क्षमता पावणे तीन टीएमसी एवढी आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरण अगोदरच ५० टक्के भरले होते. त्यातच काल दिवसभर आणि रात्री खडकवासला धरणाच्यावरच्या क्षेत्रात ८ इंच आणि पाणलोट क्षेत्रात ५ इंच पाऊस पडला आहे. साधारण ७५ टक्के धरण भरल्यानंतर त्यातून पाणी सोडले जाते. मात्रधरणाच्यावरच्या भागातून तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणी धरणात आले आहे. त्यामुळे खडकवासल्याच्या बाबतीत पाणी सोडण्याची संधी मिळाली नाही. झोपेत असलेल्या नागरिकांना त्रास होऊ नयेनागरिकांची सोय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खडकवासला धरणाचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्यात आलेअशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

            पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर  उपमुख्यमंत्री जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्व करणार आहेत.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीपुणे जिल्ह्यातील पुणेपिंपरी-चिंचवड शहर परिसरासह पाऊस जास्त असणाऱ्या भोरवेल्हामुळशी भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील वरसगावटेमघरखडकवासलापानशेत या धरणात यापूर्वी पाणी कमी असल्यामुळे शहराला काही काळ पुरेल एवढाच पाणीसाठा होता. त्यामुळे त्यातून पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आता या धरण क्षेत्रामध्येही पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यातूनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. मुळशी परिसरात दरड कोसळली आहेतर काही भागात जीवित हानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेतअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

            पूरपरिस्थिती आणि बचावकार्याविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीखडकवासला परिसराबरोबच पुणे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त होते. पुणे शहर परिसरात डांबरी रस्तेक्राँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. वन विभागाच्या जमिनीटेकड्याशासकीय इमारतींचा परिसर सोडला तर इतर ठिकाणी मोकळ्या जागा कमी आहेत. या पार्श्वभूमीवर दोन-तीन दिवस पाऊस पडत असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाली होते. शहरातून वाहणाऱ्या नद्यांची पाणी वहन क्षमता ठरलेली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून नदीकाठावरील काही परिसरातनगररोडएकतानगर यासारख्या सखल भागात पाणी साचले आहे. या भागातील इमारतींमध्येवाहनतळ परिसरातवाहनांमध्ये पाणी शिरले आहे. इमारतीच्या वरच्या भागात नागरीक सुरक्षित आहेतत्यांना खाली येण्याचे आवाहन करून सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे.

            सध्या नागरिकांना अडचणीतून बाहेर काढण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीपूरपरिस्थितीतून नागरिकांचा बचाव करण्याची कर्यवाही युद्धपातळीवर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी पूरग्रस्त भागात पोहोचले आहेत. माझ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलकेंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळआमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून मदत व बचाव कार्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. नागरिकांच्या मदत व पुनर्वसनासाठी सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्यांच्याकडून विविध ठिकाणी मदत व बचावकार्य सुरु आहे.

            हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचे अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टतर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित ठिकाणी मदत व बचावकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला व घाटकोपरठाणेरायगडपालघररत्नागिरीसिंधुदुर्गसातारासांगली अशा जिल्ह्यांमध्ये एकूण १८ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकेतसेच ६ राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेतअशी माहितीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

००००

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi