Wednesday, 17 January 2024

जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या आर. विमला यांची मुलाखत

 जय महाराष्ट्रदिलखुलास’ कार्यक्रमात

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या आर. विमला यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात 'मध महोत्सव-2024' या विषयावर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे परिणामकारक माध्यम आहे. महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला यापासून प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय असून त्यासाठी मंडळामार्फत विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मंडळामार्फत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 18 व 19 जानेवारी रोजी देशातील पहिला 'मध महोत्सवआयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावीअसे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी जय महाराष्ट्र’ आणि दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 17 आणि गुरुवार दि. 18 जानेवारी 2024  रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवारदि. 17 जानेवारी, 2024 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi