Sunday, 14 January 2024

रामरक्षा पठण कार्यक्रमात एक कोणालाच माहीत नसलेली गोष्ट

 आजच्या SP कॉलेज ला संपन्न झालेल्या रामरक्षा पठण कार्यक्रमात एक कोणालाच माहीत नसलेली गोष्ट अभिनेते राहुल सोलापूरकरांनी सांगितली ती अशी-

अयोध्येच्या राम मंदिराचं बांधकाम कोर्टाच्या 2019 च्या निर्णयानंतर सुरू झाल्यावर, त्याच परिसरात असलेली रामलला ची मूर्ती एका अस्थाई मंदिरात शिफ्ट करायची होती.त्या साठी मुहूर्त जो ठरला होता तो होता  मार्च 2020 चा, नेमका त्याच दरम्यान संपूर्ण भारतात कोरोना सुरू झालेला होता आणि त्यामुळे कुणालाच राम लला च्या मिरवणुकीत सहभागी होता येणार नव्हतें आणि रामाला वाजत गाजत नेता येणार नसल्याने योगी आदित्यनाथ काळजीत होते. त्यांनी मोदींना फोन लावून सांगितलं की रामाची मिरवणूक दणदणीत व्हायला हवी तेव्हा मोदींनी सांगितल की ते मी।बघून घेईन.. आणि तो दिवस होता 25 मार्च 2020 गुढीपाडवा त्या दिवशी सर्व देश वासीयांना थाळी, घंटा नाद तसेच देवाजवळ दिवा लावायला सांगितला गेला... कुणालाच माहिती नव्हते की असे का सांगितले गेलेय.. आणि त्या दरम्यान योगी आदित्य नाथ ह्यांनी स्वतः 1.3 km चालत जाऊन डोक्यावर राम लला ची मूर्ती घेऊन 5 महंत आणि 3-4 सेक्युरिटी गार्ड घेऊन     शिफ्ट केली.. तेव्हा संपूर्ण देशवासी थाळी वाजवत होते परन्तु कुणालाही ह्याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.. नंतर मोदींनी आदित्यनाथ ह्यांना सांगितले की 100 कोटी  लोकांना सोबत घेऊन इतकी वाजत गाजत मिरवणूक अयोध्येत  तरी होऊ शकली असती का 😄.... मुख्य म्हणजे ह्यात आस्तिक नास्तिक सगळेच थाळ्या वाजवत होते... जय श्रीराम!🚩

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi