Monday, 26 September 2022

शारदीय नवरात्र आणि आयुर्वेद*_

 *नवरात्र नेहमीचंच ! पण दृष्टिकोन वेगळा !!*

_*शारदीय नवरात्र आणि आयुर्वेद*_


_अश्विन महिन्यात साजर्‍या होणार्‍या, "या" शारदीय नवरात्रात दुर्गेच्या ९ रुपांचं पूजन केलं जातं._

या नवदुर्गांचा एक श्लोक आहे - 


_*प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी ।*_

*तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।*

_*पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च ।*_

*सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।*

_*नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।*_

*उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।*


या ९ दुर्गा म्हणजेच दुर्गेची ९ रूपे !

ही रूपे ९ औषधी वनस्पतींमध्ये विराजमान झालेली आहेत. *ज्याप्रमाणे ९ देवी आहेत, त्याप्रमाणेच या ९ वनस्पतींना वैद्यकीय उपचार पद्धतींच्या नवदुर्गा म्हटलं जातं.* _९ दुर्गांची उपासना मनुष्याची आध्यात्मिक उन्नती करतात; तर या औषधी वनस्पतींच्या रूपातील नवदुर्गा मनुष्याच्या शरीराचं समस्त व्याधींपासून रक्षण करतात._


*"मार्कंडेय वैद्यकीय उपचार पद्धती"त सर्वप्रथम नवदुर्गांच्या या ९ औषधी स्वरुपांना स्थान दिलं गेलं.* _ब्रह्मदेवांनी हे ज्ञान "दुर्गाकवच" रुपात मार्कंडेय ऋषींना दिलं._ *सर्व प्रकारच्या रोगांवर रामबाण उपाय असणाऱ्या या औषधी वनस्पती मनुष्याचं रक्षण करतात.* म्हणजेच _एक प्रकारे या वनस्पती मनुष्यासाठी ''कवच''च आहेत, त्यामुळे यांना "दुर्गाकवच" म्हटलं जातं._ 


या औषधी वनस्पतींमुळे मनुष्य निरोगी दीर्घायुष्य जगू शकतो. मार्कंडेय पुराणानुसार, या ९ औषधी वनस्पती निरनिराळ्या रोगांना बरं करत; रक्त शुद्ध करत; रक्ताभिसरण नीट करत; मनुष्याला बरं करतात. त्यामुळे *मनुष्याने या वनस्पतींची आराधना करीत यांचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे.*


_*आता आयुर्वेदातील "या" नवदुर्गांबद्दल -*_


१. पहिली, *शैलपुत्री म्हणजेच हरड किंवा हिरडा ही वनस्पती* - 

पहिली दुर्गा शैलपुत्री आणि आयुर्वेदात तिचं रूप *हरड* या वनस्पतीत आहे. हिलाच *हिमावती* असंही म्हणतात. आयुर्वेदात हिचं स्थान महत्त्वाचं आहे, आणि ही वनस्पती ७ प्रकारची आहे. *हरीतिका किंवा हरी* ही भय किंवा भीती घालवते, *पथया* ही शरीराला हितकारक आहे, *कायस्थ* ही शरीराला सुदृढ करते, *अमृता* ही अमृतासमान म्हटलेली आहे, *हेमावती* ही हिमालयावर असणारी, *चेतकी* ही चित्त प्रसन्न करणारी, *श्रेयसी* यश देणारी, *शिवा* ही कल्याणकारक आहे. 

आता यातून शैलपुत्रीची आराधना कशी होईल, तर _*हिरडा ही वनस्पती औषध म्हणून उपयोगात आणून तुम्ही या दुर्गेची उपासना करू शकता.*_


२. दुसरी *ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी* - 

_ही वनस्पती आयुर्मान वाढवते. हिच्यामुळे स्मरणशक्ती वाढते. ही रक्तदोषांना संपवते आणि स्वर मधुर करते. म्हणूनच *ब्राह्मीला सरस्वतीही* म्हटलं जातं._ ही मन आणि मेंदूला मजबूत करण्याचं काम करते. जठर आणि लघवी संबंधित व्याधींना शरीरातून बाहेर टाकते. 


३. तिसरी *चंद्रघंटा म्हणजेच चंद्रशूर किंवा चमसूर* - 

ही वनस्पती कोथिंबिरीसारखी असते. हिच्या पानांची भाजी करतात, जी खूप पौष्टिक असते. *ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते, म्हणून हिला _चर्महंती_ असंही म्हणतात.* _शक्तिवर्धक, हृदयरोगाला बरं करणारी अशी ही चंद्रिका वनस्पती आहे._


४. चौथी *कुष्मांडा म्हणजेच कोहळा* - 

कोहळ्यापासूनच पेठा ही मिठाई केली जाते. _*कोहळा शरीरातील बळ वाढवतो. वीर्य वाढवतो. रक्ताचे विकार बरे करतो. पोट साफ ठेवतो.*_ जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली आहे, त्यांच्यासाठी कोहळा हा अमृतासमान आहे. कोहळा हा *शरीरातील दोषांना दूर करत हृदयरोग बरा करतो. पित्ताचा त्रास याने बरा होतो.*


५. पांचवी *स्कंदमाता म्हणजेच अळशी किंवा जवस* - 

वात, पित्त, कफ अशा व्याधींचा नाश अळशी करते. 


६. सहावी *कात्यायनी म्हणजेच अंबाडी* - 

अंबा,अंबिका,अंबालिका,माचिका अशा वेगवेगळ्या नावांनी अंबाडी ओळखली जाते. *पित्त,कफ तसेच गळ्याचे आजार यांना बरी करते.*


७. सातवी *काळरात्री म्हणजेच नागदवण* -

_ही वनस्पती सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करते. मन आणि मेंदूचे विकार बरे करते. विजयश्री मिळवून देते._ या वनस्पतीची लागवड घरी करावी. _ही वनस्पती घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकत घराला सौख्य मिळवून देते._ *ही सर्व प्रकारच्या विषावरही जालिम उपाय आहे.*


८. आठवी *महागौरी म्हणजेच तुळस* - 

तुळस ही एक सर्वांच्या ओळखीची औषधी वनस्पती आहे. ही प्रत्येक घरात लावली जाते. _तुळस सात प्रकारची असते - *पांढरी, काळी, मरुता, दवना, कुढेरक, अर्जक, षटपत्र*._ _तुळशीचे हे सर्व प्रकार रक्त शुद्ध करतात. ही हृदय रोगावर हितकारक आहे._


९. नववी *सिद्धिदात्री म्हणजेच शतावरी* - 

हिला *नारायणी* असेही म्हणतात. _शतावरी वनस्पती बुद्धिबलवर्धक तसेच वीर्यासाठी उत्तम अशी औषधी वनस्पती आहे. रक्तविकार तसेच वातपित्त शोधनाशक आहे. हृदयाला बळ देणारी महाऔषधी वनस्पती आहे._ शतावरी वनस्पतीचे नियमानुसार सेवन केल्याने सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात.


*या आहेत आयुर्वेदाच्या नवदुर्गा.* यांचं औषध म्हणून योग्य प्रमाणात सेवन केल्यास मनुष्य त्या आजारातून बरा होऊन: योग्य रक्ताभिसरण होत, संपूर्ण निरोगी होतो. _असं मार्कंडेय पुराण सांगतं._


_*या आयुर्वेदिक नवदुर्गांची आराधना म्हणजेच या वनस्पतींना औषध म्हणून स्विकारत त्यांचं सेवन करणे.*_


【अर्थातच, हे सगळं जाणकार तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच करणे अपेक्षित आहे.】

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi