औरंगाबादच्या निजामकालीन बंधाऱ्यांची दुरूस्ती करू
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई, दि. 11 : औरंगाबाद जिल्ह्यातील निजामकालीन बंधारे हे दोनशे पन्नास वर्षापूर्वीचे आहे. येथील 4 निजामकालीन बंधाऱ्यापैकी एक बंधारा पुलाच्या खाली असल्याने तो बऱ्यापैकी आहे. अन्य बंधारे हे नादुरुस्त असल्याने आवश्यक विशेष दुरूस्ती व पुनर्रचना करून व जल संचय क्षेत्रातील गाळ झुडपे काढून साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यात येईल. तसेच या निजामकालीन बंधाऱ्यांची दुरूस्ती व डागडुजी करून पर्यटनाच्या दृष्टीने जलसंपदा विभागाकडून रक्कम खर्च करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सतिश चव्हाण यांनी विचारला होता.
No comments:
Post a Comment