नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीबाबत लवकरच निर्णय.
- बाळासाहेब पाटील
मुंबई, दि. 24 : नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयाची तीन मजली प्रशासकीय इमारत कांदा-बटाटा मार्केटमध्ये असून या इमारतीची दुरावस्था झाली असल्याने त्याचे स्थलांतरण करण्यात आले आहे. या इमारतीच्या दुरूस्ती कामात उच्च न्यायालयाने काही सूचना, आक्षेपांचा विचार करण्याबाबत आदेशित केल्यामुळे यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता.
000
No comments:
Post a Comment