राज्यपालांच्या उपस्थितीत दृष्टिहीन स्नातकांचा पदवीदान सोहळा संपन्न
परफ्युम क्षेत्रातील दृष्टिहीन स्नातकांच्या यशाचा सुगंध सर्वत्र दरवाळावा : राज्यपाल
मुंबई, दि. 20 : दृष्टिहीन विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांइतकेच प्रतिभावंत असतात. आज अनेक क्षेत्रांत दृष्टिहीन तसेच दिव्यांग विद्यार्थी सर्वसाधारण विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. अशावेळी त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजे असे सांगताना परफ्युम क्षेत्रातील दृष्टिहीन स्नातकांच्या यशाचा सुगंध सर्वत्र दरवाळावा अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) द्वारा संचालित परफ्युमरी कॉलेजचा पहिला पदवीदान समारंभ शुक्रवारी (दि. 20) राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व सीपीएल ऍरोमा कंपनी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला 2 वर्षांच्या ‘सुगंधी द्रव्य पदविका’ अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या 17 स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदविका प्रमाणपत्र देण्यात आली.
ब्रेल लिपीचा शोध लागणे ही दृष्टिहीन व्यक्तींच्या उत्थानासाठी अतिशय महत्वाची घटना होती असे सांगून तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज अनेक क्षेत्रात दृष्टिहीन लोक आत्मनिर्भर झाले आहेत. सुगंधी द्रव्य क्षेत्राप्रमाणेच इतर अनेक क्षेत्रात दृष्टिहीन विद्यार्थी आपली क्षमता सिद्ध करतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. नॅब संस्थेच्या कार्याला मदत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.
सहानुभूती नको, समान संधी हवी
नॅब ही राष्ट्रीय संस्था नर्सरी ते वृद्धाश्रमापर्यंत सर्व वयोगटाच्या दृष्टिहीन लोकांसाठी काम करीत असल्याचे मानद सचिव सत्यकुमार सिंह यांनी सांगितले. राज्य शासनाने दृष्टिहीन लोकांसाठी शासकीय सेवांमध्ये ४ टक्के जागा राखीव ठेवाव्या तसेच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये फिजिओथेरपिस्टचे किमान एक पद दृष्टिहीन व्यक्तींमधून भरले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दृष्टिहीनांना सहानुभूती नको तर समान संधी हवी आहे असे त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष हेमंत टकले, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन व सीपीएल ऍरोमाजचे महाव्यवस्थापक रणजित अग्रवाल यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या कार्यकारी संचालक पल्लवी कदम यांनी सूत्र संचालन केले तर कौशल मिश्र यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी अमृता प्रदीप शिगवण, ऐश्वर्या नारायण ममदे, विद्या बाबुलाल प्रजापती, सिंधू प्रभाकर कल्लाट, रोहीत अशोक विश्वकर्मा, राज प्रकाश मकवाना, रितीक प्रवीण वैष्णव, प्रमोद सुभाष पवार, माझ अहमद अन्सारी, ओंकार रवींद्र कुल्ये, कौशिक गणेश रावराणे, प्रशांत सदानंद विणेरकर, हर्षवर्धन पांडुरंग हंबीर, अनिल पाटील मयूर, सुमित नामदेव मानकर, फैसल मेहमूद मसानिया व प्रिती किशोर राऊत या विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
0000
Governor presides over
Convocation of Visually Impaired Students
Mumbai, 20 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Convocation Ceremony of the NAB Perfumery College and presented Diploma Certificates to 17 Visually Impaired students at Raj Bhavan, Mumbai.
The 2- year diploma programme in Perfumery was designed by NAB in association with the Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU) and CPL Aromas Pvt Ltd.
President of NAB India Hemant Takale, Vice Chancellor of YCMOU Prof. E. Vayunandan, General Secretary, NAB Satya Kumar Singh, General Manager of CPL Aromas Pvt. Ltd. Ranjit Agarwal and Executive Director of NAB Pallavi Kadam were present.
The Governor presented the diploma certificates to Prajapati Vidya Babulal, Kallat Sindhu Prabhakaran, Vishwakarma Rohi Ashok, Makwana Raj Prakash, Vaishanav Ritik Pravin, Pawar Pramod Subhash, Ansari Mazz Ahmed, Kulaye Omkar Ravindra, Raorane Kaushik Ganesh, Vinerkar Prashnat Sadanand, Hambir Harshwardhan Pandurang, Mayur Anil Patil, Mankar Sumit Namdeo, Masania Faisal Mehmood, Raut Priti Kishore, Shivgan Amruta Pradip, Mamde Aishwarya Narayan.
0000
राजधानीत सद्भावना दिन साजरा
नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. यावेळी श्री गोयल यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी- कर्मचारी यांनी दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली .
महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा
महाराष्ट्र परिचय केंद्रात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची शपथ दिली. श्रीमती अरोरा यांनी यावेळी दिवंगत राजीव गांधी यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांनी दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.
No comments:
Post a Comment