Thursday, 19 August 2021

 मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्याच्या

उपायांबाबत प्राधान्याने विचार करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       भारतीय वनसेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद

 

          मुंबईदि. 18 : - मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळता येईलअशा उपाययोजनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. भारतीय वनसेवेत काम करण्याची वेगळी वाट तुम्ही निवडली आहे. त्यामध्ये काहीतरी वेगळे करायचे ध्येय्य ठेवाअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रात नियुक्त परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला. या संवादादरम्यान मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.  

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेजंगलात राहणाऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कसे कमी करता येईलयाचे प्रयत्न व्हायला हवे. त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. मानव व वन्यजीव हा संघर्ष कसा कमी होईल यासाठीच्या उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी महसूलग्रामविकास आणि वनविभाग अशा विविध विभागांनी समन्वय राखावा लागेल. एकीकडे जंगल वाचविणे आणि दुसरीकडे त्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन याचा विचार करणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रातील विकासकामांच्या बाबतीत रस्तेरेल्वे मार्ग करताना वन्यजीवांचाही प्राधान्याने विचार करायला हवा. त्यांचे मार्ग सुरक्षित राहतीलअसे पूलउन्नत मार्ग असे पर्याय उभे करावे लागतील. भारतीय वनसेवेत दाखल होण्याचा तुमचा निर्णय वेगळी वाट चोखळणारा आहे. आयुष्यात नवे काही तरी करायचेअसे ठरवा आणि ते निश्चयपूर्वक करा, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वृक्षारोपणजंगल क्षेत्र वाढविण्याचे उपाय तसेच वन्यजीवांचे रक्षण याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारीराज्याचे मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटेतसेच सहा परिविक्षाधीन अधिकारी आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi