Friday, 6 August 2021

 ❄️ *कर्म*❄️


श्रीकृष्णाने कंसाला मारल्यावर, वासुदेव व देवकी, अर्थात त्याचे आई आणि वडील, यांना तुरूंगात सोडवण्यास आला. 


देवकी माताने उत्सुकतेने विचारले, “बाळा, तु स्वःतच देव आहे, आणि तुझ्याजवळ तर दैवी शक्ती सुद्धा आहेत; मग, तु कंसाला मारण्यास आणि आम्हाला सोडवण्यासाठी चौदा वर्षाची वाट का बघितलीस?”


श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाला, “आदरणीय माते, क्षमा कर. पण मागच्या जन्मी तु मला चौदा वर्ष वनवासासाठी जंगलात का पाठवले होतेस?”


देवकी खुप आश्चर्यचकीत झाली आणि तिने नाकारत म्हणाली, “कृष्णा, हे कस अशक्य आहे? हे तु कशावरून म्हणतोस?”

श्रीकृष्णाने शांततेने उत्तर दिले, “माते, तुला मागच्या जन्माबद्दल काही आठवणार नाही. मागच्या जन्मी तु कैकयी होतीस आणि पिता दशरथ होते.”


देवकी खुप आश्चर्यचकीत झाली आणि तिने कुतुहलाने विचारले, “मग, आता कौसल्या कोण आहे?”


श्रीकृष्णाने उत्तर दिले, “माता यशोदा. मागच्या जन्मी जे चौदा वर्षाचे मातृप्रेमाला ती वंचीत राहिली, ते तिला ह्या जन्मी मिळाले”


कर्माचे फळ सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका झालेली नाही. 


आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा.

स्वार्थ सोडुन, सर्व धर्माची, देशाची, समाजाची आणि कुटुंबांची सेवा करत रहा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi