Thursday, 16 April 2026

महिला व बालविकास विभागातील पदभरतीचे निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

 महिला व बालविकास विभागातील पदभरतीचे

निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

- मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि.१६ : महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग देण्यात यावा. विशेषतः वर्ग ३ व ४ च्या सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

 

पदभरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सचिव डॉ. अनुपकुमार यादवआयुक्त माधवी सरदेशमुख तसेच सहसचिव वि. रा. ठाकूर, उपायुक्त गिरासे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीविभागातील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल अंतिम टप्प्यात असूननिकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदे भरून सेवा वितरण अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.

 

मंत्री आदिती तटकरे यांनी भरती प्रक्रिया पारदर्शकवेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देतनिकाल जाहीर करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळणार असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही गुणवत्ता वाढणार आहे.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन

निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल

-        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणे दि.१६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. नव्या काळांची आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड झालेल्या चितळे बंधू’ आणि राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलआमदार भीमराव तापकीरसिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकरइंद्रनील चितळेगोविंद चितळेश्रीकृष्ण चितळेकेदार चितळे आदी उपस्थित होते.

व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगातील आधुनिक सुविधा उभ्या रहात असल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेचितळे बंधूंची दूरदृष्टी या सुविधेतून पहायला मिळते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली उत्तम दर्जाची यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे. परदेशी  यंत्रांमध्ये अनुभवाच्या आधारे आवश्यक बदल करून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. नूतनीकरणीय ऊर्जेचा उपयोग इथे करण्यात आला आहे.

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’चा

 या उपक्रमाचा प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट करताना रावल यांनी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचा उल्लेख केला. या संस्थेने वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील मुलांसोबत काम करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणेजीवनकौशल्ये विकसित करणे आणि शाश्वत रोजगाराच्या संधी मिळवून देणे यासाठी मोठे योगदान दिले आहे. गेल्या १५ वर्षांत एका पिढीला अनिश्चिततेतून संधींकडे आणि असुरक्षिततेतून आकांक्षेकडे नेण्याचा हा प्रवास आहेअसे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अक्षय पात्र फाउंडेशनच्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळत असूनत्यामुळे त्यांच्या शिक्षणात सातत्य राखले जात आहेअशी माहिती त्यांनी दिली. 

 

टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून६० हून अधिक देशांतील सहभागामुळे राज्याची मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्याची क्षमता अधोरेखित झाली आहेअसेही त्यांनी नमूद केले. हा उपक्रम विश्वासाचा क्षणपरिवर्तनाची शक्ती आणि भारत काय साध्य करू शकतो याचे द्योतक आहेअसे सांगत रावल यांनी आपण केवळ अंतरासाठी नव्हेतर बदलासाठी धावूयाअसे आवाहन केले.

 

टाटा मुंबई मॅरेथॉन परिवर्तनाचा मंच

 टाटा मुंबई मॅरेथॉन परिवर्तनाचा मंच

-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १५ - टाटा मुंबई मॅरेथॉन ही केवळ मॅरेथॉन नसून सामूहिक देणगीची शक्ती अधोरेखित करणारा परिवर्तनाचा मंच आहेअसे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

 

हॉटेल ट्रायडेंट येथे टाटा मुंबई मॅरेथॉन आयोजित ग्रॅटिट्यूड कार्यक्रमात राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मॅरेथॉनसाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी 'ही धाव अंतरासाठी नाही तर बदलासाठी आहेया शब्दात या उपक्रमाचे कौतुक केले.

 

राजशिष्टाचार मंत्री रावल म्हणालेदोन दशकांपूर्वी प्रोकॅम इंटरनॅशनलने मांडलेली ही संकल्पना आज जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे. त्याचप्रमाणे ही मॅरेथॉन एक प्रभावी परोपकारी व्यासपीठ म्हणून उभी राहिली आहे. या मॅरेथॉनद्वारे आतापर्यंत ७५०० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्यात आला असूनयावर्षीच सुमारे ७६० कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. उद्दिष्ट आणि योग्य रचना यांचा संगम झालाकी मोठ्या प्रमाणावर परिणाम साधता येतोयाचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातही महिलांना कर्तृत्वाच्या सर्व संधी खुल्या

 महाराष्ट्रातही महिलांना कर्तृत्वाच्या सर्व संधी खुल्या

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहाराष्ट्रातही सध्याच्या काळात पहिल्यादाच अतिशय जबाबदारीच्या व महत्त्वपूर्ण पदावर महिला पोहोचल्या आहेत.महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपहिल्या पोलीस महासंचालकपहिल्या बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त ही पदे महिलांनी कर्तुत्वाने मिळवली आहेत. महिलांना कर्तृत्वाच्या सर्व संधी खुल्या झाल्या आहेत असे त्यांनी नमूद केले.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सुरुवातीला सरपंच पती’ किंवा नगरसेविका पती’ यांसारख्या प्रवृत्ती दिसून येत होत्यामात्र कालांतराने महिला स्वतःच्या क्षमतेवर निवडून येऊन प्रभावीपणे कार्य करू लागल्याअसे त्यांनी स्पष्ट केले.

उष्णतेच्या लाटांबाबत" ‘दिलखुलास’कार्यक्रमाच्या विशेष भागातून जनजागृती

 उष्णतेच्या लाटांबाबत" दिलखुलासकार्यक्रमाच्या विशेष भागातून जनजागृती

 

मुंबईदि. 16 : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावीतसेच उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या मानक कार्यपद्धती विषयी सविस्तर माहिती देणारा विशेष भाग प्रसारित करण्यात येत आहे.

 

दिलखुलास’ कार्यक्रमातून हा विशेष भाग शुक्रवार दि. 17एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे.

 

उष्णतेचा प्रभाव असलेल्या देशातील दहा प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होत असूननागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. विशेषतः बाहेर काम करणारे डिलिव्हरी कर्मचारीमजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्या सुरक्षेसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) मध्ये महत्त्वपूर्ण उपाययोजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दिवसा काम टाळता न येणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी तीन स्वतंत्र एसओपी तयार करण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांच्या सखोल अभ्यासावर आधारित या एसओपी मध्ये बाहेर काम करणारे असंघटित कामगारखाणकामगार तसेच उष्णतेला तोंड देणाऱ्या घरांच्या संकल्पनांचा समावेश आहे. एप्रिलमे आणि जून या तीव्र उष्णतेच्या काळात जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांमार्फत या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असूनया कालावधीत नागरिकांनी कशा प्रकारे दक्षता घ्यावीयाची सविस्तर माहिती 'दिलखुलासकार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

0000

शिधावाटप भरारी पथकाची डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड: 4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्त; एक आरोपी ताब्यात

  

शिधावाटप भरारी पथकाची डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड:

4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्तएक आरोपी ताब्यात

 

मुंबई, दि. 16 : शिधावाटप भरारी पथकाने मोठी कारवाई करत ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड  टाकून 4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्त केल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

 

            धाडीदरम्यान स्टोअरच्या तळघरात विविध तेल कंपन्यांचे सिलेंडर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले आढळले. यामध्ये एचपीसीएलबीपीसीएलआयओसी आणि गो गॅस कंपनीचे एकूण 140 सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यापैकी 55 सिलेंडर भरलेले तर 85 सिलेंडर रिकामे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरची एकूण किंमत 4 लाख 59 हजार 400 रुपये इतकी असून हा संपूर्ण मुद्देमाल सीलबंद करण्यात आला आहे. ही कारवाई अवैध साठा व नियमबाह्य वापराच्या संशयावरून करण्यात आली. या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला चितळसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

 

 नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठाचर्चगेट यांच्या आदेशानुसार तसेच उपनियंत्रक शिधावाटप ’ परिमंडळठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आलेल्या या कारवाईत भरारी पथकातील अधिकारीशिधावाटप कार्यालय क्र. 41 ‘’ ठाणे येथील कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी सहभागी होते. व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर आणि बेकायदेशीर साठा रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहे.

००००

Featured post

Lakshvedhi