Friday, 15 May 2026

महाराष्ट्रात राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत क्वांटम तंत्रज्ञान व कौशल्यविकास उपक्रमास मंजुरी

 महाराष्ट्रात राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत

क्वांटम तंत्रज्ञान व कौशल्यविकास उपक्रमास मंजुरी

 

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         क्वांटम क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय

 

मुंबई, दि.१४ : केंद्र  सरकारने २०२३ मध्ये ६ हजार कोटींच्या तरतुदीसह राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संप्रेषण, क्वांटम सेन्सिंग आणि क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत भारताला जागतिक स्तरावर अग्रणी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या राष्ट्रीय उपक्रमाशी सुसंगत राहून महाराष्ट्र शासनाने राज्यात क्वांटम तंत्रज्ञान व कौशल्यविकास उपक्रम राबविण्यास मान्यता दिली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सदर उपक्रमांतर्गत आय-हब क्वांटम टेक्नॉल फाऊंडेशन, आयआयएसईआर पुणे ही संस्था हब म्हणून कार्य करणार असून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई, तसेच विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर या संस्था स्पोक संस्था म्हणून सहभागी राहणार आहेत.

ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्काची माहिती सूचना फलक व प्रवेश माहितीपुस्तिकेत नमूद करणे आवश्यक

 ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्काची

माहिती सूचना फलक व प्रवेश माहितीपुस्तिकेत नमूद करणे आवश्यक

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्काची संपूर्ण माहिती देण्याचे महाविद्यालयांना निर्देश

 

मुंबई, दि. १४ : उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काबाबत संपूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

            मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, नुकताच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाला असून, सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरण यांच्या नियमानुसार व मान्यतेनुसार आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क, ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर शुल्क यांची अद्ययावत माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात सूचना फलकावर लावणे अनिवार्य करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रवेश शुल्काबाबतची संपूर्ण माहिती शुल्कासहित महाविद्यालयाच्या प्रवेश माहितीपुस्तिकेत आवश्यक असलेल्या भागात अनिवार्यरित्या नमूद करण्यात यावी. शुल्काबाबतची माहिती आणि प्रवेश माहितीपुस्तिकेतील शुल्काबाबतची माहिती सर्व प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वी देणे ही संबंधित महाविद्यालयांची जबाबदारी राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शुल्काबाबतची माहिती सूचना फलकावर आणि प्रवेश माहितीपुस्तिकेमध्ये दिसण्याबाबतची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ आणि संबंधित विभागीय सहसंचालक यांची राहील.

सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांनी बाब आपल्या अधिनस्त आणि संलग्नित महाविद्यालयांना आपल्या स्तरावरून तात्काळ सूचित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही, याची दक्षता संबंधित महाविद्यालयांनी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील, असे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी या आवाहनाची गांभीर्याने

 भारताची आयात आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारताला पाठबळ देण्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असेही संचालनालयाने नमूद केले आहे. जीवनशैलीतील बदलांच्या अनुषंगाने स्थानिक पर्यटनाला चालना देणे यांसारख्या उपक्रमांचा अवलंब करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घ्यावी. शैक्षणिक संकुलांमध्ये या विषयावर चर्चासत्रे, शैक्षणिक आणि जनजागृती मोहिमा राबवून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या माहितीचे सहकार्य करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 सर्व संबंधितांनी आपल्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना या संदर्भात तात्काळ सूचना निर्गमित कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे उच्च शिक्षण संचालनालयाने कळविले आहे, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.


भारताची आयात आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारताला पाठबळ देण्यासाठी

 संस्थांनी तत्काळ किंवा अपरिहार्य असल्यासच परदेश दौरे करावेत. तसेच महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या बैठकांव्यतिरिक्त इतर बैठका प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्याऐवजी ऑनलाइन माध्यमातून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारताची आयात आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारताला पाठबळ देण्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असेही संचालनालयाने नमूद केले आहे. जीवनशैलीतील बदलांच्या अनुषंगाने स्थानिक पर्यटनाला चालना देणे यांसारख्या उपक्रमांचा अवलंब करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घ्यावी. शैक्षणिक संकुलांमध्ये या विषयावर चर्चासत्रे, शैक्षणिक आणि जनजागृती मोहिमा राबवून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या माहितीचे सहकार्य करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 सर्व संबंधितांनी आपल्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना या संदर्भात तात्काळ सूचना निर्गमित कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे उच्च शिक्षण संचालनालयाने कळविले आहे, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी इंधन बचतीबाबत जनजागृती उपक्रम राबवावे

 विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी

इंधन बचतीबाबत जनजागृती उपक्रम राबवावे

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         सार्वजनिक वाहतूक वापर, इंधन बचत आणि स्वदेशी वस्तूंच्या

वापराबाबत उच्च शिक्षण संचालनालयाच्या सूचना

मुंबई, दि. १४: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने केलेल्या आवाहनानुसार देशाची आर्थिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी आणि विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर, इंधन बचत, स्वदेशीचा आग्रह, परदेशी दौरे आणि जीवनशैलीत बदल याबाबत उच्च शिक्षण संचालनालय यांनी विद्यापीठ, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, यासंदर्भात सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना कळविण्यात आले आहे. शक्य असेल तेथे खासगी वाहनांचा वापर टाळून मेट्रो रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. यामुळे इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. पेट्रोल आणि डिझेलचा मर्यादित वापर करणे, ऊर्जेची बचत वाढविणे आणि यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले आहे. कार पूलिंग सारख्या संकल्पनांनाही प्रोत्साहन द्यावे, असे सांगण्यात आले आहे.

 संस्थांनी तत्काळ किंवा अपरिहार्य असल्यासच परदेश दौरे करावेत. तसेच महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या बैठकांव्यतिरिक्त इतर बैठका प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्याऐवजी ऑनलाइन माध्यमातून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Thursday, 14 May 2026

देशी गायींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, सुधारणाशासन निर्णय (क्र. 202605131138212501

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र असे नामकरण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय (क्र. 202605131138212501) कृषी विभागाने जारी केला आहे.

देशी गायींचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, सुधारणा आणि संशोधन करण्याच्या उद्देशाने पुणे येथील कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. या केंद्राच्या बळकटीकरणालाही यापूर्वी शासनाने मान्यता दिली होती.

पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास शासनाची मान्यता

 पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास

अजितदादा पवारयांचे नाव देण्यास शासनाची मान्यता

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि. १३ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण अशा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. देशी गायींच्या मौल्यवान व दुर्मिळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात या केंद्रास त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रास अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi