Sunday, 8 March 2026

नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना

 नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना

       राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रिकरण करुन पशुधनात स्वयंपूर्णता, रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गो-पालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम सुरु करणार असून  मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेमध्ये  प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये देण्यात येणार आहे,त्याचा  20,594 मासेमारांना लाभ मिळेल.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु राहणार असून यासाठी  यंदा सुमारे 20,000 कोटींची तरतूद असून फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये दिले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मध्ये 16 हजार मे.वॅ. ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट असून, यातून 100 टक्के कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा तसेच डिसेंबर 2026 पर्यंत 10 हजार मे.वॅ. क्षमता स्थापित होणार आहे. सध्या  3349 मे.वॅ. क्षमता स्थापित आहे.तर  मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत आतापर्यंत 6,63,324 सौर कृषीपंप दिले असून सौर कृषीपंप  अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकवर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार

  अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून राज्य शासन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक उभारणार असून  अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नव्यापिढीला महाकवी कालिदास यांच्या साहित्याची ओळख व्हावी,

 जगदगुरु तुकाराम महाराजांचे देहू येथील घर आणि जन्मस्थानाचे जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. नवरगाव, रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करण्यात येणार आहे. नव्यापिढीला महाकवी कालिदास यांच्या साहित्याची ओळख व्हावी, त्यांचे  जीवनचरित्र नव्या पिढ्यांना कळण्यासाठी चित्रपट निर्मिती करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  रामटेक विकास आराखडा टप्पा-2 ची कामे करणार असून पंढरपूर मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामे हाती घेणार असून 5 ज्योर्तिलिंग विकासाची कामे सुरु असून महानुभाव पंथीय विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुविधांसाठी निधी देणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

2026-27 हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार

 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार

महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती 11 एप्रिल 2026 यावर्षी आहे.

 त्यासाठी  एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येईल, त्यासाठी निधी देणार असून महात्मा फुले यांचे जन्मगाव मौजे कटगुण, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारणार आहे. तसेच  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र आणि  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा तयार करणार आहे. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी, अंतिम श्रद्धास्थान यांना एकत्रित करुन संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय अभियाने एकत्र करुन संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येणार आहे. 75 गावांत ‘एआय’च्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार असून  महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिंचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलासा : कर्जमाफीची घोषणा

 शेतकऱ्यांना दिलासा : कर्जमाफीची घोषणा

 

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसींनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करण्यात येईल. जानेवारी 2026 पर्यंत 1 कोटी 31 लाख फार्मर्स आयडी तयार करण्यात आले आहेत. आता त्यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी समाविष्ट करणार असून कृषी समृद्धी योजनेंतर्गत  2026-27 पासून 4 वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवणार आहे. तसेच  नवीन प्राकृतिक शेती अभियानात  5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणण्यात येईल.

अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीचा घोषणा

 अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून

कर्जमाफीचा घोषणा

 

·         7.69 लाख कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर

·         शेतकरी कर्जमाफीनदीजोड प्रकल्पतिसरी मुंबई आणि स्टार्टअपला चालना

·         राज्याची विकसित महाराष्ट्रच्या दिशेने यशस्वी घौडदौड

·         एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना  क्रॉक्रिट रस्त्याने जोडणार

 

मुंबई, दि. 6 : राज्याच्या सर्वांगीणसर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेला 2026-27 वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र’ या ध्येयावर आधारित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रगतीशील विकासशाश्वततासर्वसमावेशकता आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिकसामाजिक आणि पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी करीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला.

 

       विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सादर केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यविधानसभा सदस्य उपस्थित होते.

फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

 फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

       मुंबई, दि.7 :  फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने 6 मार्च 2026 रोजी हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात झाले. मुंबईत येणाऱ्या विविध देशाचे राष्ट्राध्यक्षपंतप्रधान यांच्या स्वागत प्रसंगी सांस्कृतिक सुस्वागतम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

            सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने महादुर्गामहाकाली व महा सरस्वती दर्शवणारा "जोगवा" हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच "नमन" मधील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक पात्र दर्शवण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमात  अविभाज्य अंग असणारी "पंढरीची वारी" हा सांस्कृतिक कार्यक्रम फिनलंडचे अध्यक्ष डॉ.अलेक्झांडर स्टब यांच्यासमोर सादर करण्यात आला.  या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन सांस्कृतिक कार्य  विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी  यांचे

Featured post

Lakshvedhi