Sunday, 8 March 2026

अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्जमाफीचा घोषणा

 अर्थसंकल्पात शेतकऱ्याना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून

कर्जमाफीचा घोषणा

 

·         7.69 लाख कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर

·         शेतकरी कर्जमाफीनदीजोड प्रकल्पतिसरी मुंबई आणि स्टार्टअपला चालना

·         राज्याची विकसित महाराष्ट्रच्या दिशेने यशस्वी घौडदौड

·         एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांना  क्रॉक्रिट रस्त्याने जोडणार

 

मुंबई, दि. 6 : राज्याच्या सर्वांगीणसर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेला 2026-27 वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र’ या ध्येयावर आधारित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रगतीशील विकासशाश्वततासर्वसमावेशकता आणि सुशासन या चार स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिकसामाजिक आणि पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी करीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला.

 

       विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सादर केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्यविधानसभा सदस्य उपस्थित होते

शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर भर

 शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर भर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शेती उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयतंत्रज्ञानाचा वापर10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी आणि उत्पादन खर्चात 25 टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या ॲग्रीस्टॅक’ आणि महाविस्तार’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचा 30 लाख शेतकरी वापर करत असून ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

 पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी;

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

विकसित महाराष्ट्र 2047 च्या ध्येयावर आधारित 2026-27 चा अर्थसंकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 6 : महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा ₹7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प शासनाने  सादर केला असून तो विकसित महाराष्ट्र 2047 या दीर्घकालीन रोडमॅपवर आधारित तयार करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासनाला यश

 राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासनाला यश

 

2026-27 च्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न 6,16,099 कोटी रुपयेतर महसुली खर्च 6,56,651 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. यामुळे सुमारे 40,552 कोटी रुपयांची महसुली तूट राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तरीही राज्याची राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासनाला यश आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यातील मेट्रो आणि द्रुतगती मार्गांच्या जाळ्यालाही

 राज्यातील मेट्रो आणि द्रुतगती मार्गांच्या जाळ्यालाही मोठा विस्तार देण्यात येणार आहे. राज्यातील मेट्रो नेटवर्क 1200 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचेतसेच 6000 किलोमीटरपेक्षा अधिक द्रुतगती मार्गांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

वाढवण बंदराच्या विकासातून 12 लाखांहून अधिक रोजगार निर्माण

 वाढवण बंदराच्या विकासातून 12 लाखांहून अधिक रोजगार निर्माण

मुंबई महानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याचीही योजना आहे. वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभारण्यात येणार आहे. तसेच अटल सेतूला जोडून सुमारे 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात तिसरी मुंबई’ विकसित करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. कर्नाळासाई आणि चिरनेर नवनगर तसेच नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रात ही ग्रीनफिल्ड शहरे उभारली जाणार आहेत.

 

याशिवाय वाढवण बंदराच्या विकासातून 12 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंगसाठी मोठे केंद्र उभारण्याची योजना आहे. मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आणि 10 लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचाही सरकारचा मानस आहे.

पायाभूत सुविधांच्या व्यापक योजना

 पायाभूत सुविधांच्या व्यापक योजना

राज्यातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील ठाणेविरार आणि बोईसर स्थानके 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

अटल सेतू परिसरात सुमारे 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात तिसरी मुंबई’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय वाढवण बंदर प्रकल्पामुळे सुमारे 12 लाख रोजगारनिर्मिती होईल.

Featured post

Lakshvedhi