Sunday, 8 March 2026

“हर एक पल का शायर साहिर” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

  हर एक पल का शायर साहिर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईदि. 7 कवी गीतकार साहिर लुधियानवी यांच्या विविधांगी प्रतिभेचा समग्र धांडोळा घेणारा हर एक पल का शायर साहिर या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम शनिवार 7 मार्च, 2026 रोजी रात्री 8.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरबोरीवली येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात गायक म्हणून श्रीकांत नारायणसरिता राजेशसौम्या वर्मा आणि मुख्यार शाह यांचा सहभाग आहे. संगीत संयोजन प्रवीण फाटक यांनी केलेले असून या कार्यक्रमाचे निवेदन आरती शेट्टी व ध्वनीव्यवस्था नितीश फणसे करीत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक लोकप्रिय गीतांचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

 

आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

 आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला डॉक्टर्सस्त्रीरोग तज्ज्ञस्त्री शल्यचिकित्सकपरिचारिकाआरोग्य सेविकाआरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार येईल. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्वबाल आरोग्यकर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा विशेष गौरव करण्यात आला. महिला सक्षमीकरणस्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी हे उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून महिलांच्या स्वप्नांना बळ देऊयाउद्याचे उज्ज्वल भविष्य घडवूया! या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे ठरतीलअसा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.


राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी  शुभारंभ महिला दिनानिमित्त होत आहे. 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना गार्डसिल-4’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 9 लाख 84 हजार 414 मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे.

 भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे 80 हजार नवीन रुग्ण आढळतात व 42 हजारांहून अधिक मृत्यू होतात. एचपीव्ही प्रकार 16 व 18 पासून संरक्षण देणारी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते. ही मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रेग्रामीण रुग्णालयेजिल्हा रुग्णालयेमहानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

 जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात

एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

 मुंबईदि.7 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य  संरक्षणासाठी राज्यभरात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य विषयी हक्कांना बळ देत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, 8 मार्च 2026 रोजी मुख्य सभागृहयशवंतराव चव्हाण सेंटरनरिमन पॅाईटमुंबई येथे दुपारी 3.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

प्लास्टिक कचरा पुनर्वापर, टाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे पुनर्वापर आणि क्षमता बांधणीद्वारे नेट दुरुस्ती

 मंत्री नितेश राणे म्हणालेया तीनही कंपन्या ससून मासेमारी बंदराला सुरक्षितस्वच्छ आणि आधुनिक करण्यास काम करतील.  प्लास्टिक कचरा पुनर्वापरटाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे पुनर्वापर आणि क्षमता बांधणीद्वारे नेट दुरुस्ती प्रणाली मजबूत करण्यास मदत होईल. ही भागीदारी केवळ पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रतिनिधित्व करत नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार जागतिक मानकांनुसार ससून डॉकला आदर्श मासेमारी बंदर बनवण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे.

 मच्छीमारांच्या कल्याणासाठीमत्स्यव्यवसायाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि शाश्वत किनारी विकासासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. ससून डॉक मच्छीमार समुदायासाठी प्रगतीनावीन्य आणि समृद्धीचे प्रतीक बनविण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही मंत्री श्री. राणे यांनी केले.

000

आणि भारत सरकारच्या अंतर्गत नवीन डॉक, आज आपल्या मासेमारी समुदायासाठी एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून

 मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले,  मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीखालील जुना ससून डॉक,  महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या अंतर्गत नवीन डॉकआज आपल्या मासेमारी समुदायासाठी एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून उभे आहे. सुमारे 1,560 नोंदणीकृत मोटार चालवलेल्या मासेमारी नौका आणि सरासरी वार्षिक 50 ते 60 हजार मेट्रिक टन मासेमारी उत्पादनासहससून डॉक महाराष्ट्र तसेच भारताच्या मासेमारी अर्थव्यवस्थेत  महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या काही वर्षांत येथे नेट मेंडिंग शेडवर्कशॉपभूमिगत पाण्याची टाकीपाणीपुरवठा पाईपलाईनपंप हाऊससंरक्षण भिंतसार्वजनिक शौचालये आणि सुरक्षा रक्षक घराचे नूतनीकरणकचराकुंड्यांची व्यवस्था करणेजुन्या संरचना पाडणेइलेक्ट्रिकल सबस्टेशनसाठी बांधकाम आदी कामे करण्यात आली आहे. सध्या बर्फ संयंत्रघाटाच्या भिंतीचे मजबुतीकरणमच्छिमारांसाठी विश्रांती कक्षांचे बांधकाम आणि आधुनिक लिलाव हॉलची कामे प्रगतीपथावर आहेत.


फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार

 फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार


ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविणार

-मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे


L

मुंबई, दि. 7: मुंबईस्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी बंदरांपैकी एक आहे. ससून मासेमारी बंदराचा विकास हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. ससून मासेमारी बंदराला जगातील


 सर्वोत्तम बनविण्यासाठी फिनलंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


हॉटेल ताज पॅलेस येथे फिनलंड देशातील हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रीसायकल कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपाले, फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, सहाय्यक सजू नायर, फिनलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा आदी उपस्थित होते. 



Featured post

Lakshvedhi