Thursday, 22 January 2026

सामूहिक संकल्पाचे आवाहन…

 सामूहिक संकल्पाचे आवाहन

आपल्या भाषणाच्या अखेरीस प्रा. शिंदे यांनी सांगितले कीलोकशाही ही रोजच्या उत्तरदायित्वाच्या कृतींवर टिकून असलेली जिवंत व्यवस्था आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील जो जे वांछिल तो ते लाहो हा संदर्भ देतप्रत्येक नागरिकाच्या न्याय्य आकांक्षा पूर्ण व्हाव्यातयासाठी नि:स्वार्थ भावनेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. लखनौ येथे आपण सर्वांनी संकल्प करूया कीभारतीय विधिमंडळे पारदर्शकताउत्तरदायित्व आणि सर्वोत्तम लोकशाहीचे जागतिक मानदंड ठरतील, असेही ते म्हणाले.

0000

पुढील वाटचाल : लोकप्रतिनिधी–नागरिक विश्वास अधिक दृढ करण्यासाठी…

 पुढील वाटचाल : लोकप्रतिनिधीनागरिक विश्वास अधिक दृढ करण्यासाठी

उपस्थितीचर्चेतील सहभाग व निधी वापर दर्शविणारी डिजिटल विधिमंडळ अहवालपत्रके

1नियमित नागरी संवाद/टाउन हॉल बैठकीद्वारे लोकप्रतिनिधीनागरिक संवाद दिवस

2धोरण विश्लेषण व सार्वजनिक वित्त विषयक सततचे क्षमता-विकास प्रशिक्षण

3एआयपीओसी च्या मंचावरून प्रा. शिंदे यांनी तीन महत्त्वपूर्ण उपाय सुचविले

 

आर्थिक शिस्त आणि नैतिक आचरण…

 आर्थिक शिस्त आणि नैतिक आचरण

आर्थिक उत्तरदायित्वावर भर देतानाप्रा. शिंदे यांनी आमदार स्थानिक विकास निधी (एमएलए-लॅडच्या डिजिटल देखरेखीचा उल्लेख केला आणि सार्वजनिक निधीचा वापर कसा होतोहे जाणून घेण्याचा नागरिकांना पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले.

 

नैतिक आचरण आणि संसदीय शिस्त यांशिवाय उत्तरदायित्व अपूर्ण असल्याचे सांगतवारंवार होणाऱ्या तहकूब व गोंधळामुळे जनतेचा विश्वास कमी होतोअसा इशारा त्यांनी दिला.

 

विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावेबेशिस्तगडबड-गोंधळाचे नव्हे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

 

डिजिटल पारदर्शकता व ई-विधान उपक्रम…

 डिजिटल पारदर्शकता व ई-विधान उपक्रम

तंत्रज्ञानामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील नाते आमूलाग्र बदलले असल्याचे सांगतप्रा. शिंदे यांनी ई-विधान आणि महाराष्ट्राने दोन दशकांपूर्वीच सुरू केलेल्या विधिमंडळ डिजिटायझेशनचा उल्लेख केला. सभागृहातील कामकाजप्रश्नोत्तरेउपस्थिती आणि चर्चाकार्यवृत्ताचे संदर्भ वेळेत उपलब्ध करून दिल्यामुळे पारदर्शकता अधिक बळकट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

 

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयआणि डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून तक्रार निवारणावर लक्ष ठेवले जात असूनसभागृहात दिलेली आश्वासने प्रत्यक्षात तळागाळापर्यंत पोहोचत आहेत की नाहीयाची खातरजमा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र विधिमंडळ : उत्तरदायित्वाचा आदर्श…

 महाराष्ट्र विधिमंडळ : उत्तरदायित्वाचा आदर्श

महाराष्ट्र विधानमंडळाच्या संसदीय परंपरांचा उल्लेख करताना प्रा. शिंदे यांनी लोकलेखा समिती आणि अंदाज समिती यासारख्या देखरेख यंत्रणांच्या भूमिकेवर भर दिलाज्या सार्वजनिक खर्चावर कठोर नियंत्रण ठेवतात. कायदे निर्मितीत जनसहभागाला महाराष्ट्राने दिलेले महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी महाराष्ट्र सार्वजनिक सुरक्षा विधेयकाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या एक लाखांहून अधिक जनसूचना तपासूनच कायदा अंतिम करण्यात आल्याचे उदाहरण दिले. कायद्यांच्या निर्मितीत नागरिकांचा सहभाग वाढल्याशिवाय खरी उत्तरदायित्वाची सुरुवात होत नाही, असे ते म्हणाले.

भारतीय संविधानिक व सांस्कृतिक परंपरेत रुजलेली उत्तरदायित्वाची संकल्पना…

 भारतीय संविधानिक व सांस्कृतिक परंपरेत रुजलेली उत्तरदायित्वाची संकल्पना

महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा संदर्भ देताना प्रा. शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा उल्लेख केलाज्यामध्ये प्रजेचे कल्याण हे राज्यकारभाराच्या (लोककल्याणकारी राज्य) केंद्रस्थानी होते. तसेच महात्मा  जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांचा संदर्भ देतलोकप्रतिनिधी हे केवळ निवडून आलेले पदाधिकारी नसूनजनतेच्या आकांक्षांचे विश्वस्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उत्तरदायित्व ही निवडणुकीपुरतीपाच वर्षांतून एकदा येणारी औपचारिक प्रक्रिया नाही. ती प्रत्येक तासाचीप्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी विधिमंडळांतील बेशिस्त आणि गोंधळ यामुळे जनतेचा विश्वास डळमळीत होतोअसा इशारा दिला.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 2020 मध्ये केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देतानाप्रा. शिंदे यांनी सांगितले कीविधिमंडळे ही जनतेच्या आकांक्षांची मंदिरे’ आहेत आणि लोकशाहीची ताकद सभागृहातील चर्चेची गुणवत्ता व उत्तरदायित्वात प्रतिबिंबित होते. (एआयपीओसी) आणि P20 (G20 स्पीकर्स समिट) सारख्या मंचांद्वारे सुधारणा प्रक्रियेला दिशा मिळत आहे.

 

लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया - 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन

 लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया

- 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन


उत्तरदायित्व केवळ निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी…

विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे;

गडबड-गोंधळासाठीचे नव्हे…

लखनौ, उत्तर प्रदेश 20 जानेवारी : लोकप्रतिनिधींचे जनतेप्रती उत्तरदायित्व ही केवळ नैतिक अपेक्षा नसून, सशक्त आणि गतिमान लोकशाहीसाठीची एक अनिवार्य कार्यात्मक गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. लखनौ येथे आयोजित 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या (एआयपीओसी) व्यासपीठावर ते बोलत होते.


परिषदेच्या “जनतेप्रति विधिमंडळांचे उत्तरदायित्व” या विषयावर विचार मांडतांना सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि लोकशाही संस्थांची अधिमान्यता केवळ निवडणुकीद्वारे मिळत नाही, तर सातत्यपूर्ण पारदर्शकता, नैतिक आचरण आणि जनतेच्या आकांक्षांप्रती संवेदनशीलतेतून ती दृढ होत जाते.                                                                                                                                                                                                                               

लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती तसेच देशभरातील पीठासीन अधिकारी उपस्थित असलेल्या या गौरवशाली संमेलनास त्यांनी ‘अमृत काळा’तील सामूहिक आत्मपरीक्षणाचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ असे संबोधले.


 

Featured post

Lakshvedhi