Saturday, 17 January 2026

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जांसाठीचे पोर्टल २२ जानेवारीपर्यंत सुरू

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत

अर्जांसाठीचे पोर्टल २२ जानेवारीपर्यंत सुरू

 

मुंबईदि. १४ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएसएस) अंतर्गत २०२५-२६ साठी नुतनीकरणासाठी पात्र असलेले तसेच २०२४-२५ मधील डी-डुप्लिकेशन प्रक्रियेत समाविष्ट असलेले तथापि विहित कालावधीत अर्ज करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी एनएसपी २.० पोर्टल २२ जानेवारी २०२६ पर्यंत पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व संबंधित शाळांनी पात्र विद्यार्थ्यांचे नूतनीकरण अर्ज एनएसपी २.० पोर्टलवर २२ जानेवारीपूर्वी ऑनलाईन सादर करून घ्यावेत. त्याचप्रमाणे सर्व अर्जांची प्रथम स्तर आणि द्वितीय स्तर पडताळणी २२ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याने सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत मिळेलयाची दक्षता घ्यावीअसे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

0000

घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

 घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या

तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

 

मुंबईदि. 14 : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी 2012 मध्येच निर्गमित केलेला आहे.

जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून प्रसारित होत आहेपरंतु हे वस्तुस्थितीला धरुन नाही. याबाबतचा आदेश जुनाच आहे. त्या 14 फेब्रुवारी 2012 रोजीच्या आदेशानुसार जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतीलपरंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानेदेखील फिरता येणार नाही.

0000

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 मुंबईदि. १५ : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवकांना मानव संसाधन विकासाचा प्रमुख स्रोत मानले जात असून विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या अनुषंगाने राज्याच्या युवा धोरण २०१२ नुसार राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवकयुवती व संस्थांनी २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीसाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी १९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करावेतअसे आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे.

 

पुरस्कारासाठीचे अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलदुसरा मजलाजिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई शहर कार्यालयधारावी येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

समाजातील दुर्बल घटकअनुसूचित जाती-जमातीआदिवासी भागतसेच शिक्षणरोजगारआरोग्यपर्यावरणसंस्कृतीकलाक्रीडाविज्ञान-तंत्रज्ञानउद्योगमहिला सक्षमीकरणस्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधव्यसनमुक्ती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवती व संस्थांना जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी 9594369561 या क्रमांकावर संपर्क साधावाअसेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

सिकलसेल ॲनिमियाविरोधात ‘अरुणोदय’ जनजागृती मोहिमेनिमित्ताने ‘दिलखुलास’मध्ये डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत

 सिकलसेल ॲनिमियाविरोधात अरुणोदय’ जनजागृती मोहिमेनिमित्ताने

दिलखुलासमध्ये डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत

 

मुंबईदि. 16: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहीमया विषयावर आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत दि. 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेचही मुलाखत ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवरूनही ऐकता येणार आहे. निवेदिका उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

आरोग्य विभागामार्फत 15 जानेवारी 2026 पासून सुरू झालेली अरुणोदयसिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहीम 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमियाचा प्रतिबंधलवकर तपासणी आणि प्रभावी उपचार याबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे. सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार असूनत्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो. विवाहपूर्व सिकलसेल तपासणीचे महत्त्वरुग्ण व वाहकांची ओळखगर्भावस्थेतील तपासणीतसेच शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. जनजागृतीच्या माध्यमातून सिकलसेल ॲनिमियाचा प्रसार रोखणे शक्य असूनया उद्दिष्टपूर्तीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने अरुणोदय’ मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहनही दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. कंदेवाड यांनी केले आहे.

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

 देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

 

मुंबई, दि. 16 :- महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा. या काळात होणारे शारीरिक बदलमानसिक ताणहॉर्मोन असंतुलनहाडांचे आजारझोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते. हीच गरज ओळखून  राज्य शासनाने महिलांसाठी मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, या क्लिनिकच्या माध्यमातूनतज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्लामानसिक आरोग्य समुपदेशनहाडेहृदय व हॉर्मोन तपासणीऔषधोपचार व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. महिलांच्या आरोग्याबाबत राज्य शासनाने उचललेले हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

मेनोपॉज हा आजार नाहीतर महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. मात्र या टप्प्यात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. राज्यातील प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्लाउपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

00000

77 77 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील 'अॅट होम' सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील 'अॅट होम' सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

 77 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील 'अॅट होमसोहळ्यासाठी

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

            नवी दिल्ली दि. 16 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित 'अॅट होमस्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे चंद्रशेखर भडसावळेनांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडेजळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना विशेष निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध 'कृषिरत्नश्री. चंद्रशेखर हरि भडसावळे यांच्या  शेतीनैसर्गिक शेतीशून्य-नांगरणी तंत्र (एसआरटी), जलसंवर्धनकृषी पर्यटन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामधील  उल्लेखनीय कामगिरीची दखल या निमित्ताने घेण्यात आली आहे. 1976 पासून शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भडसावळे यांनी नेरळ येथील 'सगुणा बाग'ला एकात्मिक शेतीचा एक जागतिक दर्जाचा आदर्श नमुना म्हणून विकसित केले आहे. मत्स्यव्यवसायवनशेतीफलोत्पादनगो-पालन आणि पर्यटन यांची सांगड घालणारे हे मॉडेल आज देशभरातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले असूनशेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील मानवतावादी कार्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील विख्यात तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे यांना ही विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून एम डी पदवी प्राप्त केल्यानंतरशहरात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक अतिमागास आणि डोंगराळ अशा मुखेड भागाची रुग्णसेवेसाठी निवड केली. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी सर्पदंशावरील उपचारांत क्रांती घडवून आणली आहे. 1988 मध्ये मुखेड परिसरात सर्पदंशामुळे होणारा 25 टक्के मृत्यूदर आज डॉ. पुंडे यांच्या शास्त्रीय उपचार पद्धतीमुळे शून्य टक्क्यांवर आला आहे. त्यांच्या या कार्याची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओदखल घेऊन त्यांची निवड 'राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समिती'मध्ये केली आहे.

याच सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील अरविंद गुलाब चौधरी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री आवास योजने'चा लाभ घेऊन आपले हक्काचे घर मिळवणाऱ्या यशस्वी लाभार्थ्यांचे प्रतिनिधित्व ते या सोहळ्यात करणार आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्यांच्या जीवनात कसा बदल असल्याचे उदाहरण ठरले आहेत.

            तसेचमुंबईचे युवा उद्योजक आकाश शहा यांना स्टार्टअप्स आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विशेष योगदानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत असतानाआकाश शहा यांनी या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल राष्ट्रपती भवनाकडून घेण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडणारा 'अॅट होमहा एक अत्यंत प्रतिष्ठित सोहळा मानला जातो.

राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अभिनंदन

 राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अभिनंदन

 

            मुंबईदि १६ : भारत सरकारच्या उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटीआणि स्टार्टअप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ निमित्त पाचव्या स्टेटस  स्टार्ट अप इकोसिस्टीम रँकिंग अंतर्गत महाराष्ट्र राज्याला लीडर्स श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदाचे अभिनंदन केले आहे.

            नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे झालेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.  स्टार्ट - अप इंडिया इनिशीएटीव्हच्या दहा वर्षांच्या वाटचालीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात देशातील स्टार्टअप परिसंस्थेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांचा गौरव करण्यात आला.

            महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटीलव्यवस्थापक (स्टार्टअप्स व नावीन्यता) अमित कोठावदे व विवेक मोगल यांनी स्वीकारला.

            स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणीस्टार्टअप्ससाठी सक्षम इन्क्युबेशन व अॅक्सेलरेशन सुविधाभांडवली प्रवेशराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भागीदारीजिल्हास्तरापर्यंत पोहोचलेले उपक्रम तसेच सर्वसमावेशक स्टार्टअप सहभाग या निकषांवर महाराष्ट्राने सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरी केली आहे. याच कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत स्थान देण्यात आले.

            महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून राज्य शासनाने उभारलेली संस्थात्मक यंत्रणाविविध विभागांतील समन्वय आणि स्टार्टअप परिसंस्थेतील सर्व घटकांचे योगदान यामुळे महाराष्ट्राने देशात आपले नेतृत्व कायम राखले असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

            हा सन्मान महाराष्ट्रातील स्टार्टअप्सउद्योजकइन्क्युबेटर्सगुंतवणूकदारशैक्षणिक संस्था आणि धोरणकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे डॉ. श्रीकांत पाटील यांनी यावेळी नमूद केले.

 

Featured post

Lakshvedhi