Saturday, 10 January 2026

देश सभी क्षेत्रों में प्रगति कर रहा है। स्टार्टअप्स और आत्मनिर्भर भारत अभियान के

 राज्यपाल आचार्य देवव्रत ने कहा कि देश सभी क्षेत्रों में प्रगति कर रहा है। स्टार्टअप्स और आत्मनिर्भर भारत अभियान के माध्यम से भारत वैश्विक स्तर पर तेज़ी से आगे बढ़ रहा है। भारत आज विश्व की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन चुका है और तीसरे स्थान की ओर अग्रसर है। विकास का लाभ समाज के अंतिम पंक्ति तक पहुँच रहा है। युवाओं में देश को आत्मनिर्भरसमृद्ध और शक्तिशाली बनाने की अपार क्षमता है। असफलता आने पर निराश न होकर परिश्रमदृढ़ता और सकारात्मक सोच के साथ विकसित राष्ट्र के निर्माण में योगदान देने का उन्होंने युवाओं से आवाहन किया।

 

इस संवाद कार्यक्रम के दौरान विद्यार्थियों द्वारा पूछे गए प्रश्नों पर भी राज्यपाल ने मार्गदर्शन किया। कार्यक्रम के अंत में चयनित युवाओं को मान्यवरों के हस्ते प्रतीकात्मक रूप से किट वितरित की गई।

भारतीय संस्कृति की विरासत को संजोते हुए युवाओं को भारत को विकसित राष्ट्र बनाने में योगदान देना चाहिए

 भारतीय संस्कृति की विरासत को संजोते हुए युवाओं को भारत को विकसित राष्ट्र बनाने में योगदान देना चाहिए

-राज्यपाल आचार्य देवव्रत

 

मुंबईदि. 7 : भारत को वर्ष 2047 तक एक विकसित राष्ट्र बनाने के संकल्प में युवाओं की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण और मूल्यवान है। देश के सर्वांगीण विकास के लिए युवाओं को अपने विचारकर्म और नवाचार के माध्यम से आगे आना चाहिए तथा भारतीय संस्कृति की विरासत को संजोते हुए विकसित भारत के निर्माण में योगदान देना चाहिएऐसा आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत ने किया।

 

राष्ट्रीय युवा महोत्सव – विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025–26 की राष्ट्रीय प्रतियोगिता के लिए राज्य से चयनित युवाओं से राज्यपाल आचार्य देवव्रत ने वीडियो कान्फरन्सिंग के माध्यम से संवाद किया।

 

सह्याद्री अतिथिगृह में आयोजित इस कार्यक्रम में खेल विभाग के प्रधान सचिव संजय खंदारेराज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरेसह सचिव एस. राममूर्तिखेल विभाग के उप सचिव सुनील पांढरेसहायक संचालक मिलिंद दीक्षितमुंबई विभाग की उप खेल संचालक सुवर्णा बारटक्के तथा राष्ट्रीय युवा महोत्सव के लिए चयनित विद्यार्थी उपस्थित थे।

 

राष्ट्रीय युवा महोत्सव में सहभागिता राज्य के युवाओं के लिए गौरवपूर्ण और प्रेरणादायी विषय हैऐसा उल्लेख करते हुए राज्यपाल आचार्य देवव्रत ने दिल्ली में आयोजित संवाद कार्यक्रम के लिए चयनित युवाओं को शुभकामनाएं दीं।

 

युवाओं से संवाद करते हुए राज्यपाल ने कहा कि यह उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना से संचालित किया जा रहा है। स्वामी विवेकानंद की जयंती के अवसर पर प्रतिवर्ष आयोजित होने वाले राष्ट्रीय युवा महोत्सव को नया स्वरूप दिया गया है, तथा देश के सभी राज्यों के विद्यार्थियों के लिए प्रतियोगी परीक्षाएं आयोजित की गईं। इनमें से चयनित तीन हजार मेधावी युवाओं को इस महोत्सव के माध्यम से सीधे प्रधानमंत्री से संवाद करने का अवसर मिलेगा। मेहनतपरिश्रम और गुणवत्ता के बल पर चयनित युवाओं की राज्यपाल ने सराहना की और कहा कि यह चयन विकसित राष्ट्र के निर्माण में उनकी भूमिका की स्वीकृति है।


राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

 राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात

15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

 

मुंबईदि. ८ : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारदिनांक १५ जानेवारी २०२६  रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.

 

अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालयेमहामंडळेमंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.

 

 महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालयेनिमशासकीय कार्यालयेसार्वजनिक उपक्रमबँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहीलअसे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

 

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबईठाणेनवी मुंबईउल्हासनगरकल्याणडोंबिवलीभिवंडीनिजामपूरमीराभाईंदरवसईविरारपनवेलनाशिकमालेगावअहिल्यानगरजळगावधुळेपुणेपिंपरीचिंचवडसोलापूरकोल्हापूरइचलकरंजीसांगलीमिरजकुपवाडछत्रपती संभाजीनगरनांदेडवाघाळापरभणीजालनालातूरअमरावतीअकोलानागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

 

मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावाअसे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००००००


१२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यातील शाळा

 राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 8 : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणे तसेच नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणेहा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळा व महाविद्यालयांमध्ये पुढील उपक्रमांचे आयोजन करण्यात यावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान याविषयी व्याख्यानेक्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी रॅलीमॅरेथॉन स्पर्धाशालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांवरील नियमावलीऑलिम्पिक स्पर्धांसह अन्य महत्त्वाच्या स्पर्धांबाबत माहिती देणारी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात यावीत. तसेच ऑनलाईन माध्यमातून नामवंत खेळाडूंशी विद्यार्थ्यांचा संवादविविध खेळांचे प्रदर्शनीय सामनेविजेत्यांना पुरस्कार वितरण तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात यावा.

राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा कार्यालयाचा बॅनर लावणे अत्यावश्यक व अनिवार्य राहील.

या सर्व उपक्रमांचा सविस्तर अहवाल Instagram Reel, YouTube ध्वनिफित स्वरूपात तयार करून dsomumbaisub@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावा.

उत्कृष्ट नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांच्या संस्थांना अनुक्रमे ₹१०,०००, ₹,००० व ₹५,००० रोख पारितोषिकगौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहेअसे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

आदिवासी बहुल सर्व जिल्ह्यात आरोग्य तपासणीचे विशेष कॅम्प आयोजित करावेत

 आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास  प्राधान्य द्यावे

-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि. 8 :  राज्यातील आदिवासी व दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी नुकताच अमरावतीमेळघाटअकोलाजळगावनंदुरबारछत्रपती संभाजीनगरनागपूर येथील विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाही बाबतची आढावा बैठक मंत्रालयातील समिती सभागृहात झाली.

 या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायकआरोग्यसेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडेआरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकरसहसंचालक डॉ.सुनिता गोल्हाईतडॉ.सरिता हजारे उपस्थित होते. संचालक डॉ.विजय कंदेवाड तसेच आदिवासीबहुल भागातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

आदिवासी बहुल सर्व जिल्ह्यात आरोग्य तपासणीचे विशेष कॅम्प आयोजित करावेत. अमरावती जिल्ह्यातील 'धारणीयेथील आरोग्य संस्थेचे श्रेणीवर्धन करावे. रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तातडीने  करावी.  सर्व आरोग्य संस्थेमध्ये स्वछता ठेवावी व उत्तम आहार व्यवस्था चांगली करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मेळघाटातील ॲनेमिया निर्मूलन मोहीम,  सिकलसेल तपासणी मोहीम अधिक प्रभाविपणे राबवावी. तसेच  ग्रामविकास विभागाशी संबंधित पदे भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

0000

भारताने २०२६ या वर्षासाठी ‘इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे

 भारताने २०२६ या वर्षासाठी इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मांडलेल्या दृष्टिकोनानुसार ही परिषद आयोजित होत असूनसमावेशकशांततापूर्णसक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.

आयआयआयडीईएम चे महासंचालक राकेश वर्मा यांनी या परिषदेसंदर्भातील रूपरेषा मांडताना सांगितले कीही परिषद निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे व्यासपीठ ठरेल. निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या समकालीन आव्हानांवर सामूहिक चर्चासर्वोत्तम पद्धती व नावीन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण आणि संयुक्त उपाययोजनांची निर्मिती या परिषदेत होणार आहे. यावेळी आयआयसीडीईएम २०२६ च्या अधिकृत लोगोचे अनावरणही करण्यात आले.

या परिषदेत सहभागी प्रतिनिधींना भारताची निवडणूक व्यवस्थाप्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाधारित नवकल्पना यांची माहिती देण्यात येणार असूनभारतीय निवडणुका जगातील लोकशाही व्यवस्थांसाठी आदर्श ठरत असल्याचे अधोरेखित केले जाणार आहे.

परिषदेच्या कार्यक्रमात उद्घाटन सत्रनिवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांची विशेष बैठककार्यगट बैठकाईसीआयनेट चे उद्घाटन तसेच जागतिक निवडणूक विषयांवरील आणि आंतरराष्ट्रीय मानकांवरील विविध विषयक सत्रांचा समावेश आहे.

तीन दिवसांच्या या परिषदेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारनिवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक द्विपक्षीय बैठका विविध देशांच्या निवडणूक संस्थांच्या प्रमुखांसोबत पार पडणार आहेत.

या परिषदेत चार आयआयटीसहा आयआयएम१२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयूआणि आयआयएमसी यांसह नामांकित शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार असूनराज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली ३६ विषयक गट चर्चेत सहभागी होणार आहेतअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स

 इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट २०२६’ चे

२१ ते २३ जानेवारीदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजन

मुंबई, दि. ८ : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम) २०२६’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपम, येथे करण्यात येणार आहे. ही तीन दिवसीय परिषद भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था (आयआयआयडीईएम) मार्फत, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाणार आहे.


भारतामध्ये निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही विषयावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय परिषद ठरणार असून, जगभरातील विविध देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे सुमारे १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, भारतातील परराष्ट्र मिशनचे अधिकारी तसेच निवडणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासक या परिषदेत सहभागी होणार आहेत.


भारताने २०२६ या वर्षासाठी ‘इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मांडलेल्या दृष्टिकोनानुसार ही परिषद आयोजित होत असून, “समावेशक, शांततापूर्ण, सक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही” ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.

Featured post

Lakshvedhi