Friday, 2 January 2026

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महीनों के लिए बंद रहेगा; जिल्हाधिकारी ने कहा भक्तों का सहयोग आवश्यक

 श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महीनों के लिए बंद रहेगा;

जिल्हाधिकारी ने कहा भक्तों का सहयोग आवश्यक

 

पुणे, 27 दिसंबर: महाराष्ट्र के पुणे जिले में स्थित प्राचीन श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर श्रद्धालुओं के लिए जनवरी 2026 से अगले तीन महीनों के लिए बंद रहेगाकेवल महाशिवरात्रि (12–18 फरवरी 2026) के दौरान दर्शन के लिए मंदिर खुला रहेगाप्रशासन ने बताया। मंदिर को अस्थायी रूप से बंद करने का निर्णय भीमाशंकर देवस्थान संस्थान ने लिया है ताकि सभामंडप और पायरी मार्ग के निर्माण का काम सुरक्षित और नियोजनबद्ध तरीके से पूर्ण किया जा सके।

इस निर्णय के लिए 23 दिसंबर को हुई संयुक्त बैठक में जिल्हा प्रशासनमंदिर के विश्वस्तस्थानीय दुकानदारों और भीमाशंकर ग्रामवासियों ने सर्वसम्मति से यह फैसला लिया। इस अवधि के दौरान भक्तों से सहयोग करने का अनुरोध किया गया है। राज्य सरकार ने भीमाशंकर मंदिर के सर्वांगीण विकास के लिए एक विशेष योजना को मंजूरी दी है। यह मंदिर महाराष्ट्र के १२ ज्योतिर्लिंगों में से एक है। सिंहस्थ कुंभ मेला 2027 के मद्देनजर यहां आने वाले बड़े पैमाने पर भक्तों की संख्या को ध्यान में रखते हुएभीड़ प्रबंधनबुनियादी ढांचे और सुरक्षा सुधार कार्यों को प्राथमिकता दी जा रही है।

मंदिर दर्शन के लिए बंद रहने के बावजूद नित्य पूजाअभिषेक और धार्मिक विधियाँ नियमित रूप से जारी रहेंगीपरंतु भक्तों को इस अवधि के दौरान मंदिर परिसर में प्रवेश या प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध नहीं होगी। केवल निर्माण कर्मीअधिकृत अधिकारी और भीमाशंकर के स्थानीय निवासी ही परिसर में प्रवेश कर सकेंगे।

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी ने कहा कि भीमाशंकर मंदिर का विकास भविष्य की सुरक्षा और सुविधाओं के लिए अत्यंत आवश्यक हैऔर कुंभ मेले से पहले इन कार्यों का समय पर पूरा होना आवश्यक है। उन्होंने भक्तों और स्थानीय नागरिकों से प्रशासनपुलिस और मंदिर संस्थान को पूरा सहयोग देने का अनुरोध किया है

000

गडचिरोली पुलिस बल को 34 नए वाहनों का बेड़ा प्राप्त

 गडचिरोली पुलिस बल को 34 नए वाहनों का बेड़ा प्राप्त

गडचिरोली, 27 मार्च: आंतरिक सुरक्षा व्यवस्था को और अधिक सक्षमगतिशील और प्रभावी बनाने के उद्देश्य से गडचिरोली पुलिस विभाग को कुल 34 नए वाहन उपलब्ध कराए गए हैं। इन वाहनों में 30 स्कॉर्पियो एसयूवी, 2 बस और मोटरसाइकिलें शामिल हैंजिन्हें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने हरी झंडी दिखाकर रवाना किया।

वाहनों के वितरण कार्यक्रम में वित्तनियोजनकृषिमदत एवं पुनर्वासविधि एवं न्यायकामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली के सहपालक मंत्री अॅड. आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण)गृहनिर्माणशालेय शिक्षासहकारखनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरविधायक डॉ. मिलिंद नरोटेनक्षलविरोधी अभियान के विशेष पुलिस महानिरीक्षक संदीप पाटीलपुलिस उपमहानिरीक्षक अंकीत गोयलजिल्हाधिकारी अविश्यांत पांडाऔर जिल्हा पुलिस अधीक्षक नीलोत्पल सहित वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।

इन नए वाहनों से पुलिस अब दुर्गम व आदिवासी इलाकों में तेज गश्तआपात स्थिति में त्वरित प्रतिक्रियानक्सल विरोधी अभियानों और रोज़मर्रा के कार्यों को अधिक प्रभावी ढंग से अंजाम दे सकेगी। स्कॉर्पियो वाहनों का उपयोग गश्ती और ऑपरेशनल कार्यों के लिए किया जाएगाजबकि बसों का उपयोग पुलिस टीमों के परिवहन और विशेष अभियानों के लिए किया जाएगा। मोटरसाइकिलें संकरे व कठिन मार्गों पर पुलिस की उपस्थिति को बढ़ाने में मदद करेंगी।

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद भाविकांनी सहकार्य करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद

भाविकांनी सहकार्य करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

पुणेदि.२७: (जिमाका): श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकाम तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने घेतला आहेभाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी केले आहे. 

राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखडा मंजुर केला आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनश्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्तस्थानिक दुकानदार व श्री. भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीत सर्वाच्या सहमतीने मंदिर ९ जानेवारीपासून पुढे तीन महिन्यासाठी (महाशिवरात्रीचा १२ ते  १८ फेब्रुवारी २०२६ हा कालावधी वगळून) तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि भाविकांच्या सोयी करिता महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये  मंदिर दर्शनाकरिता खुले राहणार आहे.

सन २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वरनाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहेत्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५ च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणारे लाखो भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधासभामंडपसुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद करण्यात येणार आहे.

मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्य पूजाअर्चाअभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार व नियोजित वेळेत सुरू राहतील. थेट दर्शन बंद  या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही. बांधकाम यंत्रणाअधिकृत अधिकारी कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

"श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षिततासुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतलेला असून भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थानजिल्हा प्रशासनपोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना पूर्ण सहकार्य करावे," असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डूड्डी यांनी केले आहे.

राज्यभर 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा - जीवन रक्षा’ ही संकल्पना

 राज्यभर 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा - जीवन रक्षा’ ही संकल्पना

 

मुंबईदि. 30 : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभागवाहतूक पोलीस विभागसार्वजनिक आरोग्य विभागशालेय शिक्षण विभाग तसेच इतर संबंधित संस्था व संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचारजनजागृती व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकवाहनचालकविद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (एमओरटीएचयांच्या मार्गदर्शनानुसार या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रमकार्यशाळापरिसंवादवाहनचालक व शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्रेनेत्र तपासणी शिबिर तसेच विविध प्रचारात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

 

यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना सडक सुरक्षा – जीवन रक्षा अशी असून रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडित आहेहा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे पालन वाढेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईलअशी अशा परिवहन आयुक्तमुंबई यांनी व्यक्त केली आहे.

अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन वेळेत व पारदर्शक पद्धतीने होणार

 अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन वेळेत व पारदर्शक पद्धतीने होणार

-         सचिव तुकाराम मुंढे

·         दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सातत्यासाठी नवी कार्यपद्धती

·         दिव्यांगांच्या विशेष शाळांतील अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या

समायोजनासाठी सर्वसमावेशक कार्यपद्धती

 

              मुंबईदि. ३० : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणेनूतनीकरण न करणे तसेच पटनिर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक व एकसंध कार्यपद्धती निश्चित केली आहेअशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.

 सचिव मुंढे म्हणालेयापूर्वी विविध शासन निर्णयपरिपत्रके व शाळा संहितेतील तरतुदी विखुरलेल्या स्वरूपात असल्याने समायोजन प्रक्रियेस विलंब होत होता आणि त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे वाढत होती. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तदिव्यांग कल्याण यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या अतिरिक्त संवर्ग कक्षामार्फत समायोजन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नयेयासाठी समायोजनासाठी कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली आहे. या निर्णयामुळे समायोजन प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन शैक्षणिक सातत्य राखले जाणार असल्याचे सचिव मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

माणगाव, तळा व म्हसळा येथील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा

 माणगावतळा व म्हसळा येथील आदिवासी लाभार्थ्यांसाठी

घरकुलासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करा

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. 30 : माणगावतळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत घरकुले मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

माणगावतळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमाणगाव नगरपंचायतीमधील 45, तळामधील 69 आणि म्हसळा मधील 40 (जि. रायगड) नगरपंचायत क्षेत्रातील घरकुलापासून वंचित असलेल्या अनुसूचित जमातीच्या एकूण 154 घरकुलांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. या घरकुलासंदर्भातील निधी तसेच पात्र लाभार्थ्यांच्या मान्यतेसाठी करावयाची कार्यवाही कालमर्यादेत करावी.

प्रत्येक लाभार्थ्यास रुपये २.५० लाख  प्रमाणे घरकुल अनुदान देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांचा विचार करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ प्रदान करण्यात यावा. या योजनेमुळे शहरी भागातील आदिवासी कुटुंबांना सुरक्षित निवाऱ्याचा लाभ मिळणार आहे.

बैठकीस आदिवासी विभागाचे सहसचिव मच्छिंद्र शेळकेअतिरिक्त आयुक्त गोपीचंद कदमतळा तहसिलदार स्वाती पाटीलमाणगाव उपनगराध्यक्षा रिया उभारे,   आनंद यादवलक्ष्मी जाधवदिलीप जाधवॲड. उत्तम जाधवनाना भुवडजगदिश शिंदेनागेश लोखंडेकिशोर शिंदेपरशुराम कदमअलिम पल्लवकरलक्ष्मण हिलमविजय तांबेशाहीद उकेआदी उपस्थित होते.

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

 जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. ३० :- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी  दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते.

बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेमित्राचे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी लागणारी सर्व  मदत विभाग करेल असे सांगून मंत्री राणे म्हणाले कीकोकणातील उत्पादने लवकरात लवकर आणि सहज निर्यात होण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. बंदराला जोडणी होण्यासाठी कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गतीने हाती घेण्यात येत आहे. उत्पादन तपासणी प्रयोगशाळा १५ जानेवारीपर्यंत सुरू करावी. यंदाच्या हंगामात काजू जयगड बंदरातून निर्यात होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी तयारी करावी. उत्पादकांमध्ये जागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi