Monday, 1 December 2025

डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

 डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

            दहिसर - काशीमिरा मेट्रो डिसेंबर-2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई - विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई - विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकतेअशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

 डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

            दहिसर - काशीमिरा मेट्रो डिसेंबर-2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई - विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई - विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकतेअशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

 डिसेंबर -2026 अखेर मेट्रो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यत..

            दहिसर - काशीमिरा मेट्रो डिसेंबर-2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई - विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई - विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकतेअशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत..

 डिसेंबर अखेर महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत..

                                                                                                - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. 20 :  या वर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा-भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे. तब्बल 14 वर्षाच्या पाठपुराव्याला यश येत असून मिरा-भाईंदरवासियांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहेअशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  दिली.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी दौरा केलात्यावेळी ते  बोलत होते. त्यांच्या सोबत महामेट्रो’ चे अधीक्षक अभियंता व त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम उपस्थित  होती.

मंत्री सरनाईक म्हणाले की,  सन 2009 मध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलोत्यावेळी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. गेल्या 14 वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते  काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसेच एअरपोर्ट टी-1 स्थानक वरून मेट्रो 3 चा वापर करून  थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतील.

त्याचबरोबरनवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मंत्रालयविधान भवन  येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे.

मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकते प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

 मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकते प्रकरणी अहवाल

सादर करण्याचे निर्देश

 

मुंबईदि. २० : मौजे महमदवाडी (ता. हवेलीजि. पुणे) येथील तक्रारप्राप्त जमीन मिळकतीबाबतचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश विधानसभा  उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले .

विधानभवनात आयोजित बैठकीस महसूल उपसचिव अजित देशमुखहवेली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव मानेमंडळ अधिकारी मिलिंद सेठीग्राम महसूल अधिकारी  स्वप्नील आंबेकर उपस्थित होते.

मौजे महमदवाडी (ता. हवेलीजि. पुणे) येथील स.न. ४४एकूण क्षेत्र ५ हेक्टर ९१ आर जमिनीच्या मिळकतीबाबतचे निवेदन प्राप्त झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करूनतक्रारकर्त्यांनी मांडलेल्या सर्व आक्षेपांसंदर्भात सविस्तर तपास अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिले. हवेली तालुक्यातील जमीन बेकायदेशीर ताब्यात घेतल्यासंदर्भात सात दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही उपाध्यक्ष बनसोडे अधिकाऱ्यांना दिले.

टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि

 कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च २६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी दिली. तर तीन टप्प्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत.

राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून

    राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. तसेच राज्य शासनाकडे आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या  पायाभूत सुविधाउद्योग क्षेत्रातील ज्ञानअनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उद्योग समूहांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुढच्या या अनुषंगाने अनेक रोजगाराभिमुख सामंजस्य करार होतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

   यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माव्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे सह संचालक सतीश सूर्यवंशी,  टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे उपाध्यक्ष रमेश रावकंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक भास्कर पै आणि मुख्य व्यवस्थापक रवी  सोनटक्के उपस्थित होते

Featured post

Lakshvedhi