Tuesday, 18 November 2025

राज्यात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीने

  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीराज्यात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीने तातडीचे आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारे उपाययोजना करण्यात याव्यात. तातडीच्या उपायांमध्ये गावे व शहरांजवळील बिबट्यांना शोधून पकडण्यात यावेत. यासाठी ड्रोनची मदत घ्यावी. पिंजरेवाहनेमनुष्यबळ आदी बिबटे पकडण्यासाठी आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावेत. तसेच दीर्घकालीन उपाययोजनेत बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी. तसेच पकडलेल्या नरभक्षक बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात दोन रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने जागा शोधून आराखडे तयार करावेत. तसेच गोरेवाडा सह इतर ठिकाणी सध्या असलेल्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढविण्यात यावी.

बिबट्यांचा समावेश शेड्यूल एक मध्ये आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना पकडणेत्यांना मारणे यावर मर्यादा येतात. त्यामुळे बिबट्यांना शेड्यूल एकमधून काढण्यासंबंधी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी केंद्र शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करण्यात यावीअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

बिबट्यांना शेड्यूल एक मधून बाहेर काढण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरविण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा

 बिबट्यांना शेड्यूल एक मधून बाहेर काढण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

बिबट्याचे मानवावरील हल्ले राज्य आपत्ती

ठरविण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पुणे जिल्ह्यात दोन बचाव केंद्रे सुरू करा

·         गाव/शहराजवळील फिरणाऱ्या बिबटे पकडण्यासाठी ड्रोनचा वापर करा

·         नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करा

·         बिबट्यांचा वावर असलेल्या भागात पोलीस व वन विभागाने गस्त वाढवावी

·         रेस्क्यू टीम व वाहनांची संख्या वाढवावी

मुंबईदि. 18 : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-1 मधून वगळून शेड्यूल-2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करून सादर करावा. मानवांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ठिकाणी तातडीने पिंजरे बसवावेत. यासोबतचपुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर पुढील दोन ते तीन महिन्यांत सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.

राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारवनमंत्री गणेश नाईकजलसंपदा मंत्री गिरीश महाजनआमदार शरद सोनवणेमाजी मंत्री दिलीप वळसे पाटीलमुख्य सचिव राजेश कुमारवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगलराज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) एम श्रीनिवास रावप्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास रेड्डीपुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीराज्यात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीने तातडीचे आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारे उपाययोजना करण्यात याव्यात. तातडीच्या उपायांमध्ये गावे व शहरांजवळील बिबट्यांना शोधून पकडण्यात यावेत. यासाठी ड्रोनची मदत घ्यावी. पिंजरेवाहनेमनुष्यबळ आदी बिबटे पकडण्यासाठी आवश्यक साहित्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून द्यावेत. तसेच दीर्घकालीन उपाययोजनेत बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी. तसेच पकडलेल्या नरभक्षक बिबट्यांना ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात दोन रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने जागा शोधून आराखडे तयार करावेत. तसेच गोरेवाडा सह इतर ठिकाणी सध्या असलेल्या रेस्क्यू सेंटरची क्षमता वाढविण्यात यावी.

बिबट्यांचा समावेश शेड्यूल एक मध्ये आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना पकडणेत्यांना मारणे यावर मर्यादा येतात. त्यामुळे बिबट्यांना शेड्यूल एकमधून काढण्यासंबंधी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी केंद्र शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना शोधून नसबंदी करण्यात यावीअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

विकसित महाराष्ट्र 2047 - उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती

 विकसित महाराष्ट्र 2047 - उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती

-         उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

विद्यापीठांना डॅशबोर्ड ३० नोव्हेंबरपूर्वी परिपूर्ण करण्याचे आदेश

 

मुंबई दि. 17 : महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047’ या उद्दिष्टाच्या दिशेने विद्यापीठांनी ठोस पावले उचलावीतअसे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. प्राध्यापक भरती प्रक्रियाशैक्षणिक गुणवत्ताप्रशासनिक कामकाज आणि एकूणच विद्यापीठांच्या कार्यक्षमता वाढीसाठी तयार करण्यात आलेला एकत्रित डिजिटल डॅशबोर्ड पुढील 15 दिवसांत पूर्णपणे करावा, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले.

विकसित महाराष्ट्र दृष्टीक्षेप 2047 व उच्च शिक्षण शैक्षणिक परिवर्तन : विद्यापीठांची भूमिका व योगदान या विषयी मुंबई विद्यापीठ येथे परिषद झाली. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीमुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरकला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळेउपसचिव प्रताप लुबाळसहसचिव संतोष खोरगडे आणि राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरूप्र-कुलगुरू उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

 लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

 

मुंबई, दि.१७ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया सुरू असतानाअलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमहिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-केवायसी करण्याचा दि. १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होता. आता त्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे.

तसेचज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्रघटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील.

या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये याकरिता ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावीअसे आवाहनही महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी केले आहे.

000

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा' या तीन दिवसीय भव्य

 आज अत्यंत भक्तिमय वातावरणात संत श्री ज्ञानेश्वर चौक कांदिवली पूर्व येथे भक्ती संगीताचा भव्य कार्यक्रम पार पडला. कांदिवली पूर्वचे आमदार भातखळकर या भक्तिमय कार्यक्रमास उपस्थित होते.


'श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा' या तीन दिवसीय भव्य

सोहळ्यात विविध भव्य रांगोळ्यांच्या माध्यमातून संत दर्शन सोहळा, भजन स्पर्धा, सामूहिक पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि भक्तिमय संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन  श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघ व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. खरंच आपल्या सर्वांचे नक्कीच काही पुण्य असेल म्हणून आज आपण श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा' या भव्य कार्यक्रमात विविध पद्धतीने योगदान देऊ शकलो असे उदगार आमदार भातखळकर या  प्रसंगी काढले. या सोहळ्यानिमित्त कीर्तनकार ह. भ. प. तुकाराम महाराज गावडे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कीर्तनाचा आनंद घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.


तसेच या सोहळ्याच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे सदारकर्ते गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या मधुर गायनाने कार्यक्रमाला अध्यात्मिक रंग चढला.

श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघ व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा' या तीन दिवसीय कार्यक्रमानिमित्त दिनांक : १५, १६ व १७ नोव्हेंबर २०२५ (कार्तिक वद्य त्रयोदशी) रोजी सावित्रीबाई फुले मैदान, फाऊंडेशन शाळेसमोर, लोखंडवाला संकुल, कांदिवली (पूर्व) येथे भव्य दिंडी सोहळा - भव्य भजन स्पर्धा - भक्ती संगीताचा कार्यक्रम व रांगोळीच्या माध्यमातून संत दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

विकसित महाराष्ट्र 2047 पर्यत सार्वजनिक विद्यापीठाचे उद्दिष्टे, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांची नॅशनल

 विकसित महाराष्ट्र 2047 पर्यत सार्वजनिक विद्यापीठाचे उद्दिष्टेराज्यातील सार्वजनिक विद्यापीठांची नॅशनल इन्स्टिटयूशनल रॅकिंग फेमवर्क (एआयआरएफ) रँकिंग सुधारणा,शैक्षणिक सुविधा संदर्भात विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीयांनी सादरीकरण केले.

बैठकीत खालील मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली :-

एनआयआरएफ मध्ये सार्वजनिक विद्यापीठांची क्रमवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे

 महाराष्ट्राला जागतिक शिक्षणाचे गंतव्यस्थान बनवणेःराज्याबाहेर जाणारे विद्यार्थी रोखणे आणि एनआरआय व परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे

उच्च-टीआरएल (टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हलसंशोधन आणि व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान पेटंट्स निर्माण करणे

महाविद्यालयांमधील शिक्षणाची पातळी उंचावणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक रोजगारासाठी तयार करणे.

 अभ्यासक्रमांना भावी रोजगार बाजारातील कौशल्ये आणि ज्ञानाच्या मागण्यांशी संरेखित करणे.

जागतिक विद्यापीठांशी सहयोगासाठी विद्यापीठांच्या साधनसंपत्तीचा उपयोग करणे.

सार्वजनिक विद्यापीठांची नॅशनल इन्स्टिटयूशनल रॅकिंग फेमवर्क (एआयआरएफ) रँकिंग सुधारणा,शैक्षणिक सुविधा संदर्भात विभागाचे अपर मुख्य

 विकसित महाराष्ट्र 2047 पर्यत सार्वजनिक विद्यापीठाचे उद्दिष्टेराज्यातील सार्वजनिक विद्यापीठांची नॅशनल इन्स्टिटयूशनल रॅकिंग फेमवर्क (एआयआरएफ) रँकिंग सुधारणा,शैक्षणिक सुविधा संदर्भात विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीयांनी सादरीकरण केले.

बैठकीत खालील मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली :-

एनआयआरएफ मध्ये सार्वजनिक विद्यापीठांची क्रमवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे

 महाराष्ट्राला जागतिक शिक्षणाचे गंतव्यस्थान बनवणेःराज्याबाहेर जाणारे विद्यार्थी रोखणे आणि एनआरआय व परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे

उच्च-टीआरएल (टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हलसंशोधन आणि व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान पेटंट्स निर्माण करणे

महाविद्यालयांमधील शिक्षणाची पातळी उंचावणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक रोजगारासाठी तयार करणे.

 अभ्यासक्रमांना भावी रोजगार बाजारातील कौशल्ये आणि ज्ञानाच्या मागण्यांशी संरेखित करणे.

जागतिक विद्यापीठांशी सहयोगासाठी विद्यापीठांच्या साधनसंपत्तीचा उपयोग करणे.

Featured post

Lakshvedhi