Friday, 14 November 2025

वर्धा जिल्हा ‘प्रेस्बायोपिया’मुक्त करण्यासाठी राज्य शासनाचा नज फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार नज फाऊंडेशनच्या भागीदारीने प्रतिबंधात्मक अंधत्व निवारणाला योगदान मिळेल

 वर्धा जिल्हा प्रेस्बायोपियामुक्त करण्यासाठी

राज्य शासनाचा नज फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार

नज फाऊंडेशनच्या भागीदारीने प्रतिबंधात्मक अंधत्व निवारणाला योगदान मिळेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         प्रेस्बायोपिया निदान व चश्मे वाटपासाठी वर्धा ठरणार मॉडेल’ जिल्हा

·         जिल्ह्यात प्रत्येक नागरिकाची होणार तपासणी व विनामुल्य चश्मे वाटप

 

वर्धादि.13 (जिमाका) : वयोमानपरत्वे जवळपास प्रत्येकच व्यक्तीत Presbyopia अर्थात जरादुरदृष्टी’ किंवा वृद्धापकाळातील दुरदृष्टी’ हा आजार उद्भवतो. वर्धा जिल्ह्याला या आजारापासून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने नज फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी व आजार आढळून आलेल्या व्यक्तींना विनामुल्य चश्मे वितरीत केले जातील. प्रेस्बायोपिया निदान व प्रतिबंधासाठी वर्धेला मॉडेल’ जिल्हा बनविण्यात येणार असून त्याच धर्तीवर पुढे संपुर्ण राज्यात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या भागीदारीमुळे प्रतिबंधात्मक अंधत्व निवारणाला योगदान मिळेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नज फाऊंडेशनचे शिक्षणपर्यावरणउद्योजकता या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आहे. फाऊंडेशनच्या भागीदारीतून वर्धा जिल्ह्यात प्रेस्बायोपिया निदान आणि चष्मा वितरणाचे एक मॉडेल’ तयार होईल. प्रतिबंधात्मक अंधत्व नियंत्रण हे माझ्या प्राधान्याच्या बाबींपैकी एक उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी फाऊंडेशनचे सहकार्य चांगले योगदान देईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारानिमित्त सांगितले. वर्धाचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर व आमदार सुमित वानखेडे यांच्या विशेष पुढाकारातून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

नज फाऊंडेशनसोबत भागीदारीतून संपुर्ण राज्याला प्रेस्बायोपियामुक्त करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या आजाराचे निदान व चश्मे वाटपाची चौकट निश्चित करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत प्रायोगिक तत्वावर ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी साधारणपणे 4 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या कामात वर्धेला मॉडेल’ जिल्हा बनवून पुढे संपुर्ण राज्यात हा उपक्रम राबविला जाईल.

सन 2024 मध्ये वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या साधारणपणे 14 लाख इतकी होती. त्यातील ग्रामीण लोकसंख्या 67 टक्के म्हणजे 9 लाख इतकी आहे. ग्रामीण भागात साधारणपणे 2 लाख प्रेस्बायोपियाचे रुग्ण असण्याचा अंदाज आहे. प्रत्येक नागरिकाची विनामुल्य प्रेस्बायोपियाची तपासणी करुन आजार आढळून आलेल्या रुग्णांना विनामुल्य चश्मे वितरीत केले जातील. प्रेस्बायोपिया रुग्णांची तपासणी व चश्मे वाटपानंतर त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन त्यांचा वार्षिक नफा 130 कोटी रुपयाने वाढण्याचा अंदाज आहे.

नज फाऊंडेशनच्या भागीदारीतून ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्यातील 35 वर्षावरील प्रत्येक व्यक्तींमध्ये प्रेस्बायोपियाबाबत जनजागृती केली जाईल. यासाठी आशानेत्र सखींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नेत्रतज्ज्ञनेत्र सखीआशा ग्रामस्तरावरच प्रेस्बायोपिया तपासणी करतील. हा आजार आढळून आलेल्या रुग्णांना त्यांच्या आवश्यक्तेप्रमाणे गावातच चश्मे वाटप करतील. नज फाऊंडेशन उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य व आवश्यक तेवढे चश्मे तसेच आवश्यक साहित्याचा पुरवठा करतील. मोहिमेंतर्गत प्रशिक्षण तसेच उपक्रमाचे नियंत्रण व मुल्यमापन करणार आहे. 

 

 

प्रेस्बायोपिया म्हणजे काय ?

प्रेस्बायोपिया म्हणजे वयोमानपरत्वे उद्भवणारा डोळ्यांचा आजार. याला जरादुरदृष्टी’ किंवा वृद्धापकाळातील दुरदृष्टी’ असेही म्हणतात. साधारणपणे 40 वर्षानंतर हा आजार दिसून येतो. यात डोळ्यातील लेन्स कमी लवचिक होत असल्याने जवळून पाहण्याची क्षणता कमी होते. लहान अक्षरे वाचतांना त्रास होतोडोकेदुखी आणि डोळ्यांवर ताण येतो. तज्ञ डॅाक्टरद्वारे डोळ्यांची तपासणी आणि आवश्यक्तेप्रमाणे द्वि-फोकल चश्मा हा यावर उपाय आहे.

डिसेंबरमध्ये कारंजातून होणार सुरुवात

वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहिमेची सुरुवात होणार आहे. तालुक्यातील नेत्र सखी व आशांचे विशेष प्रशिक्षण नज फाऊंडेशनच्यावतीने घेतले जातील. त्यानंतर टप्प्याटप्पाने जिल्हाभर मोहिम राबविली जाणार आहे.


नाशिक कुंभमेळा ६८४ कोटी रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना विस्ताराचे काम प्रस्तावित

 मुख्य कामांमध्ये नवीन पूल बांधण्यासाठी ९४ कोटी ८७ लाख रुपयेनाशिक शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वयानासाठी ४३६ कोटी ५६ लाख रुपयेनाशिक शहरात मल:निस्सारण प्रकल्प उभारणीसाठी १ हजार ४७५ कोटी ५० लाख रुपयेनाशिक शहरात गोदावरी काठावर रामकाल पथनिर्मितीसाठी १२० कोटी ८८ लाख रुपयेनाशिक महानगरपालिकेतर्फे ६८४ कोटी रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना विस्ताराचे काम प्रस्तावित आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन हजार २७० कोटी ६० लाख रुपये किमतीचा रस्ते विकासाचा मोठा पायाभूत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापनवाहतूक व्यवस्थापनपायाभूत सोयीसुविधांची निर्मितीसुरक्षास्वच्छतापाणीपुरवठापर्यटनाच्या सुविधा व धार्मिक वारसा संरक्षणात मोठी भर पडणार आहे.

0000000

विकासकुंभाची अशी होणार सुरूवात

 विकासकुंभाची अशी होणार सुरूवात

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित विकासकामांचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २ हजार २७० कोटी रुपयेतर नाशिक महानगरपालिकेतर्फे ३ हजार ३३८ कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे व्यापक पायाभूत सोयीसुविधा उभारणीसुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरणस्वच्छताव्यवस्थापनवाहतूक व्यवस्थेचे सुलभीकरणधार्मिक पर्यटनाच्या सोयीसुविधांचे अद्ययावतीकरणासाठी महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या कामांसाठी एकूण ५ हजार ६५७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.

मुख्य कामांमध्ये नवीन पूल बांधण्यासाठी ९४ कोटी ८७ लाख रुपयेनाशिक शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वयानासाठी ४३६ कोटी ५६ लाख रुपयेनाशिक शहरात मल:निस्सारण प्रकल्प उभारणीसाठी १ हजार ४७५ कोटी ५० लाख रुपयेनाशिक शहरात गोदावरी काठावर रामकाल पथनिर्मितीसाठी १२० कोटी ८८ लाख रुपयेनाशिक महानगरपालिकेतर्फे ६८४ कोटी रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना विस्ताराचे काम प्रस्तावित आहे

स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होणार - गिरीष महाजन

 स्वच्छसुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होणार - गिरीष महाजन

कुंभमंत्री श्री.महाजन म्हणालेसिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध विकासकामांचा शुभारंभ होत आहे. मागील कुंभमेळ्याची दखल घेवून अमेरिकेत शासनाचा सन्मान करण्यात आला होता. यावर्षीदेखील दीड वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचा लौकीक जगभरात पोहोचणाार आहे. यावेळी गतवर्षीपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रयागराजच्या तुलनेत जागा कमी असल्याने येणारा कुंभमेळा सुरक्षित व्हावा यासाठी शासन आणि प्रशासन आतापासून वेगाने काम करीत आहे. स्वच्छसुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नाशिक शहराचा विकासपर्यटनाला चालना आणि रोजगार निर्मितीसाठी कुंभमेळा महत्वाचा असून साधू-महंत आणि नाशिकरांनी सहभागी व्हावेघरचे कार्य समजून देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या आदरातिथ्यासाठी सज्ज व्हावेअसे आवाहन त्यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन दर्जेदार विकासकामांनी नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार

  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी

साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन

दर्जेदार विकासकामांनी नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         साधूसंतांचे मार्गदर्शन आणि नागरिकांच्या

·         सहकार्याने कुंभपर्व यशस्वी होण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास

नाशिकदि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या नाशिक शहरातील पाच हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणारअशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.

ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकुंभमेळा मंत्री गिरीष महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेक्रीडा मंत्री माणिकाराव कोकाटेखासदार राजाभाऊ वाजेखासदार शोभा बच्छावमुख्य सचिव राजेशकुमार व नगर विकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज (दूरदृष्यप्रणालीद्वारे)जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवलेनाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रविण गेडामआयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. 15)देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

 नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर

कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही

शनिवारी (ता. 15)देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

 

मुंबईदि. 13 (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेवून व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहेअसे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर उमेदवाराची स्वत:ची व सूचकांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा (उदा. नगरपरिषद/ नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्रशौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्रनिवडणुकीसाठी बॅंक खात्याचा तपशीलराखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्रपक्षाचा उमेदवार असल्यास जोडपत्र- 1’ किंवा जोडपत्र- 2’ इत्यादी) संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे.

इच्छूक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 24 तास सुरू असेल. तोपर्यंत त्यावर इच्छूक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते व नोंदणी करताना तयार केलेला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो. कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांसह नामनिर्देशनपत्र शनिवारी15 नोव्हेंबर 2025 या सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेतअशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रविवारी (ता. 16) ते स्वीकारण्यात येणार नाहीत. इच्छूक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेतअसे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण २०२४' पुरस्कार १४ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

 ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना

'महाराष्ट्र भूषण २०२४पुरस्कार १४ नोव्हेंबर रोजी प्रदान होणार

मुंबईदि. १३ :- महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 'महाराष्ट्र भूषण २०२४या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची निवड झाली आहे.     

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत उद्या १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ नोएडाउत्तर प्रदेश येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. 

000

Featured post

Lakshvedhi