Thursday, 13 November 2025

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या एमआयएस प्रणालीचा

 महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाच्या एमआयएस प्रणालीचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबईदि.११:- महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळपुणे यांच्या 'मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (https://patsansthaniyamakmandal.in/या संकेतस्थळावरील ऑनलाईन प्रणालीचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

सहकार मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या या कार्यक्रमास  सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआमदार प्रशांत ठाकूरसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेसहकार आयुक्त दीपक तावरेसह सचिव संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणालेया व्यवस्थापन माहिती प्रणालीमुळे सहकारी पतसंस्थांची माहिती, सहकारी संस्थामार्फत होणारा व्यवहारकर्जठेवी यांची माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच या सर्व बाबीवर सहकार विभागास देखरेख करणे सोयीचे होणार आहे. विभागाने माहिती प्रणाली अधिकाधिक अद्ययावत करावी. या प्रणालीवर सर्व सहकारी पतसंस्थांची माहिती विहित कालावधीत भरावी यासाठीही प्रयत्न केले जावेत. भरलेली माहिती डॅशबोर्डवर पाहता यावीअशा सूचनाही सहकार मंत्री पाटील यांनी दिल्या.

श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन

 श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई दि. १३ : 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूरयांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले असल्याची माहिती ‘हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ राज्यस्तरीय समितीने दिली आहे.

श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्यसंयममानवताकरूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ२१ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तरजानेवारीमध्ये नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचा मुंबई येथील कार्यशाळेने शुभारंभ करण्यात आला होता. श्री गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा आणि हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. तहसीलशहर जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात श्री गुरू तेग बहादूर यांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.

या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शिखसिकलीगरबंजारालबानामोहयालसिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडणार आहे. श्री गुरू तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशालीपराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार

 कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद

आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार

 

मुंबईदि. 1जुन्या पुणेमुंबई महामार्गावर पहाटे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर प्रशासन आणि आरोग्य विभागाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे विनामूल्य आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

अपघातानंतर काही मिनिटांतच महावीर हॉस्पिटलकामशेत येथे जखमींना दाखल करण्यात आले. शासनाच्या आपत्कालीन उपचार आदेश (ETI) प्रक्रियेच्या माध्यमातून तत्काळ शस्त्रक्रियाऔषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आल्या. यामुळे कोणत्याही रुग्णाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळाल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपचारऔषधे आणि रुग्णालयीन सेवा या सर्व सुविधा शासनाच्या सहाय्याने पूर्णपणे विनामूल्य पुरविण्यात येत आहेत.

या प्रसंगी आरोग्य विभागाने दाखवलेली संवेदनशीलता आरोग्य हक्क — सर्वांसाठी! या शासनाच्या ध्येयाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी ठरली आहे. शासनाच्या आरोग्य योजनांमुळे ग्रामीण आणि वारकरी समाजालाही अत्याधुनिक उपचार सेवा सहज उपलब्ध होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.

महावीर हॉस्पिटल प्रशासनस्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाने समन्वयातून काम करत सर्व जखमींना तातडीने सेवा उपलब्ध करून दिली. शासनाकडून आवश्यक सुविधाऔषधांचा पुरवठा आणि सर्वतोपरी मदत पुरविण्यात आली आहे.

या घटनेतून शासनाच्या आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेबद्दलची बांधिलकी पुन्हा एकदा दृढ झाली आहे.

समाज में सकारात्मक बदलाव लाने की ताकत प्रशासन में

 समाज में सकारात्मक बदलाव लाने की ताकत प्रशासन में

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदिनांक: 12 नवंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि समाज के अंतिम व्यक्ति के कल्याण को ध्यान में रखते हुए उनके जीवन में सकारात्मक बदलाव लाने की ताकत प्रशासन में है। इस उद्देश्य की पूर्ति के लिए भारतीय प्रशासनिक सेवा का इस्तेमाल किया जाना चाहिए। मुख्यमंत्री ने यह भी उम्मीद जताई कि नए अधिकारी राज्य के विकास की गाथा को आगे बढ़ाने की जिम्मेदारी को सार्थक रूप से निभाएंगे।

इस अवसर पर मुख्यमंत्री ने प्रशासन में आए नए अधिकारियों के समूह से आह्वान किया कि वे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआई) आधारित तकनीक का इस्तेमाल कर नागरिक-केन्द्रित और जवाबदेह प्रशासन व्यवस्था बनाएं।

बिंग, को-पायलट, गूगल बार्ड, जेमिनी आणि परप्लेक्सिटी ही साधने संशोधनासाठी, तर चॅटजीपीटी, गूगल बार्ड आणि जेमिनी ही प्रभावी लिखाणासाठी

 किशार जस्मानी यांनी स्पष्ट केले कीबिंगको-पायलटगूगल बार्डजेमिनी आणि परप्लेक्सिटी ही साधने संशोधनासाठीतर चॅटजीपीटीगूगल बार्ड आणि जेमिनी ही प्रभावी लिखाणासाठी उपयुक्त आहेत. ही टूल्स समस्या सोडविणे आणि सल्ला देणे यासाठीही पत्रकारांना मदत करू शकतात.

प्रत्येक ‘एआय’ टूल्सचा परिणाम ज्ञानप्रॉम्प्टिंग कौशल्य आणि तर्कशक्ती या तीन घटकांवर अवलंबून असतो. प्रॉम्प्टिंगचे तीन प्रकारशून्य शॉटसंदर्भाधारित आणि भूमिकाधारित यांचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पत्रकारितेतील लेखन अधिक परिणामकारक करण्यासाठी ग्रामर्ली हे अ‍ॅपही उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

किशोर जस्मानी यांनी चॅटजीपीटी या साधनाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविले. त्यांनी सांगितले कीफोटो आणि योग्य प्रॉम्प्ट दिल्यानंतर चॅटजीपीटी त्या आधारे वृत्तपत्रीय बातमी तयार करून देते. मात्र यासाठी योग्य प्रॉम्प्ट देणे अत्यावश्यक आहे.

त्याचप्रमाणे चॅटजीपीटीवर आवाज रेकॉर्ड करून हवे त्या भाषेत लेखन करून घेता येतेतसेच व्हॉईस डिक्टेटद्वारेही हे टूल्स पत्रकारांना सहाय्य करते. या प्रक्रियेतून त्यांनी प्रॉम्प्टडिक्टेट आणि डिस्कशन अशा तीन प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखविली.

‘एआय’ टूल्स हस्तलिखित प्रतीवरून स्वयंचलितपणे टंकलेखन करू शकतात. पीडीएफ स्वरूपातील मजकूर चॅटजीपीटीच्या मदतीने कसा उपयोगात आणता येऊ शकतोयाचे सविस्तर मार्गदर्शनही त्यांनी केले.

या प्रशिक्षण सत्रात उपस्थित पत्रकारांनी ‘एआय’ साधनांचा वापर करून प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे सराव केला आणि संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन घेतले.

‘एआय’ साधनांच्या स्मार्ट वापरामुळे बातमी लेखन, संशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी

 ‘एआय’ साधनांच्या स्मार्ट वापरामुळे बातमी लेखन,

संशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी

- एआय तज्ज्ञ किशोर जस्मानी

मुंबईदि. 12 : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा योग्य वापर केल्यास बातमी लेखनसंशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी करता येतेअसे मत ‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथे प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासंदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलेत्यावेळी जस्मानी यांनी मत व्यक्त केले.

‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी म्हणाले कीओपन एआयजेमिनी आणि को-पायलट ही तीन प्रमुख एआय टूल्स पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच क्लॉडडीपसिक आणि परप्लेक्सिटी ही आणखी तीन प्रभावी टूल्स आहेत. प्रत्येक टूल्सचा वापर आवश्यकतेनुसार आणि उद्दिष्टानुसार करावा. जेमिनी संशोधनासाठी विशेषतः उपयुक्त आहेतर डीपसिक उत्तरे देण्यात अधिक प्रभावी ठरते. मात्रमेटा एआय हे पत्रकारितेसाठी तेवढे परिणामकारक नाहीअसे त्यांनी नमूद केले

संपूर्ण प्रशासकीय धोरणे, प्रक्रिया यांचे ' व्हिजिट' करून ' रिइंजिनिअरिंग

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण प्रशासकीय धोरणे, प्रक्रिया यांचे ' व्हिजिट' करून ' रिइंजिनिअरिंग' करण्यासाठी शासनाने १५० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या माध्यमातून बऱ्याच सुधारणा करण्यात येत आहेत. राज्यात सार्वत्रिक औद्योगिक विकास होण्यासाठी गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबई, पुणे प्रमाणेच छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक यासह राज्यात अन्य भागात नवीन औद्योगिक पट्टे निर्माण करण्यात येत आहे. विदर्भामध्ये नागपूर - अमरावती औद्योगिक विकासाचा पट्टा तयार होत आहे. अमरावतीमध्ये पीएम मित्रा पार्क तसेच वस्त्रोद्योग पार्कमुळे औद्योगिक विकासाची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत आज एकही भूखंड शिल्लक राहिलेला नाही. अमरावती विमानतळ नागरी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी एअर इंडियाच्यावतीने आशिया खंडातील सर्वात मोठे 'पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' उभारण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi