Wednesday, 5 November 2025

पैठण येथील श्रीक्षेत्र संतपीठ मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार

 पैठण येथील श्रीक्षेत्र संतपीठ मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार

-         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

संतपीठातील विकासासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मान्यता

 

मुंबई, दि. ४ : समाजात संतांच्या विचारांचातत्त्वज्ञानाचा आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा प्रसार घडविण्यासाठी स्थापन केलेल्या पैठण येथील श्रीक्षेत्र संतपीठ मूलभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चास तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

मंत्रालयात श्रीक्षेत्र संतपीठपैठण येथील मूलभूत सुविधांबाबत आढावा बैठक झाली. बैठकीला  आमदार विलास भुमरेडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारीकुलसचिव प्रशांत अमृतकरसंतपीठाचे संचालक प्रवीण वक्तेउच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकरतसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याकडे पाच वर्षासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .तसेच संतपीठात  सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमासाठी अध्यापक -अध्यापकेतर कर्मचारी वेतन खर्चासाठी प्रतिवर्षी 1 कोटी  देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय संत परंपरा आणि लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन  संतपीठाच्या माध्यमातून  केले जात आहे. त्यामुळे  सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.असेही मंत्री पाटील  यांनी  सांगितले.

मनुष्यहानी रोखणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य…

 मनुष्यहानी रोखणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य

या ठोस उपाययोजनांमुळे बिबट्यांना मानवी वस्त्यांपासून सुरक्षित अंतरावर ठेवणेत्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करणे आणि मनुष्यहानीचे प्रमाण कमी करणे शक्य होईल. मानव-बिबट संघर्षामुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आणि वन्यजीवांचे संरक्षण करताना मानवी जीविताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.

या निधीतून रेस्क्यू टीमपिंजरे आणि तांत्रिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. कारवाई तातडीने सुरू होईलमनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

मानव-बिबट्या संघर्षावर मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य

 मानव-बिबट्या संघर्षावर मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य

-उपमुख्यमंत्री अजित पवार

·         पुणे जिल्ह्यात २० रेस्क्यू टीम५०० पिंजरेअत्याधुनिक उपकरणांसह उपाययोजना

 

मुंबईदि. ४ :- मागील काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील जुन्नरआंबेगावखेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये मानव-बिबट्या संघर्षाची परिस्थिती गंभीर बनली आहेया पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीची दखल घेत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आणि मानव-बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नरआंबेगावखेड आणि शिरुर या तालुक्यात ऊसाचे क्षेत्रपाण्याच्या मुबलकतेसह अनुकुल वातावरणामुळे गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या भागात बिबट्या आणि नागरिकांच्यात सातत्याने संघर्ष होत आहे.  बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि मानवी वस्त्यांमध्ये त्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांत एका १३ वर्षीय चिमुरड्याचातसेच एका वृद्ध महिलेसह लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. याला पायबंद घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आंबेगावचे स्थानिक आमदारमाजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मंजूर निधीतून जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात २० विशेष रेस्क्यू टीम कार्यरत होणार असून प्रत्येक टीममध्ये प्रशिक्षित नेमबाजशोधकट्रँक्वालायझिंग गनरेस्क्यू वाहनेअत्याधुनिक कॅमेरेपिंजऱ्यांसह आवश्यक उपकरणांचा समावेश असेल.

           

या मोहिमेत ५०० पिंजरे२० ट्रँक्युलायझिंग गन५०० ट्रॅप कॅमेरे२५० लाईव्ह कॅमेरे५०० हाय-पॉवर टॉर्च५०० स्मार्ट स्टिक२० मेडिकल इक्विपमेंट किट्स यांसह प्रत्येक टीमसाठी ५-६ प्रशिक्षित सदस्य असणार आहेत. जुन्नर वनविभागात ६११.२२ चौ.कि.मी. क्षेत्र आहे ज्यात जुन्नरआंबेगावखेड आणि शिरूर या चार तालुक्यांचा समावेश आहे. घोडकुकडीमाणिकडोहपिंपळगाव जोगा यांसारख्या सिंचन प्रकल्पांमुळे या भागात ऊसकेळीद्राक्षडाळिंब यांसारखी दिर्घकालीन बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या बागायती पिकांमुळे बिबट्यांना लपण्यासाठी निवारापाणी आणि भक्ष्य सहज उपलब्ध होते. परिणामी या भागात बिबट्यांचा स्थायिक अधिवास निर्माण झाला असून अंदाजे १५०० बिबट्यांचे अस्तित्व असल्याचे वनविभागाचे निरीक्षण आहे.

या निधीसाठी आंबेगावचे आमदार तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. यापूर्वीही जिल्हा नियोजन मंडळामार्फत २ कोटी रुपयांचा निधी पिंजरे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून पिंजरे खरेदीचे कार्यादेश देण्यात आले आहेत.

स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राऊंड मेट्रो मार्च 2029 पर्यंत,हडपसर - लोणी काळभोर कॉरिडोर

 स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राऊंड मेट्रो मार्च 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी हा कॉरिडोर जुलै 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. पुणे मेट्रो लाईन 3 चे लवकर पूर्ण करून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या प्रकल्पासाठी तात्काळ भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

हडपसर - लोणी काळभोर कॉरिडोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करतांना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे नियोजन करण्याचे निर्देश देत मल्टीलेव्हल इंटेग्रेशन करून मोठ्या प्रमाणात पार्किंग सुविधा निर्माण करण्याचेही निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले.


लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे

 लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नवनवीन प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. पुण्यातील मेट्रो सहा कोचच्या करून हे सर्व प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होतीअसे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले. पुण्यात मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. पुणे चिंचवड महानगरपालिका ते निगडी या 4.4 किमी लांबीची इलिव्हेटेड मेट्रोचे काम हाती घेण्यात आले असून हा प्रकल्प जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे.

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रिंग रोडसह आंतर रिंग उभारणे आवश्यक

 नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रिंग रोडसह आंतर रिंग उभारणे आवश्यक आहे. या रिंग रोडमुळे नाशिक कुंभमेळ्याकरिता सात मार्गाने येणाऱ्या भाविकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या रिंग रस्त्यांची कामे मार्च-जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर नाशिक येथे 66 किमीचा आंतर रिंग रोड उभारण्यास आज मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर या रस्त्यांकरिता आवश्यक लागणाऱ्या भूसंपादनासही मान्यता देण्यात असून यासाठी लागणारा खर्च नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उत्तन-विरार सागरी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेमुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीउत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी 55.12 किमी असून मुख्य सागरी सेतू 24.35 किमी लांबीचा असणार आहे. या प्रकल्पात 9.32 किमी लांबीचा उत्तन जोडरस्ता, 2.5 किमीचा वसई जोडरस्ता आणि 18.95 किमीचा विरार जोडरस्ता तयार करण्यात येणार असून आता तो वाढवण बंदरापर्यंत वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील उत्तर-दक्षिण रस्ता जोडणीचे काम सुरू असून दक्षिण किनारी रस्तावांद्रे वरळी सागरी सेतूअटल सेतूचे काम पूर्ण झाले असून आरेंज गेट बोगदावर्सोवा-वांद्रे सागरी सेतूउत्तर किनारी मार्गदिल्ली-मुंबई महामार्गशिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर उत्तन विरार सागरी सेतू आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे मुंबईतील प्रवास अखंड होणार असून वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.

Featured post

Lakshvedhi