Thursday, 7 August 2025

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढविण्यासाठी

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

 – अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. 7 : अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.

अल्पसंख्याक व औकाफ विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुलेजैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधीविभागाचे सचिव रूचेश जयवंशीआयुक्त प्रतिभा इंगळेउपसचिव मिलिंद शेणॉय यांच्यासह विभागीय अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विकास मंत्री कोकाटे म्हणाले कीअल्पसंख्याक विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये आणि जास्तीत जास्त विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहोचावेत यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच शैक्षणिकसामाजिकआर्थिककौशल्य विकास व पायाभूत सुविधा योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.

यावेळी विभागाच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. सध्या राज्यात २६ ठिकाणी मुलींसाठी वसतीगृहे कार्यरत असून तीन ठिकाणी बांधकाम प्रगतीपथावर आहे. नव्याने एका वसतीगृहास मान्यता देण्यात आली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यासाठी मराठी फाउंडेशन वर्गही सुरू करण्यात आले आहेत.

स्पर्धा परीक्षांसाठी मुंबईनागपूरछत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या केंद्रांमध्ये प्रत्येकी १० अनिवासी महिला उमेदवारांना दरमहा चार हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जात आहे. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आहारभत्ता दिला जातो.

छत्रपती संभाजीनगरनागपूर आणि अमरावती विभागातील १५ जिल्ह्यांमध्ये एकूण २८०० महिला बचतगट तयार केले जाणार असूनया महिलांना कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० उमेदवारांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण खासगी संस्थेमार्फत देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्य अल्पसंख्याक आयोगराज्य उर्दू अकादमीराज्य हज समितीराज्य वक्फ बोर्डजैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळराज्य पंजाबी साहित्य अकादमी यांच्या कार्याचा आढावाही यावेळी घेण्यात आली. योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री कोकाटे यांनी यावेळी दिले.

राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा व रुग्णवाहिका सेवांचा सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

 राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा व रुग्णवाहिका सेवांचा

सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

 

मुंबईदि. ७ : आरोग्य भवन येथे राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा१०२ रुग्णवाहिका सेवा व आरोग्य विभागाच्या परिवहन सेवेचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला.

 

बैठकीत जलजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवरराज्यातील आरोग्य संस्थांच्या परिसरातील जलस्रोतांचे पाणी शुद्ध व सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी ग्रामपंचायतींना रेड कार्ड’ व ग्रीन कार्ड’ देऊन जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आयपीएचएस (IPHS) मानकांनुसार सुसज्ज असाव्यातआधुनिक उपकरणे व प्रशिक्षित कर्मचारी असावेत आणि परिसर स्वच्छ असावायावर भर देण्यात आला.

 

मंत्री श्री. आबिटकर यांनी खासगी रुग्णालयातील रुग्णांनी देखील सरकारी प्रयोगशाळेत तपासण्या कराव्यातयासाठी प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्याचे निर्देश दिले. यामुळे शासनाला अतिरिक्त निधी मिळेलअसेही त्यांनी सांगितले.

 

१०२ टोल फ्री रुग्णवाहिका सेवेसंदर्भात मंत्री श्री.बाबिटकर यांनी सूचना देताना सांगितले कीजननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वापरात असलेल्या रुग्णवाहिका केवळ महिला व बालकांसाठी न वापरताआपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत इतर रुग्णांसाठीही वापरल्या जाव्यात. १०२ कॉल सेंटरचे योग्य प्रकारे मॉनिटरिंग करण्याचेही आदेश देण्यात आले.

 

यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व सूचना त्वरित अंमलात आणून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेअतिरिक्त संचालक डॉ. सुनिता गोल्हाईत तसेच आरोग्य विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील आरोग्य संस्थांना आवश्यक सुविधा द्या

 मावळ तालुक्यातील आरोग्य संस्थांना आवश्यक सुविधा द्या

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. ७ : मावळ तालुक्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय वडगाव (कान्हे) व लोणावळा येथील आरोग्य संस्थांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आरोग्यविषयक विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळकेआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकरतसेच आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

वडगाव (कान्हे) येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी विविध योजनांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये रुग्णालयाचे श्रेणीवर्धनडायलिसिस केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी व पद निर्मितीट्रामा केअर सेंटरसाठी आवश्यक मनुष्यबळाची भरतीसिटी स्कॅन व एमआरआय सेवा सुरू करणेमॉड्युलर ऑपरेशन थिएटर व सर्जिकल साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणेतसेच स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे यांचा समावेश होता.

Visually Impaired and tribal students, Self Help Groups Women tie Rakhi to State Governor

 Visually Impaired and tribal students,

Self Help Groups Women tie Rakhi to State Governor

 

Mumbai 7 : Visually impaired girls , tribal students from Thane, Palghar and Raigad districts and members of Women's Self Help Groups from Mumbai tied rakhi to Maharashtra Governor C.P. Radhakrishnan ahead of Rakshabandhan at Raj Bhavan Mumbai on Thursday (7 Aug).

Tribal women members from the Seva Vivek – Vivek Rural Development Center, Bhalivali, District Palghar tied bamboo rakhi to the Governor.

The Governor accepting the rakhi enquired about the students and women and presented to them raksha bandhan gifts and sweets.

Girls from Sindhutai Sapkal's Mamta Bal Sadan, Girl students from Integrated Tribal Development Project, Shahapur (District Thane), students from Integrated Tribal Development Project, Pen (District Raigad), girl students from the National Association for the Blind (NAB), Mumbai also tied rakhi to the Governor.

Members of Women's Self-help groups such as Pratiksha Mahila Bachat Gat, Ovi Mahila Bachat Gat, Sahayati Mahila Bachat Gat, Shur Mahila Bachat Gat, and Unnati Mahila Bachat Gat from Mumbai also tied rakhis to the Governor, symbolizing respect, protection, and social harmony.

Members of Bharat Vikas Parishad, Matunga Branch and sisters of Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya, Nepean Sea Road Branch also tied rakhi to the Governor


दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

 दृष्टिहीन मुलीआदिवासी विद्यार्थिनीबचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

 

 मुंबई, दि.7 : दृष्टिहीन विद्यार्थिनीठाणेरायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनीमुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना राखी बांधली व ओवाळले. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरभालिवलीजिल्हा पालघर येथून आलेल्या आदिवासी महिलांनाही राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली राखी बांधली.

            रक्षाबंधनानिमित्त विविध संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थिनीभगिनी व बांधवांनी गुरुवारी (दि. 7) राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली व ओवाळले.

            यावेळी राज्यपालांनी सर्वांच्या राखीचा विनम्रपणे स्वीकार करीत सर्वांची विचारपूस केली व भेटवस्तू दिल्या.

राज्यपालांची भेट घेतलेल्या संस्थांमध्ये सिंधुताई सपकाळ यांनी सुरु केलेले ममता बाल सदन (बालगृह)कुंभारवळणमुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनीमुंबई मनपा अंतर्गत विविध महिला बचत गटांच्या सदस्यएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पशहापूर,जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पपेण (जिल्हा रायगड) येथील विद्यार्थींनीनॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)च्या येथील दृष्टिहीन विद्यार्थिनीप्रतीक्षा महिला बचत गटातील महिला यांचा समावेश होता.

भारत विकास परिषद, माटुंगा तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी व बांधवांनी देखील राज्यपालांना राखी बांधली.


रत्नागिरी नर्सरी


 

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटी

 नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन दिवशी मुंबई शहर आणि

मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीयनिमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटी

 

मुंबईदि. ७ :  सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्ताने  स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही स्थानिक सुटी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असून यासंदर्भातील शासन शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२५ या वर्षातील महत्वाच्या सण-उत्सवांकरिता स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये शनिवारीदि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि शनिवारीदि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १८ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन  परिपत्रकानुसार सुटी जाहीर करण्यात आली होती. तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या ७ ऑगस्ट २०२५ च्या शासन शुद्धिपत्रकानुसार १८ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुट्ट्यांऐवजी  दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमा व दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील असे शासन शुद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

००००


Featured post

Lakshvedhi