Thursday, 7 August 2025

मावळ तालुक्यातील आरोग्य संस्थांना आवश्यक सुविधा द्या

 मावळ तालुक्यातील आरोग्य संस्थांना आवश्यक सुविधा द्या

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. ७ : मावळ तालुक्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय वडगाव (कान्हे) व लोणावळा येथील आरोग्य संस्थांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आरोग्यविषयक विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळकेआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकरतसेच आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

वडगाव (कान्हे) येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी विविध योजनांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये रुग्णालयाचे श्रेणीवर्धनडायलिसिस केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी व पद निर्मितीट्रामा केअर सेंटरसाठी आवश्यक मनुष्यबळाची भरतीसिटी स्कॅन व एमआरआय सेवा सुरू करणेमॉड्युलर ऑपरेशन थिएटर व सर्जिकल साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणेतसेच स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे यांचा समावेश होता.

Visually Impaired and tribal students, Self Help Groups Women tie Rakhi to State Governor

 Visually Impaired and tribal students,

Self Help Groups Women tie Rakhi to State Governor

 

Mumbai 7 : Visually impaired girls , tribal students from Thane, Palghar and Raigad districts and members of Women's Self Help Groups from Mumbai tied rakhi to Maharashtra Governor C.P. Radhakrishnan ahead of Rakshabandhan at Raj Bhavan Mumbai on Thursday (7 Aug).

Tribal women members from the Seva Vivek – Vivek Rural Development Center, Bhalivali, District Palghar tied bamboo rakhi to the Governor.

The Governor accepting the rakhi enquired about the students and women and presented to them raksha bandhan gifts and sweets.

Girls from Sindhutai Sapkal's Mamta Bal Sadan, Girl students from Integrated Tribal Development Project, Shahapur (District Thane), students from Integrated Tribal Development Project, Pen (District Raigad), girl students from the National Association for the Blind (NAB), Mumbai also tied rakhi to the Governor.

Members of Women's Self-help groups such as Pratiksha Mahila Bachat Gat, Ovi Mahila Bachat Gat, Sahayati Mahila Bachat Gat, Shur Mahila Bachat Gat, and Unnati Mahila Bachat Gat from Mumbai also tied rakhis to the Governor, symbolizing respect, protection, and social harmony.

Members of Bharat Vikas Parishad, Matunga Branch and sisters of Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya, Nepean Sea Road Branch also tied rakhi to the Governor


दृष्टिहीन मुली, आदिवासी विद्यार्थिनी, बचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

 दृष्टिहीन मुलीआदिवासी विद्यार्थिनीबचत गट महिलांकडून राज्यपालांना रक्षाबंधन

 

 मुंबई, दि.7 : दृष्टिहीन विद्यार्थिनीठाणेरायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनीमुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना राखी बांधली व ओवाळले. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरभालिवलीजिल्हा पालघर येथून आलेल्या आदिवासी महिलांनाही राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली राखी बांधली.

            रक्षाबंधनानिमित्त विविध संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थिनीभगिनी व बांधवांनी गुरुवारी (दि. 7) राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली व ओवाळले.

            यावेळी राज्यपालांनी सर्वांच्या राखीचा विनम्रपणे स्वीकार करीत सर्वांची विचारपूस केली व भेटवस्तू दिल्या.

राज्यपालांची भेट घेतलेल्या संस्थांमध्ये सिंधुताई सपकाळ यांनी सुरु केलेले ममता बाल सदन (बालगृह)कुंभारवळणमुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनीमुंबई मनपा अंतर्गत विविध महिला बचत गटांच्या सदस्यएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पशहापूर,जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पपेण (जिल्हा रायगड) येथील विद्यार्थींनीनॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)च्या येथील दृष्टिहीन विद्यार्थिनीप्रतीक्षा महिला बचत गटातील महिला यांचा समावेश होता.

भारत विकास परिषद, माटुंगा तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी व बांधवांनी देखील राज्यपालांना राखी बांधली.


रत्नागिरी नर्सरी


 

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटी

 नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन दिवशी मुंबई शहर आणि

मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीयनिमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटी

 

मुंबईदि. ७ :  सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्ताने  स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही स्थानिक सुटी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असून यासंदर्भातील शासन शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२५ या वर्षातील महत्वाच्या सण-उत्सवांकरिता स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये शनिवारीदि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि शनिवारीदि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १८ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन  परिपत्रकानुसार सुटी जाहीर करण्यात आली होती. तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या ७ ऑगस्ट २०२५ च्या शासन शुद्धिपत्रकानुसार १८ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुट्ट्यांऐवजी  दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमा व दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील असे शासन शुद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

००००


राज्य सरकार उत्तराखंडमधील पर्यटकांच्या संपर्कात; 120 पर्यटकांशी संवाद राज्यातील 31 पर्यटकांच्या संपर्कासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी साधला उत्तराखंडच्या मुख्य सचिवांशी संपर्क

 राज्य सरकार उत्तराखंडमधील पर्यटकांच्या संपर्कात; 120 पर्यटकांशी संवाद

राज्यातील 31 पर्यटकांच्या संपर्कासाठी

मुख्य सचिव राजेश कुमार यांनी साधला उत्तराखंडच्या मुख्य सचिवांशी संपर्क

 

मुंबई, दि. 7 :- उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात 151 पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिकजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 120 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅंम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित 31 पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून पर्यटकांना शोधण्यासाठी आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली. ढगाळ वातावरणामुळे मोबाईल नेटवर्क आणि बॅटरी चार्जिंग नसल्याने त्यांचा संपर्क होत नाहीसंपर्क झाल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याची ग्वाही श्री. बर्धन यांनी दिली.

            मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्य आपत्ती कक्षातून उत्तराखंडमधील पर्यटकांबाबत आढावा घेतला. बैठकीला मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठीआपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

राज्याचे आपत्ती नियंत्रण कक्ष राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्रउत्तराखंडच्या आपत्ती नियंत्रण कक्षजिल्हा नियंत्रण कक्षउत्तरकाशी यांच्याशी सातत्याने संपर्कात असून महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नातेवाईकांनी काळजी करू नयेअसे श्री. राजेश कुमार यांनी सांगितले. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पर्यटकांना रेल्वे किंवा विमानाने आणण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

            उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत बचाव कार्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  आज सर्व पर्यटकांना हेलीकॉप्टरच्या मदतीने हर्षील हेलीपॅड येथून गंगोत्री येथे बसइतर वाहनेपायी आणण्यात येणार आहे. गंगोत्री ते हर्षील हेलीपॅडदरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी 10 आयटीबीपी टीम सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम 30 यात्रेकरुंना संरक्षण देणार आहे. शिवाय लष्करराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद केंद्रराज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र आणि स्थानिक बचाव पथक धराली येथे कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ढगाळ हवामानामुळे संपर्क यंत्रणा व रस्ते अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. संपर्क व रस्ते पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय आपत्कालिन प्रतिसाद केंद्र नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून अडकलेल्या पर्यटकांचे स्थलांतर अपेक्षित आहे. उत्तराखंडमध्ये आपत्ती बचाव कार्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांच्याद्वारे उपग्रह फोन (Satellite Phone) सुरू करण्यात आले आहेत. पर्यटकांचे शेवटचे ठिकाण (लोकेशन) जाणून घेण्यासाठी दूरसंचार विभागाची मदत घेवून पर्यटकांचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिल्याचे श्रीमती सेठी यांनी सांगितले.

संपर्क होत नसल्याले पर्यटक ठाणे-5सोलापूर-4अहिल्यानगर-1नाशिक-4मालेगाव-3चारकोप कांदिवली-6मुंबई उपनगर-6 आणि टिटवाळ्यातील दोन पर्यटकांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे राज्य आपत्कालीन कक्ष सतत उत्तराखंड आपत्ती कक्षाच्या सतत संपर्कात असून बचाव कार्यासाठी आवश्यक समन्वयमाहिती अद्ययावत करणे आणि संबंधित कुटुंबियांना मदत पुरविण्यासाठी कार्यरत आहे.

 

 महाराष्ट्र संपर्क क्रमांक -

राज्य आपत्कालीन कार्य केंद्रमहाराष्ट्र संपर्क: 93215 87143/ 022-22027990/022-22794229डॉ. भालचंद्र चव्हाणसंचालकआपत्ती व्यवस्थापन केंद्र महाराष्ट्र -9404695356

उत्तराखंड राज्य आपत्कालीन कार्य केंद्र संपर्क 0135-2710334/8218867005श्री. प्रशांत आर्यजिल्हाधिकारीउत्तरकाशी- मोबाईल क्रमांक: 9412077500/ 8477953500मेहेरबान सिंग (भाप्रसे) (समन्वय अधिकारी)- 9412925666श्रीमती मुक्ता मिश्रासहायक जिल्हाधिकारीउत्तरकाशी- 7579474740जय पनवारआपत्ती व्यवस्थापन कक्षउत्तराखंड- 9456326641सचिन कुरवे (भाप्रसे) (समन्वय अधिकारी) – 8445632319.

००००

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

 इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

 

मुंबई, दि. ७ : राज्यातील इतर मागास प्रवर्गविमुक्त जातीभटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी वर्ष २०२५-२६ करीता वसतिगृहज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अवर सचिव आ. सु. जोगळेकर यांनी  दिली आहे.

 

बी.ए.,बी. कॉम.बी.एस.सी. अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए.एम.एस.सी. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करावेत. १२ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी अंतिम करून प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी १ सप्टेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २ सप्टेंबर २०२५ रोजी रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतीक्षा यादी मधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वसतिगृह प्रवेशासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहेअसे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

000

Featured post

Lakshvedhi