Sunday, 1 June 2025

चक्र'च्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आ byणि स्टार्टअपला बळ मिळेल cr, ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन · सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

 चक्र'च्या माध्यमातून संशोधननाविन्यता आणि स्टार्टअपला बळ मिळेल

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी

·         आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्रचे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

·         सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

 

नाशिक दि. १: विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधननाविन्यता आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले 'चक्र' ( सेंटर फॉर हेल्थअप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) हे उपयुक्त ठरेल. आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण  होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्र’ चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा (विदर्भतापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजनवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (दूरदृष्यप्रणाली द्वारे)शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसेअन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य विभागाचे मंत्री  नरहरी झिरवळवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकरनाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडामविद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त),  -कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ आदी यावेळी उपस्थित होते. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमहाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून  गेल्या 2 वर्षात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत.  आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या 25 वर्षात चांगले काम केले आहे.

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी केले बेंगळूर येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

 कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी केले बेंगळूर येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी  केंद्राच्या पाहणीनंतर  कृषी विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंशी सविस्तर चर्चा केली. या बैठकीत नवप्रवर्तन केंद्राच्या कार्यपद्धती व पायाभूत सुविधाविद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानामुळे मिळणारे व्यावहारिक ज्ञान व कौशल्यशेतकऱ्यांच्या अनुभवांद्वारे मिळालेला फायदा — उत्पादनवाढखर्चात बचतआणि शाश्वत शेतीकडे वाटचाल याविषयी सविस्तर चर्चा झाली.

केंद्रात सादर करण्यात आलेल्या तंत्रज्ञान व नवकल्पनांनी कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे प्रभावित झाले. त्यांनी अशा केंद्रांचा शेतीतील क्रांतीसाठी असलेला उपयोग आणि विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी उपक्रमांची माहिती घेऊन राज्यात त्याबाबत नक्कीच कार्यवाही करू  असेही सांगितले.

• स्वयंचलित ट्रॅक्टर्स आणि कृषी अवजारे: स्वयंचलित ट्रॅक्टर व त्यांच्यासोबत चालणाऱ्या अवजारांची कार्यक्षमता व श्रमबचतीसाठी असलेले महत्त्व.

• कृषी ड्रोन: ड्रोनचा वापर पिकांचे निरीक्षणकीड ओळखआणि अचूक फवारणीसाठी कसा करता येतो याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलेशेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या उपक्रमाची माहिती घेतली.

• प्रेसिजन शेती तंत्रज्ञान: जी. पी. एस. आधारित प्रणाली व बदलत्या दराने खते व औषधे देण्याच्या प्रणालीसह अचूक शेती तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

• शेती उपकरण डिझाईन लॅब्स: स्थानिक गरजांसाठी उपयुक्त व नवोन्मेषक्षम शेती उपकरणे तयार करणाऱ्या लॅब्सची यावेळी माहिती  देण्यात आली.

 

0000


बेंगळुरू येथील इनोव्हेशन केंद्र आणि कृषी विज्ञान विद्यापीठाला कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांची भेट

 बेंगळुरू येथील इनोव्हेशन केंद्र आणि कृषी विज्ञान विद्यापीठाला

कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांची भेट

 

मुंबईदि.: स्मार्ट शेतीसाठी बेंगळूरच्या धर्तीवर  महाराष्ट्रात  प्रगत कृषी केंद्रांची (इनोव्हेशन केंद्र) उभारणी  करण्याचा धोरणात्मक आराखडा तयार करण्यात येईल. यामुळे शेतीत शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळेल व शेतकऱ्यांना नव्या साधनांचा लाभ होईलज्यामुळे शेती अधिक उत्पादनक्षमकार्यक्षम व शाश्वत होईल.असे मत कृषिमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

            बेंगळुरू येथील  स्मार्ट शेतीसाठी नवप्रवर्तन केंद्रकृषी विज्ञान विद्यापीठ (UAS) ला  कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. कृषी विज्ञान विद्यापीठचे  कुलगुरू, स्मार्ट शेतीसाठी इनोव्हेशन केंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कृषीमंत्री अॅड माणिकराव कोकाटे यांनी  व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने स्मार्ट शेतीसाठी (CDSA)इनोवेशन केंद्रात वापरल्या जाणाऱ्या प्रगत कृषी तंत्रज्ञान व नवकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव या भेटीदरम्यान घेतला. महाराष्ट्रात अशा प्रकारची अत्याधुनिक केंद्रे स्थापन करण्यासाठी शक्यता आणि कार्यपद्धती यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना लाभ देणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. यावेळी शिष्टमंडळाने संपूर्ण नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी केली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद

 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद

-सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

·         स्मारकाच्या जागेची पाहणी

 

        मुंबईदि. 1 : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

            सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणालेसद्यःस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अधिकाऱ्यासमवेत आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे. स्मारक उभारणीमुळे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी खासदार धैर्यशील मानेआमदार सत्यजित देशमुखआमदार सदाभाऊ खोतआमदार डॉ. अशोकराव मानेजिल्हाधिकारी अशोक काकडेबार्टीचे महासंचालक सुनिल वारे तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कुटुंबातील सदस्य सचिन साठे उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीला भेट देऊन शिल्पसृष्टीची ही पाहणी केली तसेच त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

जैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरु -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा · जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

 जैन समाजाच्या विकासाच नवीन अध्याय सुरु

-कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

·         जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

 

मुंबईदि. 1 : जैन समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहेजैन समाजाच्य सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मुंबईशहरातील मल्होत्रा हाऊस इमारतीत जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सुरू करण्यात आलेया कार्यालयाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या हस्ते तर अध्यक्षा आभा सिंह यांच्या उपस्थितीत झाले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीजैन समाजाच्या विकास व उत्थानासाठी शासन कटीबद्ध आहे. महामंडळाच्या सुयोग्य व प्रभावी संचालनासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल.

 महामंडळाचे अध्यक्ष श्री ललित गांधी यांनी महामंडळाचे कार्य विषद केलेत्यांनी 26 जिल्ह्यांचा दौरा करत 22 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केलेया दौऱ्यांदरम्यान जैन समाजासाठी महामंडळाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचारासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले.

  

महामंडळासाठी केंद्राच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक महामंडळअध्यक्षा आभा राणी सिंह यांनी सांगितले. सरकारच्या विविध महामंडळांमध्ये जैन महामंडळाची स्वतंत्र व विशेष ओळख निर्माण करणे तसेच समाजामध्ये विविध सरकारी योजनांबाबत जनजागृती निर्माण करणेहा एक सातत्यपूर्ण व यशस्वी प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभा महामंडळाचे उपाध्यक्ष मीतेश नहाटासमन्वयक संदीप भंडारीजवाहरभाई शाहहितेश मोताव्यवस्थापकीय संचालक जी.पी मकदूमपंजाबी अकादमीचे अध्यक्ष बल मलकत सिंहविकास आच्छा यांच्यासह जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.

किमान 10 जूनपर्यंत पावसात घट; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये ,pl share

 किमान 10 जूनपर्यंत पावसात घट;

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

 

मुंबईदि. 1 : बदललेल्या वातावरणामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झालीअसल्याने मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मॉन्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहेज्यामुळे यादरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित आहेज्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल. विदर्भात 40 अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि खानदेशात कमाल तापमान 35 ते 40 अंशामध्ये राहील. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे.  

कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नयेअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

000

नाशिक कुंभमेळा,त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

 प्रारंभी सर्व साधूमहंतांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे मंत्रोच्चारात स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्व साधूमहंतांचे शासनातर्फे स्वागत केले.

 

नाशिक कुंभमेळा

 

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार 31 ऑक्टोबर 2026दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी

(स्थळ-रामकुंड पंचवटी) 

प्रथम अमृतस्नान-सोमवार 2 ऑगस्ट 2027,आषाढ सोमवती अमावस्या.

महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार 31 ऑगस्ट 2027श्रावण अमावस्या 

तृतीय अमृतस्नान-शनिवार 11 सप्टेंबर 2027भाद्रपद शुद्ध एकादशी

 

त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

 

सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ- शनिवार 31 ऑक्टोबर 2026, 

प्रथम अमृतस्नान-सोमवार 2 ऑगस्ट 2027आषाढ सोमवती अमावस्या.

महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार 31 ऑगस्ट 2027श्रावण अमावस्या 

तृतीय अमृतस्नान-शनिवार 12 सप्टेंबर 2027भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी). 

 

 

याशिवाय नाशिक येथे सिंहस्थ पर्व पर्वकालातील सर्व एकादशीपौर्णिमाअमावस्या वैधृती व्यतिपात योग हे दिवस भाविकांसाठी तीर्थस्थानदर्शन पर्व असतील. नाशिक येथे कुंभमेळा 2027 मध्ये मुख्य तीन पर्वण्यांव्यतिरिक्त पर्वस्नानाचे एकूण 44 मुहूर्त असून त्रंबकेश्वर येथे पर्वस्नानाचे एकूण 53 मुहूर्त आहेत. भाविकांनी अमृत स्नानाशिवाय पर्वस्नानाचा दिवशी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

 

(





Featured post

Lakshvedhi