Sunday, 27 April 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांवरच भारतीय समाजव्यवस्था उभी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांवरच

भारतीय समाजव्यवस्था उभी

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

            मुंबईदि. 25 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांवरच भारतीय समाजव्यवस्थेची भक्कम रचना उभी असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. लंडनमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'न्यायसमानता आणि लोकशाहीची पूर्वकल्पना- जागतिक दृष्टिकोनया आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित होते.

              ही आंतरराष्ट्रीय परिषद बार्टीग्रेस इन सोसायटीलंडनमुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीलंडन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये जगभरातील नामवंत अभ्यासकांनी सहभाग घेतला.या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे संशोधन प्रबंध प्रसिध्द करण्यात आले.  यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे उपस्थित होते.

                                              

गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे

 गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत

‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

मुंबईदि. 25 : गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किंमती कशा कमी करता येतील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कामगारांनी स्वागत केले. बैठकीस राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरमाजी मंत्री रामदास कदमआमदार कालिदास कोळंबकरमाजी खासदार राहुल शेवाळेउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोनागृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहम्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालम्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह गिरणी कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेगिरणी कामगारांना मुंबईत घर मिळावे ही शासनाची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी मुंबईत किती जागा उपलब्ध होऊ शकते यासाठी एनटीसी सोबत बैठक घेण्यात येणार आहे. यासर्व बाबींचा विचार करून गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देत आहोत. मुंबई महानगर प्रदेशात देखील घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत १५ हजार ८७० घरे गिरणी कामगारांना दिली. आजपर्यंत सुमारे एक लाख गिरणी कामगार पात्र असून त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील.

राज्य शासनाच्या माध्यमातून ‘एमएमआर’ परिसरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दळणवळण सुविधांचे जाळे भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत गिरणी कामगारांनी एमएमआर क्षेत्रात घरांना प्राधान्य द्यावेअसे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

यावेळी गिरणी कामगार संघटनांच्या काही प्रतिनीधींनी सेलू भागात बांधलेल्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर

 पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचलेआतापर्यंत 800 पर्यटक परत

·         त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय

 

मुंबई25 एप्रिल : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असूनत्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहेअशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. दरम्यानपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल झाले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोलाअमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असूनमहाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नयेयाची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असूनजो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेलत्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असूनत्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल.

दरम्यानकाल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून महाराष्ट्रातील 416 पर्यटक परत आलेतर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवायसुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असूनत्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतीलतसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

0000


कृषि महामंडल के 22 हजार कर्मचारियों को म्हाडा से घर मिलेगा; 500करोड़ रुपये की आय प्राप्ति का लक्ष्य

 कृषि महामंडल के 22 हजार कर्मचारियों को म्हाडा से घर मिलेगा;

500करोड़ रुपये की आय प्राप्ति का लक्ष्य

                                        -राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

 

मुंबई, 26 अप्रैल: कृषि महामंडल के लगभग 22 हजार कर्मचारियों ने महामंडल को विकसित करने में अपना योगदान दिया है। उनके काम की सराहना करते हुए उन्हें रहने के लिए उचित आवास म्हाडा के माध्यम से उपलब्ध कराने का निर्णय राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने लिया है।

 

महाराष्ट्र राज्य कृषि महामंडल के निदेशक मंडल की 327 वीं बैठक मंत्रालय में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे के कक्ष में आयोजित की गई थी। बैठक में राजस्व राज्य मंत्री योगेश कदममहाराष्ट्र राज्य कृषि महामंडल के अधिकारी उपस्थित थे।

 

राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि कृषि महामंडल के 14 शेतमलों (कृषि फार्म) पर 2966 आवास हैं। इनमें से 1786 आवासों को रहने के लिए अनुपयुक्त घोषित किया गया है। इस कारण यह आवास खाली करने का प्रस्ताव महामंडल ने बैठक के लिए रखा था। इस पर चर्चा करते हुए राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कृषि महामंडल के सभी लगभग 22 हजार कर्मचारियों को म्हाडा के माध्यम से अच्छे आवास उपलब्ध कराने का महत्वपूर्ण निर्णय लिया। उन्होंने कहा कि जैसे मिल मजदूरों को अच्छे घर मिलते हैंवैसे ही इन कर्मचारियों को भी अच्छे घर मिलना चाहिए। इस पर राजस्व राज्य मंत्री योगेश कदम ने भी समर्थन दिया।

 

महाराष्ट्र राज्य कृषि महामंडल को आय बढ़ाने के लिए 500 करोड़ रुपये का लक्ष्य बैठक में निर्धारित किया गया है। महामंडल के पास लगभग 30 हजार एकड़ भूमि हैउस पर विभिन्न योजनाओं के माध्यम से आय बढ़ाने के लिए राजस्व मंत्री ने निर्देश दिए। इसके साथ ही कृषि निगम की किसी भी भूमि को निःशुल्क उपयोग हेतु उपलब्ध न कराने का निर्णय भी लिया गया।

 

कृषि महामंडल के फार्म पर सेवानिवृत्तइस्तीफा देनेवाले और मृतक कर्मचारियों को बोनस वितरण की मंजूरी दी गई। साथ ही कृषि महामंडल की जमीन पर संयुक्त कृषि पद्धति से फसल योजना लागू करने के लिए बिजली और सौर पंप की कनेक्शन उपलब्ध कराने तथा सौर ऊर्जा परियोजना के लिए ऊर्जा विभाग की मौजूदा पट्टे प्रणाली के तहत भूमि देने के लिए बैठक में निर्देश दिए गए। इसके अलावाकई अन्य निर्णय भी बैठक में मंजूर किए गए।

 

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती; 29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणारhttps://mpsc.gov.in या संकेतस्थळावर

 पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती;

29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार

-         राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

 

मुंबईदि.26 : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना 29 एप्रिल 2025 पासून 19 मे 2025 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आली आहे.

 

राज्य शासनाच्या कृषिपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारीमहाराष्ट्र पशुसंवर्धन सेवागट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांचा तपशील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

000

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येणार -राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची घोषणा

 रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात

‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येणार

-राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची घोषणा

 

मुंबई, दि. 26 : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साम्यवाद व भांडवलशाही यांचा सुवर्णमध्य साधत एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडला होता. दीनदयाल उपाध्याय यांचे विचार युवकांमध्ये पोहोचवण्यासाठी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येईलअशी घोषणा राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केली.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयात दिनांक 22 ते 25 एप्रिल 1965 या कालावधीत ‘एकात्म मानवतावाद’ या विषयावर व्याख्याने दिली होती. या व्याख्यानमालेच्या हीरक महोत्सवानिमित्त रुईया महाविद्यालय येथे आयोजित चर्चासत्राला राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयलकौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश सोनीदीनदयाल शोध संस्थेचे सरचिटणीस अतुल जैनविविध विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले, साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या उपाध्याय यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे कार्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केले. तसेच सध्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या कार्याला पुढे घेऊन जात आहेत. ग्रामीण भागात रस्तेगरिबांना गॅस कनेक्शनपेयजल या योजना त्याचाच परिपाक आहेत. कोरोना काळात पाश्चात्य देशांनी लस शोधली असती तर तिची किंमत जनतेच्या आवाक्यात राहिली नसती. मात्र, भारताने संपूर्ण देशवासियांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली आणि त्यापलीकडे जाऊन अनेक देशांना मोफत लस उपलब्ध करुन दिली. हा सर्वसमावेशक विचार पंतप्रधान श्री. मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याकडूनच अंगिकारला आहेअसे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.  

वास्तवाचे भान ठेवून अन्न वाया जाऊ देऊ नये, प्रत्येकाने धन अर्जन करावे परंतु अनावश्यक खर्च करू नये तसेच स्वतःसाठी न जगता इतरांसाठीही जगावे हा दीनदयाल उपाध्याय यांचा विचार स्वीकारला पाहिजे, असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.   

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मुंबई ‘वायएमसीए’चा 150 वा वर्धापन दिन साजरा

 राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत

 मुंबई ‘वायएमसीए’चा 150 वा वर्धापन दिन साजरा

 

मुंबई, दि.26 : सर्व धर्म-पंथातील लोकांसाठी खुल्या असणाऱ्या आणि देशभाषाधर्मवर्ण यांच्या पलिकडे जाऊन कार्य करणाऱ्या यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएसन (वायएमसीए) या धर्मनिरपेक्ष संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. आपल्या दीडशे वर्षांच्या प्रवासात या संस्थने चारित्र्यसंपन्न नागरिकनैपूण्यपूर्ण खेळाडू आणि सामाजिक जाणिवा असलेली व्यक्तिमत्त्वे घडविलीअसे गौरवोद्गार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काढले.   

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत वायएमसीए या संस्थेचा 150 वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (25 एप्रिल) एनसीपीए सभागृह मुंबई येथे पार पडला. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय महासचिव एन. व्ही. एल्डोराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेउपसचिव एस. राममूर्ती आणि बॉम्बे वायएमसीएचे सदस्यआजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले, वायएमसीए हॉस्टेलच्या माध्यमातून निवास व भोजनाची सुविधा निर्माण करुन दिल्यामुळे व्यापारी-उद्योजकांच्या जीवनात या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. वायएमसीएने गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तसेच क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे कार्य यापुढेही सुरु ठेवावे. मुंबईच्या लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात वायएमसीएने देखील आपले कार्यक्षेत्र आणि सेवा वाढवणे गरजेचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी बॉम्बे वायएमसीएच्या 'हाऊ मच कॅन वी डू फॉर अदर्सया कॉफीटेबल पुस्तकाचे तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.  

0 0 0


Featured post

Lakshvedhi