Saturday, 5 April 2025

वांद्रे शासकीय वसाहत : भुखंडाच्या निकषासाठीची समिती लवकरात लवकर गठीत करावी

 वांद्रे शासकीय वसाहत : भुखंडाच्या निकषासाठीची

समिती लवकरात लवकर गठीत करावी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. ४ : वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भुखंडाबाबत निकष निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय झाला आहे. ही समितीत लवकरात लवकर गठीत करण्यात यावीअसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्याची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत यासंदर्भाच सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस माजी आमदार किरण पावसकरउपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताबांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते आणि गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

या सहकारी संस्थेला भुखंड उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झाला असल्याचे श्री. पावसकर यांनी यावेळी सांगितले. या भुखंडाचा तपशील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची अर्हतानिकष निश्चित करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ही समिती लवकरात लवकर गठीत करण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.

 

यावेळी बैठकीतून उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून संवाद साधत लवकरात लवकर समिती गठीत करण्याबाबत सूचना दिल्या.

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

 वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • वीज निर्मितीसाठी सर्वोत्तम दर्जाच्या कोळश्यासाठी शासन प्रयत्नशील

 

मुंबई, दि. 4 : कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी  शासन प्रयत्नशील आहे. ‘महाजनको’ने  गारे पेल्मा- दोन जीपी-2 (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

         सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा खाणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महाजनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यावेळी उपस्थित होते.

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वीज निर्मितीसाठी विविध कंपन्यांकडून मिळणारा कोळसा चांगल्या दर्जाचा मिळावा तसेच तो वेळेत मिळावा यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. छत्तीसगड येथील रायगढ जिल्ह्यातील गारे पेल्मा दोन (GPII)  कोळसा खाणीला  शासनाच्या सर्व परवानग्या प्राप्त करून ‘महाजनको’ने कोळसा उत्पादनाबाबत सर्वसमावेशक असा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करून त्याला मान्यता घ्यावी. वीज निर्मिती करताना उत्पादन खर्च कमी करून  ग्राहकांना कमी दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी ‘महाजनको’कडून कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

        यावेळी ‘महाजनको’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांनी कोळसा खरेदी व महाजनकोकडून करण्यात येत असलेली विजनिर्मितीबाबत माहिती सादर केली.

0000

एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे

 एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

 

मुंबईदि 4 :- एम.आय.डी.सी. असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकासाला अधिक चालना देता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउद्योग मंत्री उदय सामंतमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ. श्रीकर परदेशीउपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तासचिव नवीन सोनाउद्योग सचिव डॉ. पी.अन्बलगनमुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासुसहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीऔद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक वेगाने करण्यासाठी एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास त्या गावांच्या विकासाबरोबरच संबंधित भागात मूलभूत सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांचा विकास वेगाने होईल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठारस्तेवीज आणि इतर सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल.

 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये एकूण 63 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून यातील 47 करार हे उद्योगाशी संबंधित आहे. यातील कंपन्यांना जमीन वाटपाचे काम पूर्णत्वास जात आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादनाची अधिसूचना प्रकाशित करण्यात येत आहे. ई-निविदा पद्धतीने महाटेंडर्स् पोर्टलवर 654 भूखंडाचे वाटप करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

100 दिवस कृती आराखड्यात दिलेल्या कार्यक्रमात महामंडळाने 3500 एकर औद्योगिक भूखंड देण्याच्या उद्दिष्टांपैकी 2346 एकर औद्योगिक भूखंड उद्योगांना वाटप करण्यात आले आहे. जमीन अधिग्रहणाचे 110 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बुटीबोरी येथे 5 एमएलडी सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित झाला असून औद्योगिक सेवांच्या विनंतीतक्रारी आणि मंजुरीच्या अर्जाचे निराकरण करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उष्माघातापासून दूर राहण्यासाठी स्वत:मध्ये करा ‘हे’ पाच बदल.....*

 *उष्माघातापासून दूर राहण्यासाठी स्वत:मध्ये करा ‘हे’ पाच बदल.....*


आता उन्हाळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शरीराला पाण्याची कमतरता जाणवणे, स्ट्रोक, खूप जास्त घाम येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांचा त्रास होतो. अशात भरपूर पाणी पिणे, सुती कपडे घालणे आणि नीट योग्य तो पोषक आहार घेणे गरजेचे आहे.


इन हाउस आयुर्वेदिक सल्लागार डॉ. अश्विनी कोन्नूर यांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी मार्ग सांगितले आहेत.


*आहाराकडे लक्ष द्या...*

तु्म्ही जे काही खाता, त्याचा थेट परिणाम तुमच्या ऊर्जेवर दिसून येतो. उन्हाळ्यात पचायला हलक्या असणाऱ्या अन्नाचा आहारात समावेश करणे कधीही चांगले असते. उष्ण वातावरणात शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हलका पोषक आहार घ्यावा. उदा. दही, पांढरा भात, सॅल्मन मासा तुम्ही खाऊ शकता. आंबट व तिखट पदार्थ खाणे टाळा.


*भरपूर फळे आणि भाजीपाला खा...*

फळे आणि भाजीपाल्यामध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, फोलिक अॅसिड व मिनरल्स असतात. हे घटक शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामध्ये चांगले फॅट्स असतात; जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. उदा.

काकडी, बेरी, टरबूज,

सायट्रिक अॅसिड समृद्ध फळे, अॅव्होकॅडो.


*जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करा...*

उन्हाळ्यात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. द्रव पदार्थ आपल्या शरीरातील पाण्याची पातळी भरून काढतात आणि आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात अल्कोहोल घेणे टाळले पाहिजे. त्याऐवजी फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, ग्रीन टी हे द्रव पदार्थ सहज उपलब्ध असतात आणि त्याचे अनेक फायदेही दिसून येतात.


*व्यायामामध्ये बदल करा...*

उन्हाळ्यात शरीरावर ताण पडणार नाही, याची काळजी घ्या आणि त्यानुसार व्यायामप्रकार निवडा. खूप जास्त तास व्यायाम करणे आणि खूप जास्त धावणे टाळा. त्याऐवजी प्राणायाम करा.


*शीतली प्राणायाम...*

 या प्राणायामामध्ये तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जाते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.


*सदांता प्राणायाम...*

 या प्राणायामामध्ये दातांद्वारे हवा आत घेऊन नाकावाटे बाहेर सोडली जाते.


त्याशिवाय तुम्ही वृक्षासन, अर्धकटी चक्रासन, कोनासन, त्रिकोणासन, मार्जारासन, बद्धकोनासन, वज्रासन, शशांकासन, चक्रासन, नवासन, योग निद्रा इत्यादी आसन प्रकार तुम्ही करू शकता.


*जीवनशैलीमध्ये बदल करा...*

उन्हाळ्यात रात्र लहान असते. त्यामुळे दिवसा तुम्ही थोडा आराम करू शकता. त्याशिवाय फिकट रंगाचे सुती कपडे, चंदन, फुलांपासून बनविलेले अत्तर यांचा वापर करा. घराबाहेर पडण्यापूर्वी किमान ५० एसपीएफ (Sun Protection Factor) असलेले सनस्क्रीन वापरा. जर कडाक्याचे ऊन असेल तर सनकोट, तसेच छत्री वा टोपीचा वापर करा.


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य  मधुमेह मुक्ती हा ग्रुप जॉईन करा*


माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲*


*(कॉपी पेस्ट)*


 *आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा 


८०-वर्ष-जुनी भिंत" नावाचे पुस्तक प्रकाशित केले.

 मित्रांनो,


आपल्याकडे सुद्धा average  आयुष्यमान 80 च्या आसपास गेले आहे असे वाटते. त्यामुळे आता आपल्याला 80 वर्षे आनंदात जगायचे असल्यास काय करायला पाहिजे ते माहित करुन घ्या. 


मानसोपचारतज्ज्ञ हिदेकी वाडा यांनी "८०-वर्ष-जुनी भिंत" नावाचे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशित होताच, त्याची विक्री ५,००,००० प्रतींपेक्षा जास्त झाली, जी सध्या सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले. जर हाच दर कायम राहिला तर या पुस्तकाची विक्री १० लाख प्रतींपेक्षा जास्त होईल, ज्यामुळे ते या वर्षी जपानमधील सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक बनेल.


या पुस्तकातील 60 ते 80 वर्षे वयाच्या लोकांना *"सुखी माणसं"* बनवण्याच्या 44 गोष्टी:👇


1.चालत राहा.


2.चिडल्यावर खोल श्वास घ्या.


3.शरीर आखडत नसेल ,इतपत व्यायाम करा.


4.उन्हाळ्यात एसी वापरत असाल तर ,भरपूर पाणी प्या.


5."डायपर" वापरल्याने हालचाली सोप्या होतात.


6.जास्त वेळा चालल्याने शरीर आणि मेंदू अधिक ऊर्जावान राहतो.


7.विसरणे हे वयामुळे नसून मेंदूचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे होते.


8.जास्त औषधं घेण्याची गरज नाही.


9.रक्तदाब आणि साखर पातळी कृत्रिमरीत्या कमी करण्याची गरज नाही.


10.एकटे असणे म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर आनंदी वेळ घालवणे.


11.आळशी असणे लाजिरवाणे नाही.


12.वृद्धांसाठी वाहन चालवणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे परवाना न घेण्याचा विचार करा.


13.आवडते तेच करा, जे नकोसे वाटते ते करु नका.


14.वय झालं तरीही सर्व नैसर्गिक इच्छा कायम राहतात.


15.घरात बसून राहू नका.


16.जे हवे ते खा, किंचित जाडसर राहणे ठीक आहे.


17.प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा.


18.ज्यांना तुम्ही नकोसं समजता, अशा लोकांना टाळा.


19.सतत टीव्ही पाहू नका.


20.रोगाशी अखेरपर्यंत लढण्यापेक्षा त्याच्यासोबत जगायला शिका.


21."गाडी डोंगरावर गेली तरी वाट सापडते" हा जादूई मंत्र लक्षात ठेवा.


22.ताजे फळे आणि सॅलड खा.


23.आंघोळ 10 मिनिटांत पूर्ण करा.


24.झोप येत नसेल तर जबरदस्ती करू नका.


25.आनंदी गोष्टी केल्याने मेंदू सक्रिय राहतो.


26.मनातलं बोलून टाका, जास्त विचार करू नका,कसं बोलू वगैरे?


27.लवकरात लवकर "फॅमिली डॉक्टर" ठरवा.


28.फार सहनशील राहू नका, थोडेसे 

*"वाईट म्हातारे"*,व *नटखट* होण्यास हरकत नाही.


29.कधी कधी आपलं मत बदलायला व हट्ट सोडायला हरकत नाही.


30.आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील "डिमेन्शिया" हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे.


31.शिकणं थांबलं की ,माणूस खरंच म्हातारा होतो.


32.कीर्तीचा हव्यास सोडा, जे आहे ते पुरेसं आहे.


33.निरागसपणा हा वृद्धांचा विशेषाधिकार आहे.


34.जितक्या समस्या, तितकं आयुष्य रंजक!


35.सूर्यप्रकाशात बसल्याने आनंद मिळतो.


36.दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी करा.


37.आजचा दिवस निवांत जगा.


38.इच्छा हाच दीर्घायुष्याचा स्रोत आहे.


39.नेहमी सकारात्मक राहा.


40.मोकळा श्वास घ्या.


41.जीवनाचे नियम तुमच्या हातात आहेत.


42.प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारा.


43.आनंदी माणसं नेहमी प्रिय असतात.


44.हसण्याने नशीब उजळतं.


*ही माहिती आपल्या सर्व ज्येष्ठ मित्रांपर्यंत जरूर शेअर करा!*

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची,धर्मादाय रुग्ण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश

 पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

चौकशीसाठी समिती गठितधर्मादाय रुग्ण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश

 

मुंबई, दि.४ : - पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

 

त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यासत्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावीअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कथित प्रकरणाची पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल. या समितीत उपसचिवसह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारीधर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधीमुंबईतील सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षकतसेच विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.

 

याच प्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धर्मादाय रुग्ण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंमलबजावणी बाबतही प्रधान सचिव विधी व न्याय विभाग तसेच धर्मादाय आयुक्त यांनी संनियत्रण व नियमन करावे याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

 

या निर्देशात म्हटले आहे कीधर्मादाय रूग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे 'धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचीमान्यता घ्यावी. याबाबत धर्मादाय रुग्णालयांना तत्काळ निर्देश देण्यात यावेत. विधी व न्याय विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या तपासणी पथकामार्फत तपासणी अहवाल व समितीच्या शिफारशी सादर केल्या आहेत. त्या शिफारशींवर तत्काळ कार्यवाही करावी.

 

शासनामार्फत धर्मादाय रुग्णालयांमध्ये 186 धर्मादाय आरोग्य सेवकांच्या सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांवरील भरती तत्काळ करण्यात यावी. निर्धन रुग्णनिधी (आयपीएफखात्याबाबतची अद्ययावत माहिती धर्मादाय रुग्णालयांकडून घेऊन ती धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी. योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या रुणालयांवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी.

००००


नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीद्वारे गुन्हेगारी रोखावी,pl share important

 नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीद्वारे गुन्हेगारी रोखावी

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • न्याय वैद्यक प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्याचे निर्देश
  • नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा

 मुंबईदि. ०४ :- भारतीय नागरिक सुरक्षा संहिताभारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. या कायद्यांच्या अंमलबजावणीद्वारे गुन्हेगारी रोखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. न्याय वैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेया कायद्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येणारे सर्व प्रशिक्षण पूर्ण करावे. तसेच याबाबत नवीन 'रिफ्रेश कोर्सेसही सुरू करावे. नवीन कायद्यांमध्ये गुन्हे सिद्ध करण्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढणार असून त्यामुळे राज्याचा गुन्हे सिद्धता दर निश्चितच वाढणार आहे.

गुन्हे सिद्धतेकामी बऱ्याचदा दवाखानेवैद्यकीय महाविद्यालय येथून न्याय वैद्यक पुरावे गोळा करण्यात येतात. त्यामुळे अशा ठिकाणी न्यायवैद्यक प्रयोगशाळांची सुविधा निर्माण करण्यात यावी. सीसीटीएनएस 2.0 (क्राइम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिम) मध्ये बँड विथ'ची क्षमता वाढविण्यात यावी. त्यामुळे देशपातळीवर सबंधीत गुन्ह्यांमध्ये गुन्हे सिद्धता वाढेल.

            राज्यात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक पुरावे तपासणे सक्तीचे करण्यात आले आहे. अशा प्रकरणांमध्ये न्यायवैद्यक पुराव्यांचा उपयोग करण्यामध्ये राज्याचे प्रमाण 65 टक्के आहे. तसेच सात वर्षाहून कमी शिक्षा असलेल्या प्रकारांमध्ये न्यायवैद्यक पुराव्यांचा उपयोग करण्याचे प्रमाणही वाढवण्यात यावे. गुन्हे सिद्धतेमध्ये न्यायवैद्यक पुराव्यांच्या प्रभावी उपयोगासाठी तपासणी अधिकाऱ्यांना टॅब देण्यात यावे. टॅब खरेदीची कार्यवाही तातडीने पूर्ण करावीअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गतिमानता आणण्यासाठी या कायद्यांच्या अनुषंगाने ई समन्सई-साक्ष उपक्रम न्यायालयाच्या परवानगीने राबविण्यात यावे. तसेच कारागृहांमधील कैद्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कुटुंबियांशी संवादाची अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्यावी. जलद न्याय निवाड्यांसाठी न्यायालयाच्या परवानगीने ई-कोर्ट सुरू करण्याबाबत पडताळणी करावीअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

 बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहलपोलिस महासंचालक रश्मी शुक्लाविधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले. मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीकारागृह व सुधारण विभागाचे अपर पोलीस महांचालक सुहास वारके आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi